श्री गणेश जयंती ...अर्थात बाप्पाचा वाढदिवस ..
गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो.[१] या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.[२][३] या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते.[४] माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी प्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला ही विनायकी चतुर्थी ही तिथी असते .[५] या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखविला जातो.[६]
खरेतर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. गणेश भक्तांत संकष्ट चतुर्थी प्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व दिले जाते. गणेश जयंती (शब्दशः "गणेशाचा वाढदिवस", ज्याला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातही माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी (उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा मेणाचा चंद्र) पंचांगानुसार साजरा केला जातो, जो ग्रेगोरियन कॅलेंडर संबंधित आहे.
यावर्षी दिनांक १फेब्रुवारी .. गणेश जयंती हा पवित्र महोत्सव आहे .तसे पाहिले तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. गणेश जयंती व गणेश चतुर्थी या दोन्ही विनायकी चतुर्थी असतात. गणेश भक्तात संकष्ट चतुर्थी प्रमाणेच या दिवसाला देखील महत्त्व दिले जाते. . या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा जन्म दिवस साजरा केला जातो. हा एक लोकप्रिय महोत्सव आहे.
गणेश पूजेची पद्धत...
*तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून लाल रंगाचे शुद्ध वस्त्र परिधान करावे. यानंतर आसनावर बसून श्री गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी प्रथम ११ ,२१ किंवा १०८ गणपती अथर्वशीर्ष आवर्तने करावी . नारद विरचीत संकटनाशन स्तोत्राची ही आवर्तने करावी श्री गणेशाला धूप दिवा दाखवावा. फळे, फुले, तांदूळ, , अर्पण करा. पंचामृताने स्नान केल्यानंतर गणेशाला तीळ आणि गुळाच्या वस्तू अर्पण करा. श्री गणपतीस तांबडी फुले ,मंदार गुलाब शमी दूर्वा बिल्वपत्र वाहव्यात . पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवा. पूजेनंतर 'ॐ श्रीगणेशाय नम:' किंवा "ओम गं गणपतये नमः " चा १०८ वेळा जप हीकरावा.....
गणेश जन्माच्या व्रताच्या निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र गणपती मंदिरे व मंडळाचे गणपती येथे धार्मिक कार्यक्रम उदा. गणेश याग ,अथर्वशीर्ष आवर्तने उपासना व वैविध्यपूर्ण सजावट केली जाते.
गणेश जयंती आणि अधिक लोकप्रिय, जवळजवळ संपूर्ण भारतीय गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक हा आहे की नंतरचा सण ऑगस्ट/सप्टेंबर भाद्रपद हिंदू महिना मध्ये साजरा केला जातो. एका परंपरेनुसार, गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवसही मानला जातो. गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिलो चौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते. याला महाराष्ट्रात तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.
या दोन्ही चतुर्थी बाबत समाजात एक मान्यता आहे.प्राचीन प्रथांनुसार, गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे, ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी सेट केला आहे. जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहतो, त्याला मिथ्या दोष नावाच्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी चोरीचा आळ येतो अशीही समाजात धारणा आहे. चुकून एखाद्या व्यक्तीला चंद्र दिसला तर खालील मंत्राचा जप केला जातो.
सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जाम्बवता हतः।
सुकुमारक मारोदीस्तव ह्येषा स्यामंतकः॥
नंदीने सनतकुमार ऋषींना सांगितलेली एक आख्यायिका म्हणून, भगवान कृष्णावर स्यमंतक नावाचे एक मौल्यवान रत्न चोरल्याचा आरोप होता, कारण त्याने भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र पाहिला - जो निषिद्ध होता. देवऋषी नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माघ शुक्ल चतुर्थी किंवा गणेश जयंतीचे व्रत पाळले आणि चोरीच्या आरोपातून सुटका झाली.
या व्रतामध्ये दानाचे महत्त्व जाणून घ्या...
*माघ महिन्यामुळे या चतुर्थीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीगणेशाला तिळाचे लाडू अर्पण केले जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून वाटप केले जाते. विशेषत: या दिवशी अन्नदान केले जाते. या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे पुण्यकारक मानले जाते.....
महाराष्ट्रात ही गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते.
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. म्हणजे वर्षातून तीन वेळेस गणेश जयंती साजरी केली जाते . पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘पुष्टिपती विनायक जयंती’ म्हणून आपण साजरा करतात . दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘श्रीगणेश चतुर्थी’ म्हणून पार्थिव गणेश पूजन केले जाते . तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘गणेश जयंती’ म्हणून आपण साजरा करीत असतो.
या माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीच्या गणेशमूर्तींची पूजा केली जाते, तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे याबद्दलही काहीही नियम नाहीत .आजकाल काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.
गणेश जयंतीच्या दिवशी धुढिराजाचे पूजन करावे आणि तीळसाखरेचे किंवा तीळगुळाचे मोदक अर्पण करावेत . दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्रतारका दिसू लागल्यावर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाचा मुलगा म्हणून ‘विनायक’ या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे.
या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तीळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते, अशीही उपासकांची श्रद्धा आहे.
: प्राचीन प्रथांनुसार, गणेश जयंती तसेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहण्यास मनाई आहे, ज्यामध्ये प्राचीन पंचांगांनी निषिद्ध कालावधी नक्की केला आहे. जो व्यक्ती या दिवशी चंद्र पाहतो, त्याला मिथ्या दोष नावाच्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो.
थोडक्यात सर्व गणेशाची आराधना व उपासना करून पुण्यप्राप्ती करावी गणेशास आवडता मोदकाचा प्रसाद अर्पण करावा व संसारात सुख व समृधी प्राप्त करून घ्यावी
।। शुभम भवतु ।।
No comments:
Post a Comment