Saturday, May 31, 2025

श्री गणेश जयंती ...अर्थात बाप्पाचा वाढदिवस ..

 

श्री गणेश जयंती ...अर्थात बाप्पाचा वाढदिवस ..



 गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो.[१] या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.[२][३] या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते.[४] माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला  ही विनायकी चतुर्थी ही तिथी असते  .[५] या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखविला जातो.[६]
खरेतर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. गणेश भक्तांत संकष्ट चतुर्थी प्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व दिले जाते. गणेश जयंती (शब्दशः "गणेशाचा वाढदिवस", ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातही माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी (उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र) पंचांगानुसार साजरा केला जातो, जो ग्रेगोरियन कॅलेंडर संबंधित आहे.
यावर्षी दिनांक १फेब्रुवारी .. गणेश जयंती हा पवित्र महोत्सव आहे .तसे पाहिले तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात.  गणेश जयंती व गणेश चतुर्थी या दोन्ही विनायकी चतुर्थी असतात. गणेश भक्तात संकष्ट चतुर्थी प्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व दिले जाते.  . या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय महोत्सव आहे. 
गणेश पूजेची पद्धत...
*तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून लाल रंगाचे  शुद्ध वस्त्र परिधान करावे. यानंतर आसनावर बसून श्री गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी प्रथम ११ ,२१ किंवा १०८  गणपती अथर्वशीर्ष आवर्तने करावी . नारद विरचीत संकटनाशन स्तोत्राची ही आवर्तने करावी श्री गणेशाला धूप दिवा दाखवावा. फळे, फुले, तांदूळ, ,  अर्पण करा. पंचामृताने स्नान केल्यानंतर गणेशाला तीळ आणि गुळाच्या वस्तू अर्पण करा.  श्री गणपतीस तांबडी फुले ,मंदार गुलाब शमी दूर्वा बिल्वपत्र वाहव्यात . पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवा. पूजेनंतर 'ॐ श्रीगणेशाय नम:' किंवा "ओम गं गणपतये नमः " चा १०८ वेळा जप हीकरावा.....

गणेश जन्माच्या व्रताच्या निमित्ताने या दिवशी  महाराष्ट्रात सर्वत्र गणपती मंदिरे व मंडळाचे गणपती येथे धार्मिक कार्यक्रम उदा. गणेश याग ,अथर्वशीर्ष आवर्तने उपासना व वैविध्यपूर्ण सजावट  केली जाते.
गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय, जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट/सप्टेंबर भाद्रपद हिंदू महिना मध्ये साजरा केला जातो. एका परंपरेनुसार, गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते. याला महाराष्ट्रात तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.

या दोन्ही चतुर्थी बाबत समाजात एक मान्यता आहे.प्राचीन प्रथांनुसार, गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे, ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी सेट केला आहे. जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहतो, त्याला मिथ्या दोष नावाच्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी चोरीचा आळ येतो अशीही समाजात धारणा आहे. चुकून एखाद्या व्यक्तीला चंद्र दिसला तर खालील मंत्राचा जप केला जातो.

सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जाम्बवता हतः।
सुकुमारक मारोदीस्तव ह्येषा स्यामंतकः॥

नंदीने सनतकुमार ऋषींना सांगितलेली एक आख्यायिका म्हणून, भगवान कृष्णावर स्यमंतक नावाचे एक मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप होता, कारण त्याने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला - जो निषिद्ध होता. देवऋषी नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघ शुक्ल चतुर्थी किंवा गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि चोरीच्या आरोपातून सुटका झाली.
या व्रतामध्ये दानाचे महत्त्व जाणून घ्या...
*माघ महिन्यामुळे या चतुर्थीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीगणेशाला तिळाचे लाडू अर्पण केले जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून वाटप केले जाते. विशेषत: या दिवशी   अन्नदान केले जाते. या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे पुण्यकारक मानले जाते.....
महाराष्ट्रात  ही गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते.

गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. म्हणजे वर्षातून तीन वेळेस गणेश जयंती साजरी केली जाते . पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘पुष्टिपती विनायक जयंती’ म्हणून आपण साजरा करतात . दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘श्रीगणेश चतुर्थी’ म्हणून पार्थिव गणेश पूजन केले जाते . तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘गणेश जयंती’ म्हणून आपण साजरा करीत असतो.
या माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीच्या गणेशमूर्तींची पूजा केली जाते, तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे याबद्दलही काहीही नियम नाहीत .आजकाल  काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.
गणेश जयंतीच्या दिवशी धुढिराजाचे पूजन करावे आणि तीळसाखरेचे किंवा तीळगुळाचे मोदक अर्पण करावेत . दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्रतारका दिसू लागल्यावर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाचा मुलगा म्हणून  ‘विनायक’ या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे.
या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तीळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते, अशीही उपासकांची श्रद्धा आहे.
: प्राचीन प्रथांनुसार, गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे, ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी नक्की केला आहे. जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहतो, त्याला मिथ्या दोष नावाच्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. 
थोडक्यात सर्व गणेशाची आराधना व उपासना करून पुण्यप्राप्ती करावी गणेशास आवडता मोदकाचा प्रसाद अर्पण करावा व संसारात सुख व समृधी प्राप्त करून घ्यावी 

।। शुभम भवतु ।।

Thursday, May 29, 2025

गुरुवाणी हाच परमेश्वराचा आदेश समजावा ...

 ।।श्री गुरू शरणं ।।

गुरुवाणी हाच परमेश्वराचा आदेश समजावा ...


श्री सदगुरु आपल्याला प्रत्येक वेळेला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. कसे वागायचे, कसे चालायचे, कसे बोलायचे, जशी वेळ येईल तसे ध्यैर्याने सामोरे कसे जायाचे? दुसऱ्यांचे ऐकावे.प्रामाणिक पणे रहायचे.कारण जीवन हे क्षणभंगूर आहे. 
माणूस जन्माला येतो.त्यावेळी तो परतीचे तिकिट बरोबर घेऊनच येतो. म्हणून जन्म आणि मृत्यू या मधल्या काळात जेवढे सकर्म,सत्कार्य करता येईल तेवढे करावे.असे नेहमी श्री सदगुरु सांगतात. परंतु आपण त्या गोष्टिंवर दुर्लक्ष देतो.आणि वेळ येते तेव्हा गडबडून जातो. काय करावे काहीच समजत नाही. मग आयुष्य भर दु:ख करत बसतो.कारण ती वेळ निघून गेलेली असते.
जीवन हे रंगभूमीवरील नाटक आहे. पडदा पडला कि संपले.
हे सर्व क्षणिक असते.  रंगभूमीवरील सादर केलेल्या नाटकाचे नाव लक्षात रहात नाही. परंतु त्या रंगमंचावर कलाकाराने सादर केलेली भूमिका कायम लक्षात रहाते.
म्हणून  जीवन हे रंगभूमीवरील नाटक आहे. 
*जीवनाची भूमिका कशी वटवायची हे शिकले पाहिजे*
खरे पाहता गुरू शिष्य घडवितात...

गुरुकडे गेल्यानंतर गुरु शिष्यावर संस्कार करतात.  ज्याप्रमाणे शिल्पकार दगडामधून मूर्ति घडवितो, तसेच गुरु शिष्याला घडविण्याचा प्रयत्न करतात.  यासाठी शिष्याने गुरूंना पूर्ण भावाने शरण गेले पाहिजे.                 

