Sunday, August 31, 2025

गणेशोत्सव विशेष - गणपतीला शेंदूर , शमी व दुर्वा का वाहतात ? यामागे काय कथा आहेत ? - पुष्प १४

||ओम गं गणपतये नमः||
 
गणेशोत्सव विशेषपुष्प १४

गणपतीला शेंदूर , शमी दुर्वा का वाहतात ? यामागे काय कथा आहेत ?

शमी का वाहतात : सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवाला अर्पण करतात. परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता. श्रीगणेश पूजेने घर-कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते.   काही ज्ञानी व शास्त्र अभ्यासक यांच्यानुसार श्रीगणेश पूजेमध्ये शमीच्या पानांसोबत तांदुळ, फुल आणि शेंदूरही अर्पण करावा.
या दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा...

मंत्र-
त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै। 
शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।
 

श्रीगणेशाला शेंदूर अर्पण का करावा? 

विविध देवी-देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदूराचेही विशेष महत्त्व आहे. विशेषतः शिव कुटुंब आणि महादेवाच्या सर्व अंश अवतारांवर शेंदुर अर्पण करण्याचे महत्त्व आहे. यामागील मान्यता अशी आहे की, शेंदूर महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या पारा  धातूपासून बनते. महादेवाचे पुत्र शिगणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. खालील मंत्राचा उच्चार करत श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावा..
 
 
मंत्र-
सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। 
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्।।

दुर्वांची महती  काय आहे ? किती वाहव्या ?

 दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण; , महत्त्व, मान्यता आणि कथा
: महादेव शिवशंकरांच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे; श्रीविष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे; त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. दुर्वा पूजनात एवढी का महत्त्वाची आहे? जाणून घेऊया...
   माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे. मात्र, अनेकार्थाने भाद्रपदातील चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यंदा ,शनिवार ७ सप्टेंबर  २०२४ रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे.
 
एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला, अशी एक मान्यता आहे. या दिवशी विधीपूर्वक गणेश पूजन केले जाते. . गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. 
 
२१ दुर्वांच्या २१ जुड्या
 
गणपतीचे पूजन करताना २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो. मात्र, गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक कथा सांगितली जाते. गणेश पुराणातील एका कथेनुसार, कौण्डिन्य ऋषींच्या पत्नींनी गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या, त्याची तुलना कुबेराच्या धनाशीही होऊ शकत नाही, असे नोंदवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रांमध्ये दुर्वांची अद्भूत महिमा वर्णन करण्यात आली आहे. श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी साजरी केली जाते.
 
अनलासुर राक्षसाची कथा
 
एका पौराणिक कथेनुसार, एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या मनोभावना बोलून दाखवली. यावर, पण म्हणून माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग कशाला, असे तिने रागाने विचारले. तेव्हा अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला. हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस, म्हणून मी तूला खाऊन टाकतो. त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला.
अनलासुर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. विष्णूंनी सर्व देवतांना अभय दिले. तेवढ्यात तेथे अनलासुर आला. त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाला. हे विष्णू, आपण माझे स्मरण का केलेत, असे विचारत असतानाच अनलासुराने काही देवांना पकडले. सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. गजानन मात्र जागचा हलला नाही. मग अनलासुराने गजाननाकडे मोर्चा वळवला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलले. तो गणपतीला गिळंकृत करणार तोच सर्व देवांनी हाहाःकार केला. अनलासुराच्या हातातील त्या बाल गजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले. ते रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले.
 
गणपतीच्या सर्वांगाचा दाह
अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. गणपती स्वःच त्रासात आहे, असे समल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपचार सुरू केले. गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे, म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरू झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना.
 
२१ दुर्वांची जुडी कामी
ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. पण कशाचाही उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह होत राहिला. गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे, ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. गजानन म्हणाला की, माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली. म्हणून मला दूर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्‍तींची सर्व पापे नष्ट होतील. ती व्यक्ती बुद्धिमान होईल. असा गणपतीने वर दिला .
हे गणेश पुष्प  गिरिजात्मक गणपती चरणी विश्वकल्याणाचे कामनेसह श्रद्धापूर्वक समर्पण .
|शुभम भवतु । कल्याण मस्तु ।।
 

Saturday, August 30, 2025

गणेशोत्सव विशेष. - घालीन लोटांगण व मंत्र पुष्पांजली - पुष्प १३

 

।। ओम गं गणपतये नमः ।।

गणेशोत्सव  पुष्प १३


💐विषय ...घालीन लोटांगण व  मंत्र पुष्पांजली  💐
आरतीनंतर म्हणले जाणारे  घालीन लोटांगण या पदाची उत्पत्ती......'घालीन लोटांगण' भजनाची पदं एका कवीची नाहीत? 'घालीन लोटांगण'च्या चार कडव्यांचे चार वेगवेगळे कवी आहेत? हे प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल. याबाबत कदाचित कधी फारसा विचारही केला नसेल. मात्र घालीन लोटांगण हे पद सर्व देवांचे आरती नंतर म्हणले जाते .

