दीपावली विशेष अंतीम पुष्प .
बहीण भावाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा महोत्सव ----भाऊबीज
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याला भाऊबीजेच.निमित्त..काय आहे यम द्वितीयेचे औचित्य ...
सूर्याच्या अपत्यांपैकी दोन अपत्ये म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहीत होते की, तो मृत्यूची देवता आहे, आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको, म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा.*
यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली.
*त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!
*यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेनेे त्याचे आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले. यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने... माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून?
तेव्हा यमुना म्हणाली, "मला तर कसली कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल, त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको."
सूर्याच्या अपत्यांपैकी दोन अपत्ये म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहीत होते की, तो मृत्यूची देवता आहे, आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको, म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा.*
यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली.
*त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!
*यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेनेे त्याचे आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले. यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने... माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून?
तेव्हा यमुना म्हणाली, "मला तर कसली कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल, त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको."
यम तिला तथास्तु म्हणतो, म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात.
*या दिवशी बहीण भावाला ओवाळते. आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, आणि आलेल्या संकपासून त्याचे रक्षण व्हावे, हाच यामागील उदात्त उद्देश आहे.*
यमराज त्यांच्या बहिणी कडून झालेला आदरसत्कार पाहून ते खुप प्रसन्न झाले ।
तेव्हा यमराजाने हे वरदान दिलं की या दिवशी जो भाऊ तिच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ति मिळेल आणि मोक्ष मिळेल तेव्हापासुन हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
त्या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची परमेश्वराला प्रार्थना करतात
भाऊबीज या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.
*या दिवशी बहीण भावाला ओवाळते. आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, आणि आलेल्या संकपासून त्याचे रक्षण व्हावे, हाच यामागील उदात्त उद्देश आहे.*
यमराज त्यांच्या बहिणी कडून झालेला आदरसत्कार पाहून ते खुप प्रसन्न झाले ।
तेव्हा यमराजाने हे वरदान दिलं की या दिवशी जो भाऊ तिच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ति मिळेल आणि मोक्ष मिळेल तेव्हापासुन हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
त्या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची परमेश्वराला प्रार्थना करतात
भाऊबीज या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.
आपण सर्वजण या दीपोत्सवाची सांगता एक दृढ निश्चयाने करूयात .नातेसंबंध दृढ करू .एकमेकात प्रेम वाढवुन आपले जीवन समृद्ध करू . यश कीर्ती व धन आपोआप येईल.शुभम भवतु.
एकच दृढ संकल्प ...श्वासे श्वासे दत्तनाम.

No comments:
Post a Comment