याविषयी  संत कबीर म्हणतात----
"गूँगा हूवाबावला, बहरा हुआ कान ।*
*पाऊँ ये पंगुल भया, सतगुरु मार वाण।'*

सद्गुरुची वाणी अतिशय भेदक असल्यामुळे त्यातून निघालेला उपदेशपरक बाण हृदय छेदतो. त्या शब्दरुपी बाणाने शिष्य घायाळ होतो. त्याच्यातील अंतर्बाह्य सर्व विकार गतिहिन होतात. शिष्य स्वार्थपरक विचार सोडून देतो आणि त्याची वाणी मूक होते, कान बहिरे होतात, पायातील शक्ती नाहिशी होऊन पंगू होतात. याचा अर्थ असा की, शरीरातील स्वार्थी भाव नष्ट होतात. विकाररहित स्थिती निर्माण होते. ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रिय निश्चल स्थितीत येऊन पोहचतात. इंन्द्रिय स्वतःचं कार्य विसरून परमात्म्यामध्ये एकरुप होतात. जीवन व संसारातील मोह, मायेच्या पाशातून शिष्य वेगळा होतो. संसारातील वैभवापासून दूर जाणान्या मनुष्याला वेडा म्हटल जाते. त्या स्थितीपर्यंत तो शिष्य येऊन पोहचतो म्हणजेच सद्गुरुंच्या भेदक शब्दशक्तींमध्ये इतकी प्रचंड ताकद सामावलेली असल्याचे दिसून येते..
या दोह्याची सत्यता पटवण्यासाठी   खालील कथा आपणास मार्गदर्शक ..

💐💐

फार पूर्वी एक युवक संताकडे गेला आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग कोणता ? असे विचारु लागला. तेव्हा त्या संतानी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि सांगितले की, *'अरे, तरुणा तू अगोदर प्रेम करायला शीक आणि मग माझ्याकडे ये. मगच मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.* हे ऐकताच तो युवक प्रेमाच्या शोधात देशभर भटकू लागला. एक दिवस तो एका नगरातून फिरत असतांना राजमहालाच्या खिडकीतून एका सुंदर राजकन्येकडे त्याचे लक्ष जाते. ती सौंदर्यवती राजकुमारी आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध होती. अशा सौंदर्यवती राजकुमारीला पाहताच तो युवक तिच्या प्रेमात पडतो. तिच्या दर्शनासाठी आसुसलेला युवक तीन दिवस खिडकीकडे पहात तिथेच उभा राहतो. त्याला त्यावेळी स्वत:च्या जिवाची पर्वा नसते. त्याची या अवस्थेची चर्चा सगळ्या शहरात होते. सर्व लोकांना समजतं की, त्याची ही दशा राजकुमारीच्या प्रेमात पडल्यामुळे झाली आहे. ही वार्ता राजाच्या कानावर पोहचते. राजा त्वरित त्या युवकाला दरबारात बोलावून घेतो. लोकांना वाटतं की, राजा आता त्या युवकाला मृत्युदंडाची शिक्षा होईल, परंतु राजा असं काहीच करत नाही. तो त्या युवकासमोर अट ठेवतो की, राजकुमारीवर तुझे खरे प्रेम असेल तर कड्यावरून खाली उडी टाकून दाखव.

लग्न राजकुमारीबरोबर लावून देण्यात येईल. युवक प्रेमात इतका आंधळा झाला होता की, तो उडी टाकण्यास तयार झाला. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वतःला कड्यावरून झोकून दिले. परंतु संताने अगोदरच एक लांबलचक कपड्याची झोळी बांधून ठेवली होती. युवक त्या झोळीत पडल्यामुळे वाचला. ठरल्याप्रमाणे राजा राजकुमारीचा विवाह त्याच्याबरोबर करण्यास तयार होता. पण युवकाने नकार दर्शवला. त्यामुळे राजा व इतर लोक चकित झाले. ज्या राजकुमारीसाठी त्याने कड्यावरून उडी मारली तिच्याशी लग्न करण्यास हा युवक का नकार देतो हे कुणालाच समजेना. त्यावेळी युवक संताकडे पाहून म्हणाला, *'मी फक्त प्रेम कसं करायचं हे शिकण्यासाठी आलो होतो. खऱ्या प्रेमाचा अर्थ मला समजला.' असं बोलून तो युवक संताबरोबर निघून गेला.*

अशा रितीने सद्गुरुंचा उपदेश त्या युवकाच्या वर्मी लागला आणि संसारातील मोह, मायेपासून तो सावध झाला. *संत कबिरांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरुंच्या उपदेशरुपी भेदक शब्दांमुळे शिष्य अंर्तबाह्य बदलून जातो. त्याची सद्विवेक बुद्धी जागृत होते. खऱ्या प्रेमाची अनुभूती प्राप्त होते. इंन्द्रियांची विलासी वृत्ती कमी होते. शिष्य अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. हीच खरी जीवनातील 'ऊनमनी' अवस्था मानली जाते. अशा अवस्थेतच ईश्वराची प्राप्ती सुकर होते. जीवनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार होऊन परमानंद प्राप्त होतो.*
💐💐

एक हनुमंताचे मंदिर असते.  त्या मंदिरामधील उंबऱ्याचा असणारा दगड हनुमंताशी बोलू लागतो.  “हे हनुमंता !  मला एक शंका आहे.  मला तुझा फार द्वेष वाटतो.”  हनुमान म्हणतो, “का रे बाबा ?  तुला माझा द्वेष का वाटतो ?”  त्यावेळी उंबऱ्याचा दगड म्हणतो, “हनुमंता !  अरे, तू आणि मी एकाच खाणीमध्ये रहात होतो.  तू सुद्धा एक दगड आणि मी देखील एक दगड आहे.  परंतु मी रोज पाहतो, या मंदिरामध्ये सर्व लोक तुझ्या डोक्यावर अखंडपणाने फुले वाहतात, पाणी वाहतात, तुला नमस्कार करतात, तुझ्या पायांवर डोके ठेवतात आणि तेच लोक माझ्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जातात.  असे का ?”  

यावर हनुमान उत्तर देतो – “ तुझे अगदी बरोबर आहे, पण खरं सांगू का ?  खरं तर तूच हनुमान होणार होतास.  शिल्पकाराने तुलाच हातात घेतले होते.  परंतु शिल्पकाराने पहिला घाव घातला आणि तुझे तुकडे-तुकडे झाले.  त्यामुळे तुला नाईलाजास्तव उंबऱ्याचा आकार द्यावा लागला.  नंतर त्या शिल्पकाराने मला हातात घेतले, माझ्यावर अनेक छोटे-मोठे कठीण घाव घातले.  मी ते सहन केले.  म्हणून आज मी मूर्ति झालो, लोक मला नमस्कार करतात.  बस्स !  एवढाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे.”  

म्हणून तात्पर्य एकच !  साधकाने गुरूंना अनन्य भावाने शरण जावे.  म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये “शिष्याला शिकविणे” हे वाक्य नसून “शिष्याला घडविणे” हे वाक्य आहे.  गुरु शिष्याला अंतर्बाह्य बदलवितात.  
संत ज्ञानेश्वर सुंदर सांगतात –
*हृदया हृदय येक जालों | ये हृदयींचें ते हृदयीं घातलें |           (ज्ञानेश्वरी)

गुरु आणि शिष्य यांचे हृदय एक झाले पाहिजे, तरच गुरु त्यांच्या हृदयामधील ज्ञानामृत शिष्याच्या हृदयामध्ये प्रदान करू शकतात.  ते ज्ञान, ती अनुभूति जर शिष्याला द्यावयाची असेल, तर शिष्याचे मन सुद्धा तितके तयार पाहिजे.  ज्ञानासाठी पाया भक्कम पाहिजे. सद्गुरू विचारांशी पूर्ण समर्पण व श्रद्धा हवी एकच भावना हवी सद्गुरू आज्ञा हाच परमेश्वरी आदेश .....