देवाची आरती झाली, की सगळे जण तल्लीन होतात ते घालीन लोटांगणाच्या तालावर. पण या भजनात असलेली चारही कडवी एकाच कवीच्या लेखणीतून उतरली नसल्याचं समोर आलं आहे.  प्रत्येक कडव्याचा इतिहास जाणून घेतला, तर ही गोष्ट लक्षात येईल.




घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा |

पहिलं कडवं लिहिलं आहे संत नामदेव यांनी. म्हणजेच हे कडवं 13 व्या शतकात लिहिलं गेलं आहे.

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव |

दुसरं कडवं 'त्वमेव माता पिता त्वमेव....' हे आहे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातलं. म्हणजेच ते आठव्या शतकात लिहिलं गेलं आहे.

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि 

तिसरं कडवं आहे 'कायेनं वाचा मनसेंद्रीयेव्रा...' हे कडवं आहे श्रीमदभगवत पुराणातलं. त्यामुळे त्याचं शतक नेमकं सांगता येणार नाही.

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे

चौथं कडवं आहे 'अच्युतम केशवम'... हे आहे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टममधलं आहे. म्हणजे तेही आठव्या शतकातलं आहे.

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे | 

या भजनाचा समारोप आहे 'हरे राम हरे राम...' म्हणजे हे पद ख्रिस्त जन्माच्या 1500 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं आहे.

हे पद एकट्या देवासाठी नाहीच, तर ते प्रत्येक देवतेसाठी आहे. ते एकाने नाही, तर चार वेगवेगळ्या कवींनी लिहिल्याचं सिद्ध होत आहे. बाप्पाच्या भजनाचं हे मिश्रण श्रवणीय आहे. ते गाताना भक्त तल्लीन होतात. रचना कुणाचीही असो, कुणासाठीही असो. ती मनोभावे केली, तर देवापर्यंत पोहोचतो.

💐 मंत्र पुष्पांजली बद्दल थोडंसं -

भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे , म्हणून एक दिवस प्रजेने राजाला राजपदावरून बेदखल केलं. राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं. 

खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा खाणिनेत्राला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे खाणिनेत्राला वारंवार आक्रमणांच्या संकटाला तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने चांगले राज्य केले.

या खाणिनेत्राचा मुलगा आविक्षित प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.

“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित 
“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त

हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.

भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय ?
त्यानी प्रजेसाठी खूप अडचणींना तोंड देत एक मोठ्ठ यज्ञ केला.

यज्ञ म्हणजे अनेकांच्या भल्यासाठी केलेलं  पवित्र कृत्य .

यज्ञकुंड , समिधा, धूर , मंत्रोच्चार ही कर्मकांडाची अर्थहीन प्रतीकं फक्त आता उरली आहेत, आणि मूळ यज्ञ संकल्पना लोप पावली आहे हा खेदाचा विषय आहे.

यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक टीम बनते. या टीम मधले सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार,तज्ञ,कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या ग्रुपच्या। नेतृत्वाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ म्हणजे विहित कर्म करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे,डोंगरावर झाडी लावणे , जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे , शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.
यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म ! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.

तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी( इंद्र आदि देवांनी ) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी  सल्ला , मंत्रणा  द्यायचं मान्य केलं.
समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळु हळु मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून , त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ यशस्वी केला.

यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” - अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.

अशाप्रकारे “ यज्ञेन....” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याण कारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता ( कुबेर म्हणजे संसाधन विपुलता)  राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.

असा हा मंत्र पुष्पांजली चा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा सुख संपन्न समाज, देश आणि विश्व बनवण्याचा परंपरा प्राप्त मार्ग वारंवार मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्र पुष्पांजली आहे.

मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात.
मंत्रपुष्पांजली शिवाय पूजेची सांगता होत नाही.

असा हा मंत्र खाली दिलाय स्पष्ट उच्चार करण्यासाठी.

प्रथम:
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||

द्वितीय:
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।

तृतीय:
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

चतुर्थ:
ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥

               🙏🍁🙏

Friday, August 29, 2025

गणेशोत्सव विशेष. - आरती एक प्रासादिक उपासना .पुष्प - १२

।। ओम गं गणपतये नमः ।।

गणेशोत्सव  पुष्प  - १२

विषय .. आरती एक प्रासादिक उपासना.