।।शुभम भवतु ।।

Tuesday, May 27, 2025

करवीर क्षेत्रीची महालक्ष्मी...आई अंबाबाई

 


करवीर क्षेत्रीची महालक्ष्मी...आई अंबाबाई




नाव: श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई
निर्माता: चालुक्य राजा कर्णदेव
जीर्णोद्धारक: चालुक्य राजा कर्णदेव
निर्माण काल : ६३४
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रधान देवता: सर्वस्याद्या मुळ आदिमाया आदिशक्ती भगवती

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते, आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

*कधी काळी यवनांनी या देवळाचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. या मंदिरात वर्षातून काही ठराविक दिवशी सूर्याची किरणे मातेच्या चरणी पडतात  वं शरीरावरही पडतात तेव्हा किरणोत्सव होतो .
अंबाबाईची मुखमुद्रा दरवेळी नवे गुज सांगून जाते. भृगु ऋषींनी आपल्या भ्रताराच्या वक्षस्थळी लथ्थाप्रहार केला हे पाहून अपमानित झालेली महालक्ष्मी, वैकुंठ सोडून करवीरास आली. पतीपत्नीत होणाऱ्या पेल्यातील भांडणां प्रमाणे हेही असेच एक भांडण. चार आठ दिवसांचा काय तो रुसवा. काही क्षणांसाठीच काय ते एकमेकांना मुद्दामहून विसरणे, बोटावर मोजण्या इतकीच काय ती जेवणं असतील, ज्यात एकमेकांचा चेहरा डोळ्यासमोर न आणता उचलला घास पटकन तोंडात टाकला असेल. पण हे  किती दिवस?

अंबाबाई येथे येऊन येथलीच झाली. भक्तांनी तिला आईचं स्थान दिलं. लेकीबाळींचा संसार सांभाळण्यासाठी तिने जिवाचं रान केलं. वाळवंटात एखाद्याने जलाच्या शोधात धावावे तशी ती लेकरांच्या सुखाच्या शोधात धावली. श्रीविष्णुंवरचा राग तर केव्हाच गेला असेल हो, पण आई मात्र आपल्यामुळे येथेच गुंतून राहीली. अर्भकाला जसं एकटं घरात सोडून जाण्यासाठी मातेचे मन धजावत नाही त्याचवेळी प्रकोपकायी उन्हात शेतावर राबणाऱ्या नवऱ्याला जेवण घेऊन जाण्यासाठी जशी तिच्यातली पत्नी तळमळते, तशीच काहीशी अवस्था अंबाबाईची झालीये.
त्यामुळे जेव्हा केव्हा तिच्या भेटीला जाल तेव्हा स्वतःसाठी काही मागताना, तीला हेही सांगा, आई गं! तू सुखात रहा, तुझा संसार सुखाचा होवू दे! तू आनंदी तर आम्ही आनंदी. बघा आईच्या आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्यावाचून रहाणार नाहीत. 
 
महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे, तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.
 
 आंबा माता त्रंबोली मातेच्या भेटीस जाते ....आज अश्विन शुद्ध पंचमी आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबुली पंचमी म्हणून ओळखला जातो. महालक्ष्मी (अंबाबाई)ने  याच दिवशी कोल्हासूराचा वध केला. त्यावेळी तिने वर दिला की दरवर्षी मी तुझ्या नावाने कोहळा बळी देईन आणि या नगराला तुझे नाव असेल.  पुढे कामाक्ष नावाच्या कोल्हासुराच्या नातवाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने महालक्ष्मी सह सर्व देवांचे रूपांतर बक-यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबुलीने कामाक्षाचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली. पण ते त्र्यंबुलीचे आभार मानायचे विसरून गेले त्यामुळे त्र्यंबुली रागाने शहरा बाहेर टेकडीवर जाऊन बसली तिची समजूत घालायला स्वतः महालक्ष्मी तिथे गेली व आजही तो भेटीचा सोहळा होतो. या भेटी करताच अंबाबाई आज गजारूढ रूपात सजली आहे. 

 कोल्हापूरला आद्य मातृशक्तीचे मुख्य स्थान म्हणतात. या क्षेत्राला 'महामातृका पीठ' व 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील रचना चक्रराज (श्री यंत्र) प्रमाणे सर्वतो भद्र मंडल प्रमाणे आहे. या मंदिरात पाच शिखरे व तीन मंडपे आहेत. गर्भ गृह मंडप, मध्य मंडप व गरुड मंडप हे तीन मंडप होत. प्रमुख व विशाल मंडपा मध्ये १६ x १२८ स्तंभ कलाकुसरींनी युक्त आहेत.
 
श्री दुर्गा सप्तशती नुसार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही मुळ प्रकृती आदिमाया भगवती‌ आहे. ती ना शिवपत्नी आणि ना ही विष्णूपत्नी आहे.‌ ती साक्षात त्रिदेव देवींसह सृष्टीची जगतजननी आहे. कोलासुराचा वध करून ही मुळ आदिमाया आदिशक्ती करवीर नगरीत रममाण झाली. आणि कोल्हापूरांची आई अंबाबाई झाली.
 
प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक शिवलिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, स्वामी समर्थ, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम, कात्यायनी, पंचगंगा व साती आसरा आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फरसबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.
 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी(अंबाबाई) मंदिर म्हणजे सर्व देवतांचे माहेरघरच .
पूर्वी महर्षी दुर्वासांच्या शापाने देवांची सर्व संपदा समुद्रात बुडून गेली. म्हणून मंदार पर्वताची रवी करून त्याला वासूकीनागाच्या दोरीच्या साह्याने देवदैत्यानी सागर मंथन केले त्यातून जी चौदा रत्न प्रगटली त्यामधले एक रत्न म्हणजे भगवान विष्णूंचे अंश असणारे वैद्यांचे देव अर्थात धन्वंतरी!हातात जळू शंख चक्र आणि अमृतकुंभ धारण करणारे धन्वंतरी वैद्यकशास्त्राचे परमेश्वर म्हणून ओळखले जातात अशा या धन्वंतरींची द्विभुजा मूर्ती मणिकर्णिका तीर्थात मिळाली होती अशी आख्यायिका सांगण्यात येते.   
असाही एक मतप्रवाह आहे---- कोल्हापूरची महालक्ष्मी नव्हे कोल्हापूरची अंबाबाईच..आदिशक्ती पार्वती 
कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिर आहे याची नोंद इतिहासात आहे.. अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे ..शंकराची पत्नी आहे.. या नात्याने कोल्हापुरातील मंदिर हे शैव मंदिर आहे.

पण अचानक 1980 सालापासून बालाजी वरून साडी चुडी अंबाबाईला पाठवू लागले यावरून असा प्रसार सुरू झाला की बालाजी आपल्या पत्नीला म्हणजे महालक्ष्मीला साडी चोळी पाठवतो.. नंतर अशी प्रथा रूढ झाली की बालाजीला दर्शनासाठी गेलेले कोल्हापूर महालक्ष्मी करूनच परत यावे.. कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी कशी झाली यावर संशोधन होणे गरजेचे आहे.. हे एकच मंदिर नाही *भारतात असे बहुतांश मंदिर आहेत जे शैव मंदिर असून सुद्धा त्यांना वैष्णव मंदिर बनवण्याचा प्रयत्न होत आहे..! आणि असे प्रयत्न का होत आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे

गेल्या काही काळापासून अंबाबाईचे पार्वती हे मूळ रूप बदलून तिचे लक्ष्मीकरण करण्याचा घाट घातला जात आहे . 

करवीर निवासिनी अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून अंबाबाई ही लक्ष्मीचे रूप असल्याचे सांगून काही लोकांकडून चुकीचा इतिहास रचला जात असल्याच्या तक्रारी अंबाबाईसंदर्भात मूर्ती व प्राचीन इतिहास संशोधकामार्फत केल्या जात होत्या. अंबाबाई ही तिरूपती बालाजीची पत्नी असून ती रूसून करवीरात आली आहे आणि आपल्या पत्नीसाठी दरवर्षी बालाजी महावस्त्र पाठवतो अशी आख्यायिकाही जोडली जात होती. मात्र *तिरूपती बालाजीची पत्नी ही अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे अभ्यासकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.

अंबाबाई मूर्तीची झीज झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मूर्तीची अंबाबाई असल्याची ओळख दाखवणारी मस्तकावरील नागमुद्रा घडवलीच नसल्याचे उघड झाले. नागमुद्रा हे प्रतीक पार्वती अर्थात अंबा असल्याची खूण असताना नागमुद्रा न घडवल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.* त्यामुळे अंबाबाई की महालक्ष्मी असा मतप्रवाहदेखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दोन महिने आधीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चेला उधाण आल्यामुळे नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानकडून येणारा मानाचा शालू कोणत्या नात्याने स्वीकारला जाणार याबाबतही उत्सुकता होती,
या पार्श्वभूमीवर हा मानाचा शालू *‘विष्णूमाता’* या नात्याने स्वीकारला जात असल्याचे देवस्थान समितीतर्फे जाहीर केले.

अंबाबाई ही शक्तिरूप असून तिच्या मूर्तीमध्ये घडवण्यात आलेली आयुधे, नाग, सिंह, म्हाळुंग यामध्येच ती पार्वतीचे रूप असल्याचे दाखले असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले होते.* ही व्याख्यानमालिका कोल्हापुरात अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपर्यंत देवीची नेमकी ओळख पुराव्यांमधून उजेडात न आल्यामुळे बालाजीची पत्नी म्हणून शालू स्वीकारला जात होता. मात्र, अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यानुसार अंबाबाई ही पार्वतीचे रूप असल्याची भूमिका देवस्थानने घेतली असून मुलाकडून आईसाठी महावस्त्र भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाणार आहे

कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नसून अंबाबाई' आहे.  याची कारण मीमांसा खालील प्रमाणे ---

१) कोल्हापूरची देवीचे नाव हे 'अंबाबाई'  आहे. तिचे महालक्ष्मी नाव कधीच नव्हते. भारतामध्ये देवी आदिशक्ती सतीची ५२ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे ३ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापुरची भवानी माता, माहुरगडाची रेणुका माता, कोल्हापूर ची अंबाबाई, आणि अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. जर कोल्हापूरची अंबाबाई शक्तीपीठ म्हटलं तर ती कधीच विष्णू पत्नी होणार नाही. कारण सतीची कलेची ५२ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ५२ शक्तीपीठ तयार झाले. अंबाबाई ही शिवपत्नी आहे.

२) अंबाबाई च्या देवळात अंबाबाई च्या गाभाऱ्यावर पहिल्या मजल्यावर शिवमंदिर आहे. तिने शिवाची मातृका पिंड धारण केली आहे. अंबाबाई च्या मूर्तीचा अभ्यास केल्यास तिने कोणत्याही प्रकारे विष्णू चिन्ह परिधान केलं नाही आहे. उलट अंबाबाई मूर्ती जवळ वाहन सिंह आहे.  सगळी शिवचिन्ह आहेत.

३) आता मुद्दा तिरुपती- अंबाबाई ह्या गैरसमज बद्दल.
 काही वर्षपूर्वी काही तिरुपती भक्त आई अंबाबाई च्या ट्रस्ट च्या अधिकार कक्षेत आल्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या प्रथा पाडण्यास सुरवात केली. 
आपण डोळसपणे पाहिल्यास असे लक्षात येईल की  तिरुपती देवस्थान कडून शालू भेट देण्याची प्रथा सुरू केली. ही मागील २० वर्षातच चालू आहे (या अगोदर अशी कोणतीही प्रथा नव्हती), हे कमी की काय, 
तिरुपती देवस्थान सारखे लाडू चा प्रसाद देण्याची सुरवात केली, ( या आधी लाह्या आणि बत्तासे चा प्रसाद मिळत असे). 

अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी नाव पुढे केलं गेलं (२००० सालाच्या अगोदर एकही सरकारी कागदपत्रात महालक्ष्मी म्हणून  कुठेही उल्लेख नाही. अगदी इंग्रजांच्या काळातली सुद्धा कागद पत्रात 'अंबाबाई' च उल्लेख आहे.

४) सर्वात महत्वाचे कोणत्याही दानव, राक्षस अधर्मी वृत्ती यांचा संहार माता पार्वती करते कारण ती आदिमाया जगदंबा आहे. तिने शस्त्र धारण केले आहेत. अंबाबाई ने या कारणास्तव कोल्हासुरचा वध केला आहे. लक्ष्मी माता ही संहारक नाही. ती धन पूरक देवता आहे. ती कोणाचा वध करत नाही.

५) शेवटचा मुद्दा श्रीविष्णू (तिरुपती) यांची पत्नी लक्ष्मी (पद्मावती) यांचे मंदिर तिरुपती पासून ५ किलोमीटर वर च आहे. 

यावरून असा निष्कर्ष काढला आहे की-   माता पार्वतीच्या शक्तीपीठ ला उगाच विष्णुपत्नीचे रूप देत आहेत.*
. रत्नासुराला मारण्यासाठी अंबाबाईने केदारनाथ जोतिबाला मदतीसाठी बोलावले होते . विष्णुला नाही . केदारनाथ शिवाला युद्धानंतर इथेच थांबण्याची विनंती केली .. ती मान्य केले . जोतिबा हे शिवाचेच रूप आहे .

अनेक अभ्यासकांची मते  मांडली तरी ही महाराष्ट्रात माते स्वरूपात कुलस्वामिनी आहे पूज्य आहे  भक्तांच्या नवसाला पावणारी आहे . शुभम भवतु

श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः

Saturday, May 24, 2025

कलीयुगी दत्तभक्ती फलदायी

कलीयुगी दत्तभक्ती फलदायी



भजा भजाहो दत्तगुरु....कलीयुगी दत्तभक्ती फलदायी.

कलियुगी अत्रिपुत्र दत्तात्रय हेच साधकांवर कृपा छत्र धारण करणारे दैवत आहे, आणि त्यांच्या नाम  व पूजनाशिवाय दुसरा भक्तीमार्ग नाही. या जीवनाचा भार दत्त चरणी अर्पण करून ब्राम्हमूर्ती समर्थ पणे साधना करावी हीच सामर्थ्यवान बनवते एवढे सामर्थ्य नाम साधनेचे आहे. देहाची चारी अवस्था नामाच्या सह्याने व्यतीत करावी तरच मुक्तीच्या चारी अवस्था साधका समोर नतमस्तक होतील. सत्य संकल्प मनोरथ केवळ दत्त स्मरणाने पूर्ण होतील आणि जन्ममृत्यू च्या फेऱ्यातुन सहज बाहेर काढू शकतील. दत्तमहाराज हे स्मतृगामी आहेत ते भक्तांच्या आर्त हाकेला त्वरित धावून येतात फक्त आवश्यकता असते ती श्रद्धा व एकनिष्ठ उपासनेची .
दत्त उपासना कशी करावी..?

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. अशात दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी, या विषयी माहिती असणे आवश्यक आहे . दत्त संप्रदायात पावित्र्य व शुचितेला विशेष महत्त्व आहे .

💐दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला  विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध  किंवा कुंकूम तिलक लावावा

💐दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने सुगंधी गंध लावावे.

💐दत्ताला जाई आणि निशिगंधाची किंवा उपलब्ध सुवासिक फुले ही  अर्पित करावीत. फुलांचे देठ देवाकडे करत वाहावीत. दत्त हे ब्रम्हा विष्णू व महेश यांचे एकरूप दैवत असल्याने दत्त महाराजांना बेल , तुळस अर्पण करावी त्यातही देठ देवाकडे करावे .'विष्णुरूपी दत्त झाला ' म्हणून पिवळी फुले अर्पण करावी .

💐दत्ताला चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर हीना सुंगधी असलेली अत्तरे व त्याच सुगंधाची उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळावी.

💐दत्ताला हिना गुलाब वाळा हे सुगंध असलेले गंध अर्पण करावे.

💐गुरुवार हा दत्तांचा वार असल्याचे मानले जातं. या दिवशी दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते.
उपवास करावा हार व सुवासिक फुले अर्पण करावी आर्तभावाने आरती व प्रार्थना करावी
आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते. दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

दत्त दत्त म्हणता वाचे। 
तेणे सार्थक जन्माचे॥
मने चिंतावा श्रीदत्त। 
अंतर्बाह्य पुर्ण भरित॥
दत्तरुप पाहे डोळा।
 तेणे भय कऴिकाळा॥

एका जनार्दनी जपा। मंत्र द्वयाक्षरी हा सोपा॥

नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल, मज प्रचिती आली बहू तुम्हा देखील येईल..! कलियुगात दत्त भक्ती त्वरित फळास येते

दत्त उपासकांसाठी काही नियम व पथ्ये भक्तांनी अवश्य पाळावीत

१. गुरुवारी शक्य तर उपवास करावा.त्या दिवशी कांदा, लसूण खाऊ नये. रात्री"श्रीदत्तवज्रकवच"तसेच, दत्तस्तोत्रे खड्या स्वरात म्हणून दत्ताची आरती करुन मगच उपवास सोडावा,
२. घरात दत्ताची तसबीर / दत्तमूर्ती असावी  मूर्ती देव्हाऱ्यात  वरच्या पायरीवर मध्यभागी ठेवावी तसबीर उत्तरेकडे तोंड करुन लावावी.
दर गुरुवारी दत्ताच्या तसबिरीला/ मूर्तीला-छातीला व चरण युगलांना अत्तर लावावे. हिना अगरबत्ती लावावी.शक्यतो एक गुलाबाचे फुल वहावे व पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
३. "त्रिपुरारहस्य"हा कल्याण कारी ग्रथं स्वत: विकत घेऊन वाचावा.तो देव्हाऱ्यात ठेवून त्यावर रोज गंध व फुले वहावीत.घरात शांती चिरकाल
टिकते.
४. घरी आलेल्या अपरिचितास विन्मुख पाठवू नये. किमान अन्नदान करावे. तसेच दर प्रौर्णिमेला गाईला गोग्रास व कुत्र्याला चतकोर तरी भाकरी घालावी.
५. भोजनास बसताना जमिनीवर बसू नये.पाट, चटई किवां एखादे वस्त्र तरी घ्यावेच.
६. मांसाहार शक्यतो वर्ज्य करावा व मद्यपान निषिध्द.
७. स्त्रियांनी मासिक पाळीत पुजा करु नये.
८. रोज निदान ११ वेळा तरी गायत्री मंत्राचा रोज जप करावा.
९. 'अलख निरंजन"हा भगवान गोरक्षनाथांचा आदेश लक्षात ठेवून दिवसातून एकदा स्वत:ला ' मी कोण ?' हा प्रश्न वाचारावा.
१०. "श्रीदत्तयंत्र" नित्य पूजेत ठेवावे.
११. काही विशेष कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी दत्ताच्या तसबिराला तसेच, दत्तयंत्राला नमस्कार करावा. काम हमखास होतेच प्रत्येक दत्तभक्ताने हे लक्षात ठेवावे...
१२. दत्तभक्ताने गुरुचरित्राच्या किमान 5 ओव्या रोज वाचाव्या व वर्षांतून किमान 2 ..3 गुरुचरित्र सप्ताह पारायण करावे दत्तजयंती, गुरुपौर्णिमा व नृसिंह सरस्वती जन्म.
३. दत्त भक्ताने विचार व आचार पवित्र ठेवावे कायम भक्तीयुक्त अंतः करण ठेवावे . खरे तर मन असे असावे ..
ऐकावे दत्त बोलावे दत्त 
करावे दत्त स्मरावे दत्त
दत्ता ने हे जिवन व्यापले
दत्ता विना न जिवनात दत्त 
प पूश्रीपंत महाराज, बाळेकुंद्री म्हणत ...

*दत्त नाम जपा*
परात्पर दत्त नाम जपा 
दत्त नामामृत निशिदिनी पिऊनी 
पहा आत्मरुपा 
अनन्यभावे भजता पाय 
करी दयानिधी कृपा 
भक्ती रहस्य प्रगट दावुनी 
हरी पुण्य पापा 
नित्य नैमित्य कर्मे करुनि 
नका भरू मापा 
उपासनेचे मर्म जाणुनी 
चुकवा जन्म खेपा 
*नित्य निरंजन दत्त देखुनि निरंजनी हरपा”*

दत्तमहाराज यांचे काखेतील झोळी ....
दत्तमहाराज भक्तांचे दुःख अपल्या झोळीत भक्तांची दुःखे घेतात व भक्तांना सुख समृध्दी देतात"दत्तप्रभूंच्या झोळीत एक दिव्य शक्ती, ती म्हणजे अन्नपूर्णा देवीचे आशिर्वाद". 

दत्तगुरुंच्या झोळीत एक अशी दिव्य शक्ती आहे जी भक्तांना समृद्धी व शांती प्रदान करते. ती दिव्य शक्ती म्हणजे "अन्नपूर्णा देवीचे आशिर्वाद". 

ही झोळी एक साधारण झोळी नसून, ती एक असामान्य, दिव्य झोळी आहे जी केवळ भक्तांसाठीच खुली आहे. यामध्ये भक्तासाठी आशीर्वाद, कृपा, प्रेम, करुणा, ज्ञान, दिव्यता, ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी, निरंतर सहाय्य, संरक्षण, मार्गदर्शन, अध्यात्मिक उन्नती आणि शाश्वत मोक्ष आहे.  या झोळीत सर्व पापांचा नाश होतो, आणि भक्ताला जीवनातील कष्ट आणि अडचणींचा सामना करण्याची ताकद मिळते.

दत्तभक्त जेंव्हा शुद्ध मनाने आणि एकनिष्ठतेने दत्तगुरुंचा आश्रय घेतो, त्याला ज्ञान आणि अध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. दत्तगुरुंची झोळी केवळ भौतिक आशीर्वादां पर्यंतच सीमित नाही, ती आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनेही मार्गदर्शन करते. 

दत्तगुरुंच्या झोळीमध्ये एक आंतरिक शांती, योग्य दिशा, आणि आशीर्वाद असतात.
गुरुचरित्रातील आणि दत्तपुराणामध्ये अनेक कथा आहेत ज्यात दत्तगुरुंच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनातील विकार आणि दुःख दूर झाले असुन त्यांना अध्यात्मिक मार्ग मिळालेला आहे.

भक्ताच्या जीवनात जेव्हा अंधकार, दुख, कष्ट, आणि शंका असतात, तेव्हा दत्तगुरुंच्या कृपेचा अनुभव त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. 'दत्तगुरुंची झोळी' म्हणजे एक असामान्य शक्तीची प्रतिमा आहे, जी त्यांच्या कृपेने भक्तांना समृद्ध, सुखी आणि दिव्य जीवन देणारी आहे. अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने भक्त केवळ भौतिक स्तरावर समृद्ध होत नाही, तर त्याला आत्मिक शांती, मानसिक स्थिरता आणि आंतरिक परिपूर्णता मिळते.
विशेषतः घरात सुख-शांती आणि अन्नाच्या अभावाच्या संकटातून सुटका होते.

दत्तगुरुंच्या कृपेने भक्तांना आध्यात्मिक ज्ञान मिळवता येते, तर अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने भक्तांची भौतिक आवश्यकताही पुरवली जातात.  दत्तगुरु आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आत्मज्ञान देतात, तर अन्नपूर्णा माता भौतिक जगात समृद्धी, आनंद, आणि स्थिरता प्रदान करतात.

"दत्तगुरुंची झोळी" आणि "अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद" यांचा एक विशेष संबंध आहे. दत्तगुरुंच्या झोळीत आध्यात्मिक ज्ञान, मार्गदर्शन, आणि आशीर्वाद असतात, तर अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादात अन्न, भौतिक सुख, समृद्धी आणि शांतीचा अनुभव होतो. या दोन्ही देवता एकमेकांना पूरक ठरतात, आणि त्यांची कृपा प्राप्त करणारा भक्त पूर्ण जीवनाचे अनुभव घेऊन समाधानी, समृद्ध आणि सुखी जीवन जागु शकतो.

दत्तात्रेय
दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात.  त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा मजकूरानुसार भिन्न आहेत. हिंदू धर्मातील वेदांत - योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता (शब्दशः, "मुक्त आत्म्याचे गाणे") ही दत्तात्रेयांना समर्पत आहे. 
: सदा विजयते श्री नृसिंह सरस्वती
*म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ।
*दत्तनामाचा निजछंद । नामें प्रगटे परमानंद ॥
सर्व भक्तांना विनंती त्यांनी 'श्री दत्त जय दत्त 'हा जप अखंड  करावा आपले कल्याण होईल .

Thursday, May 22, 2025

सिद्धमंगलस्तोत्र व मतितार्थ

 सिद्धमंगलस्तोत्र  व मतितार्थ

(प्रासादिक सिद्ध उपासना )

श्रीगुरु श्रीपादराज

१)    श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
२)    श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
३)    माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
४)    सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
५)    सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
६)    दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
७)    पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
८)    सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
९)    पीठिकापूर नित्यविहारा मधुमतीदत्त मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनाघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात."

श्रीगुरु श्रीपादराजांचे सिद्धमंगल स्तोत्र: भावार्थ
श्रीगुरु श्रीपादराजांचा अवतार हा कुटूंबवत्सल दत्तात्रेयांचाच अवतार आहे.

पिठापूर येथील आपल्या १६ वर्षाच्या वास्तव्यात आपले वडील अप्पललक्षी नरसिंहराज शर्मा, आई सुमती महाराणी, आजोबा बापानाचार्य, आजी राजमांबा, मामा श्रीधरावधानी व आपली भावंडे श्रीविद्याधरी, राधा, सुरेखा व श्रीधरशर्मा, श्री नरसिंह शर्मा, कौटुंबिक स्नेही वेंकटप्पा श्रेष्टी व वेंकट सुब्बमांबा, नरसिंह वर्मा व अंमजम्मा यांचे अपार प्रेम मिळाले. या सर्वाबरोबर राहत असताना सर्वांचे श्रीपादराजांना प्रेम मिळत होते ते श्रीगुरूंच्या दिव्य अश्या तेजाने, त्याच्यातील बौद्धिक संपन्नेतेने. प्रत्येक घटनांचे ज्ञान, कर्माने विवरण करून त्याचा अर्थ समजावणे याचे प्रत्येकास कौतुक व आश्चर्य वाटत असे.

श्रीपादराज प्रत्यक्ष दत्तावतार आहेत हे त्यांच्या जन्माच्या अदभूत व दिव्य प्रसंगावरून सर्वाना लक्षात असले तरी, कुकुटेश्वर मंदिरातील काही ब्रह्मवृन्द व काही परिचित हे मानण्यास राजी होत नसत. त्यामुळे कायमच श्रीपादराजांच्या कुटूंबामध्ये खरेच हे श्रीदत्तप्रभू आहेत का हा प्रश्न पडत असे. सर्व कुटूंबामध्ये श्रीपादराजांना अत्यंत प्रिय अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे आपले आजोबा महापंडित श्री बापानाचार्य. वैदिक होमहवंन, याज्ञीक कर्मे, भविष्य कथन करताना आपल्या सत्यवाणीने, सात्विक आचरणाने सर्व जनाना मदत करण्यात कायमच पुढे असत. पीठापूरमधील इतर ब्रह्मवृंदासारखे दक्षिणेच्या मागे न लागता सर्व गरजूना वेळोवेळी धार्मिक उपदेश, अन्नदान करीत असत. सर्व जनतेचा लोभ असल्याने त्यांना सत्यऋषीश्वर असे ही म्हणत असत. श्रीपादराज दुसऱ्या वर्षांपासून श्री बापानाचार्य यांच्या कडेवर बसून गावात फिरत असत. वेळोवेळी आपल्या नातवाची श्रीपादराजांची अनुभूती श्री बापानाचार्याना मिळत होती. आपल्या नातवाचे लाडिक असे श्रीहरीचेच रूप दररोज ते डोळ्यात साठवीत होते.

एकदा श्रीपादराजाच्या वाढदिवशी (भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीस) श्री बापानाचार्य आपल्या लाडक्या श्रीपादराजास मांडीवर घेऊन बसले असताना त्यांनी चरण कुरवाळले. त्या तेजस्वी पाऊला मध्ये त्यांना शुभचिन्हाची मालिका दिसली. त्यांनी आपल्या नातवाच्या चरणांचे चुंबन घेतले आणि श्रीदत्तप्रभूंचे दर्शन झाले. श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाने त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटना ही स्पष्ट दिसू लागल्या. त्यांनी लाडक्या श्रीपादराजांच्या कौतुकाचे कवन गाण्यास सुरुवात केली. हेच ते सिद्धमंगल स्तोत्र आहे. हे समजावयास, अर्थाने सोपे आहे. तरीही भावार्थ लिहायची मनीषा झाली. जसा भावार्थ समजला तसा लिहिला आहे. याच्या पठणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे याचे पावित्र्य आहे.

हे सिध्द्यमंगल स्तोत्र पठण करण्यास स्थळ, काळ, वेळ याचे बंधन नाही.

श्री मदनंत श्री विभूषित अपल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्रीपादराजांचा गौरव करताना श्री अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा यांना श्रीपादराजांचे वडील म्हणून त्यांनाही गौरविले आहे. श्री बापानाचार्य यांना श्रीगुरु श्रीपादराज हे दत्तप्रभूंचेच अवतार आहेत हे लक्षात आले व हेच श्री अनंत हरीनारायण म्हणून त्यांनी "श्री मदनंत" हे नामविशेषण वापरले आहे. श्री दत्तप्रभूंचा साक्षात्कार झाला आणि सर्व विकल्प दूर झाले. श्रीपादराज हेच श्रीगुरु आहेत जे "श्री विभूषित" आहेत. "श्री विभूषित" याचे वर्णन करण्यास शब्द ही अपुरे पडतील. पण थोडक्यात मोजक्याच शब्दात असे वर्णन करता येईल.

श्रीगुरु हेच सर्व चराचराचे, सर्व सजीवनिर्जीव घटकांचे स्वामी ज्यांनी पूर्ण ब्रह्माण्ड व्यापले आहे. श्रीगुरुचे गुरुतत्व आत्मस्वरूप, आनंदस्वरूप व ब्रह्मानंदस्वरूप आहे. श्रीगुरुमध्ये गणेशस्वरूप व सकाळ देवतांचे स्वरूप असून श्रीगुरुना आदीअंत नाही. बुद्धीदाता, ज्ञानदाता, भोगदाता, मोक्षदाता,परमसुखदाता, त्रिगुणरहित, निर्गुण, निराकार, निर्मल, निश्चय व नित्य अस्तित्त्वाचे चैतन्य असून गुरुकृपेशिवाय या जगतामध्ये काहीच साध्य नाही. 

श्री गुरुज्ञानाशिवाय व श्रीगुरुसेवेशिवाय या जगतात श्रेष्ठ असे काही नाही. श्रीगुरुच्या चरणकमलाचा एक स्पर्श आत्म्यासाठी ब्रह्मासाक्षात्कारच आहे. श्रीपादराजांचे पिताश्री श्रीअप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा हे पण एक वैदिकपंडित. नित्य कालाग्नीशमन दत्ताची उपासना करताना नित्य श्रीदत्तगुरूंशी संवाद घडत असे इतके महान पुण्य त्याच्या गाठीशी होते.

अश्या श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे. थोडक्यात श्रीगुरु श्रीपादराजांचे नाव घेताना सर्वांचे कल्याण होवो हीच सद्भावना श्री बापानाचार्य व्यक्त करतात.

श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपल्या सर्व नातवंडाचा उल्लेख करतात. श्रीगुरु श्रीपादराजांचे बहीण व बंधू असणे हा केवढा मोठा सन्मान आहे हा आनंद श्री बापानाचार्य शब्दातून व्यक्त करंतात. श्रीगुरु श्रीपादराजांच्या तीन बहिणी श्रीविद्याधरी, राधा, सुरेखा व श्री ( दोन बंधू श्रीधरशर्मा व श्री नरसिंह शर्मा जे शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत) यांनाही श्रीपादराजांमुळे कृपा प्राप्त होणार आहे हा विश्वास आजोबा म्हणून श्री बापानाचार्य यांना आहे. राखीधर याचा उल्लेख केवळ राखी बांधणारा बंधू नसून आत्म्याचे दुष्ट प्रवृत्तीपासून रक्षण करणारा श्रीगुरु श्रीपादराजांच्या स्वरूपात आहे हे कौतुक श्री बापानाचार्य यांना आहे.

सर्वांचे रक्षणकर्त्या श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपल्या लाडक्या मुलीचा सुमती महाराणीचा उल्लेख करतात. श्रीगुरु श्रीपादराजांचे वडील श्रीअप्पललक्षी नरसिंहराज शर्मा हे वैदिकपंडित असल्याने धार्मिक कार्य करताना त्या धार्मिककार्याचे मूल्य जेवढे होत असे तेवढेच घेत असत. विनाकार्य कुठलेच दानही घेत नसत. त्यांमुळे काही वेळा घरामध्ये अन्नाची विवंचना होत असे व अन्नसामुग्री उधारीवर आणवी लागत असे. बालपणी श्रीपादराजांना भूक लागल्यावर ते सरळ श्री कालाग्नीशमन दत्तात्रेयासमोर ठेवलेले दुधाचे भांडे पिऊन टाकत असत. श्री कालाग्नीशमन दत्तात्रेयांना नैवेद्य नाही म्हणून पिताश्री व आई त्या दिवसाचा उपवास धरत असत. आई सुमतीने आपल्या लाडक्या श्रीपादाचे हट्ट आपल्या वात्सल्यानेच पुरविले. श्री बापानाचार्य यांच्या डोळ्यासमोर सर्व घडत होते.

मातृवत्सल श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापानाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयी भव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपला स्वतःचा व सुमती महाराणीचा उल्लेख करतात. आपली मुलगी सुमती हिचा पुत्र श्रीगुरु श्रीपादराज आहे हा आनंद व अभिमान श्री बापानाचार्य यांना आहे. अश्या श्रीचरणाचे कायमच दर्शन घेणे, श्रीचरणावर आपले हात फिरविणे, श्रीचरणाचे चुंबन घेणे ही बापानाचार्य यांच्यासाठी कृपेचे अगणित असे समाधान होते. आपल्या वडिलांचा आनंद बघून सुमती महाराणीस बाल श्रीपादाचे कौतूक वाटत असे.

श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

सावित्री काटकचयन पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य , सावित्री शक्ती व भारद्वाज महर्षीं यांचा उल्लेख करतात. श्रीगुरुदत्तात्रेयाचा कलियुगात श्रीपादश्रीवल्लभ अवतार पीठिकापूर येथे होण्यासाठी त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटक यज्ञ करून सावित्री शक्तीची पूजा केली होती. सावित्री शक्ती जी चराचरातील स्थिती, लय घडविणारी शक्ती आहे तिला प्रसन्न करून श्री दत्तप्रभूंनी जनकल्याणाकरिता श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घ्यावा असे विनविले होते.

सावित्रीगायत्रीस्वरूप श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

"दो (२) चौ (४) पती (९) लक्ष्मी (८)" याचा श्रीगुरु श्रीपादराज भिक्षा मागत असताना होऊन "दौ चौपाती देव लक्ष्मी" असा झाल्याने या चरणाची सुरुवात अशी झाली आहे. ही २४९८ संख्या असून गायत्री स्वरूप आहे.

२ ही संख्या सृष्टीतील सर्व द्वंदाचे प्रतीक आहे.

४ ही संख्या देहाचे स्थूल, सूक्ष्म, कारण व कारणदेह अशी प्रतिके दर्शवितात.

९ ही संख्या परमात्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे. (९ ला कुठल्याही संख्येने गुणल्यास, त्या संख्येची बेरीज ९ च येते).

८ ही संख्या लक्ष्मीची आहे जी मायास्वरूप आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्यास लहान करून दाखवण्याची, शक्ती हरण सामर्थ्य करण्याचे तिच्यामध्ये आहे. (८ ला १, २, ३, ४, ५ संख्येने गुणल्यास येणारी संख्या कमी कमी होत जाते).

परमात्मस्वरूप श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

पुण्यरूपिणी राजमांबासूत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य आपल्या पत्नीचा राजमांबा व सुमतीचा उल्लेख करतात. श्रीगुरु श्रीपादराज्यांचा जन्म ज्योतिरूपाने सुमतीच्या उदरातून होऊन आता ती "गुरुमाता" आहे हा आनंद श्री बापानाचार्य यांना आहे. आपली पत्नी राजमांबा हिने सुमतीस जन्म देऊन उपकारच केले आहेत. आपल्या आचरणाने आपली पत्नी राजमांबा ही पुण्यरूपिणीच आहे

श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य श्रीपादराजांच्या आई वडिलांचा उल्लेख करतात. आपला नातू श्रीपादराज हा आपले जावई नरहरीशर्मा व मुलगी सुमती यांचा पुत्र असून साक्षात दत्तप्रभूच आहे. ही सर्व दत्तप्रभूंचीच कृपा आपल्यावर आहे हा आनंद श्री बापानाचार्य यांना आहे.

श्रीगुरु श्रीपादराजांचा जयजयकार सर्व खंडात (ब्रह्माण्डा मध्ये) घुमू दे.

पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा ।
जय विजयीभाव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्री विजयीभव ।।

या चरणामध्ये श्री बापानाचार्य यांनी आपल्या ग्रामाचा पीठिकापूरचा उल्लेख केला असून श्री बापानाचार्यानी पुढील भविष्यात घडणारे भाकीतच केले आहे. मधुमती हा एक यॊगाचा प्रकार असून श्रीपादराज कायमच पिठीकापुरमध्ये गुप्त रूपाने राहणार आहेत तसेच श्रीगुरु श्रीपादराज आपल्या मंगलमय दत्तस्वरूपाने अनेक भक्तांचे कल्याण करणार असून जश्या मधुमाश्या मध आणून मधाचे पोळे तयार करतात तसे भविष्यात अनेक भक्त पीठिकापूर येथे आकर्षित होणार असून भक्तिभावाचे मोठे श्रीपादश्रीवल्लभ संस्थांन श्रीपादजन्मगृहामध्ये होणार आहे. जसे शुद्ध मधाची गोडी असते तसेच शुद्ध भक्तीची गोडी ही श्रीगुरु श्रीपादराजांच्या सेवेमध्येच आहे. असाही अर्थ आहे.

आता श्रीगुरु श्रीपादराजाना पीठिकापूरमध्ये अवतारित होऊन १६ वर्षे झाली होती. सर्व कुटुंब, स्नेही आज श्री बापानाचार्य यांच्या घरी जमले होते. आपले मंगलमय दत्तस्वरूप सर्वाना दाखवून सर्वजण निशब्द व भावविभोर झाले. आनंदाश्रूंचा अभिषेक श्रीगुरुच्या चरणावर सुरु झाला. आपल्या कृपाकटाक्षाने बंधूंच्या व्याधी घालवून त्यांना ज्ञानाचे तेच प्रदान केले. आता कुरवपूर येथे प्रस्थान करावयाचे होते. सर्वावर आपली कायमच कृपा आहे व आपली आठवण काढल्यास कधीही आपण पीठिकापूरमध्ये येऊ असा विश्वास सर्वाना दिला.

आपल्या लाडक्या आजोबांना श्रीपादराजांनी सांगितले होते कि माझा पुढील अवतार श्रीमद नरसिह सरस्वती असून ते रूप आजोबांचेच असणार आहे. पीठिकापूरमध्ये आपण दोघेही एकत्र मूर्तिस्वरूपात असू. एवढे प्रेम श्रीपादराज आपल्या आजोबासाठी व्यक्त करतात.

हे सिद्धमंगल स्तोत्र श्री क्षेत्र नरसोबावाडीस म्हणताना अति आनंद होतो. ज्या आजोबानी हे रचले त्याच्यांच रूपामध्ये श्रीपादराजांना बघताना धन्य वाटते.

श्रीगुरुबरोबर असाच कधीकधी संवाद सुरु असतो. एकदा मी श्रीपादराजांना म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहेच पण तुमचे आजोबा श्री बापानाचार्यलू हे मला जास्त आवडतात. एवढे महापंडित, प्रेमळ, सतत कडेवर फिरवणारे, तुमचं कौतूक आपल्या कवनाने करणारे आजोबा प्रत्येकास हवेहवेसे वाटतात.

श्रीगुरूंच्या भक्तीसाठी विदुषी किशोरीताईंच्या "बोलावा विठ्ठल" या रचनेवर लिहिले गेले शब्द हेच आपल्या सर्वाचं मन:र्पण असेल.

बोलावा श्रीपाद पाहावा श्रीपाद । करावा श्रीपाद जीवभाव ।।
मन हे गुंतुनी उडीले पिठापुरी । पादुका समीप देह विसावे ।।
श्रीगुरु नयनी पाहता दर्शनी । देह वेगे धावे गुरु आलिंगूनी ।।
मन धरी दत्त स्मरिला श्रीपाद । अमृत वर्षाव देहावरी ।।

।।  श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ।।

।। नमो गुरवे वासुदेवाय ।। ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। ।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।

श्री सिद्धमंगल स्तोत्र व श्रीपादश्रीवल्लभ चारितामृत
सिद्धमंगल  स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात," श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी "सिद्धमंगल" स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल. या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या ह्रदयावर अंकित झाले आहे. परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणार्‍या सिद्धी प्राप्त होतात.

Tuesday, May 20, 2025

वसंत पंचमीचे महत्व काय ?

 


वसंत पंचमीचे महत्व काय ?


माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात.  वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूनां कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे.

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. स्वत:च्या आगळया सौंदर्याने तो माणसाला स्वत:कडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे. मानवाने स्वत:च्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक असा अजब जादूगार आहे की, जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो. निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो.

वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वत:च्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.

वसंत म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्या साधनांचे फारच महत्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखील वर पाहू नये इतका जडही असत नाही.

जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो संत! यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव जीवन आणि कवन, भक्ती व शक्ति, सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य्, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसन्ताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल.

भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.

कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.  मथुरा,  वृंदावन,  राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी  गणपती,  इंद्र,  शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढली जाते.

कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि  प्रार्थना  करत असत.

वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.

या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.

देवी सरस्वती ज्ञान, बुद्धी, कला व संगीताची देवी आहे. देवी सरस्वतीच्या उपासनेने मूर्ख व्यक्तीसुद्धा विद्वान बनू शकतो. विश्वविजय सरस्वती कवचाचे व नामावलीचे नियमित पाठ केल्यास साधकाला विविध लाभ होतात. विद्यार्थ्यांसाठी हे विशेष लाभदायक सरस्वती कवच आणि सरस्वती नामावली आहे.

धर्मशास्त्रानुसार देवी सरस्वतीचे हे कवच धारण करून महर्षी वेदव्यास, ऋषी श्रुंग, भारद्वाज, देवल तसेच जैगीषव्य इ. ऋषींनी सिद्धी प्राप्त केली आहे.

विश्वविजय सरस्वती कवच...

श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा शिरो मे पातु सर्वत: |
श्रीं वाग्देवतायै स्वाहा भालं मे सर्वदावतु ||
ऊँ सरस्वत्यै स्वाहेति श्रोत्र पातु निरन्तरम् |
ऊँ श्रीं ह्रीं भारत्यै स्वाहा नेत्रयुग्मं सदावतु ||
ऐं ह्रीं वाग्वादिन्यै स्वाहा नासां मे सर्वतोवतु |
ह्रीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा ओष्ठं सदावतु ||
ऊँ श्रीं ह्रीं ब्राह्मयै स्वाहेति दन्तपंक्ती: सदावतु |
ऐमित्येकाक्षरो मन्त्रो मम कण्ठं सदावतु ||
ऊँ श्रीं ह्रीं पातु मे ग्रीवां स्कन्धं मे श्रीं सदावतु |
श्रीं विद्याधिष्ठातृदेव्यै स्वाहा वक्ष: सदावतु ||
ऊँ ह्रीं विद्यास्वरुपायै स्वाहा मे पातु नाभिकाम् |
ऊँ ह्रीं ह्रीं वाण्यै स्वाहेति मम पृष्ठं सदावतु ||
ऊँ सर्ववर्णात्मिकायै पादयुग्मं सदावतु |
ऊँ रागधिष्ठातृदेव्यै सर्वांगं मे सदावतु ||
ऊँ सर्वकण्ठवासिन्यै स्वाहा प्राच्यां सदावतु |
ऊँ ह्रीं जिह्वाग्रवासिन्यै स्वाहाग्निदिशि रक्षतु ||
ऊँ ऐं ह्रीं श्रीं क्लीं सरस्वत्यै बुधजनन्यै स्वाहा |
सततं मन्त्रराजोऽयं दक्षिणे मां सदावतु ||
ऊँ ह्रीं श्रीं त्र्यक्षरो मन्त्रो नैर्ऋत्यां मे सदावतु |
कविजिह्वाग्रवासिन्यै स्वाहा मां वारुणेऽवतु ||
ऊँ सदाम्बिकायै स्वाहा वायव्ये मां सदावतु |
ऊँ गद्यपद्यवासिन्यै स्वाहा मामुत्तरेवतु ||
ऊँ सर्वशास्त्रवासिन्यै स्वाहैशान्यां सदावतु |
ऊँ ह्रीं सर्वपूजितायै स्वाहा चोध्र्वं सदावतु ||
ऐं ह्रीं पुस्तकवासिन्यै स्वाहाधो मां सदावतु |
ऊँ ग्रन्थबीजरुपायै स्वाहा मां सर्वतोवतु ||

(ब्र. वै. पु. प्रकृतिखंड ४/७३-८५)

*सरस्वती देवीची नामावली*

वरील कवचाप्रमाणे सरस्वती देवीची नामावली देखील विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.

प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती |
तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी ||
पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा |
सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी ||
नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी |
एकादशं चन्द्रकान्तिर्द्वादशं भुवनेश्वरी ||
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः |
जिह्वाग्रे वसते नित्यं ब्रह्मरूपा सरस्वती ||