💐💐आरतीचे महत्त्व  💐💐

आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या भक्ताने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या भक्ताला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’ 
उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.
एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने, म्हणजे अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धान्त सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते. याच उद्देशाने  येथे आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.
उपासना करतांना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते; कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते. 

आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरती पूर्वी अन् नंतर काय करावे आदींविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात.*

आरती कशी म्हणावी ?

*आरती करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे 'आरती'. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश नि:संशय सफल होतो,*
पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजे अंत:करणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. 

त्यासाठी आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे, काय आवश्यक आहे?

देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी.
आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा.आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात. टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. असल्यास टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वतरुळाकृती फिरवावे. आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.
आरती झाल्यानंतर 'घालीन लोटांगण..' ही प्रार्थना म्हणावी.

*१. ‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.*
*२. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.*
*३. आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्र-दृष्ट्या योग्य असावा.*

आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.*
*१. प्राथमिक अवस्थेतील साधक : ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.*
*२. पुढच्या अवस्थेतील साधक : टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.*
*३. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत.*
*. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
*. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.

*आरती म्हणत असतांना देवाला ओवाळावे.*
१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावी.
ऊ. ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
ए. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
ऐ. कापूर-आरती ग्रहण करावी.
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
ओ. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
औ. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.

अं . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
क. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
ख. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।

अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी आरती / पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.

ग. नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
घ. त्यानंतर तीर्थ प्राशन करून विभूती (उदबत्तीची राख किंवा भस्म) भ्रूमध्यावर लावावी.

💐आरती झाल्यावर स्वत:भोवतीच का फिरायचे?*
एकतर त्यात आत्मसन्मान आहे. पूजनाचे, दर्शनाचे, श्रीसेवेचे हे भाग्य आपल्याला लाभले
यासाठी स्वत:चाच तो गौरव आहे.
दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते.
पूजा, आरती झाल्यावर श्रींचे मूर्तीत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरिता गोल फिरणे आहे. सगळीकडे तोच नटला आहे, हे जाणणे आहे.
श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा.

*काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे?*
प्रदक्षिणा म्हणजे श्रीविग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण, कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल, तर अनिवार्य असते त्यामागील हेतू समजून घेणे, हेतू खरा महत्त्वाचा असतो. त्यासाठी कृती असते.

*प्रदक्षिणेचा हेतू काय?*
प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते. पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते. यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे. श्रीतत्त्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाही. तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.सर्वांगपरिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा.
प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे. दक्षिण म्हणजे उजवा. श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते.उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे. श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा.
प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे ‘उजवीच’ आहेत, हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.
 
आरती एक  पवित्र व प्रसन्न उपचार ..आरती केल्यावर स्वतःभोवती गोल फिरण्याचं काय आहे महत्व?  
आपण सगळेच वेगवेगळ्या प्रसंगी देवाचं रूप पाहत, हातात टाळ घेत किंवा टाळ्या वाजवत देवाची मनोभावे आरती केली असेलच. पण तुम्हाला माहित आहे का, आरतीचं नेमकं महत्त्व काय? आणि आरतीमध्ये स्वतः भोवती का फिरतात? नाही ना ! आपल्या पुराणात मात्र याविषयी विस्तृत माहिती दिली गेली आहे. चला तर मग आजच्या लेखात आरतीविषयी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.
हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते. स्कंद पुराणात आरतीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे की, प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी, मंत्र, येतातच असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी, मंत्र, श्लोक इ. माहीत नसेल त्यांनी केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्याच्यावर कृपादृष्टी राहते. इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतो. आरतीला पुराणात आरात्रिक आणि नीराजन अशा दोन नावांनी संबोधलं गेलं आहे. आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते. त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल, काही विधी राहिल्या असतील तर आरतीमुळे त्या त्रुटी भरून निघतात.
देवाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पंच- प्राणांना संपूर्ण एकाग्रतेने आरतीच्या तालात सुरात स्वतःला समरस करावं लागतं. आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचं प्रतीक असल्याचंही पुराणात नमूद केलं आहे त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणं आणि तो पंचमुखी असणंही महत्त्वाचं ठरतं. आरती करताना आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ही देवाची स्तुती असते त्यामुळे ते शब्द अत्यंत भावगर्भतेने आपल्या मुखातून यायला हवे तरच आरतीचा लाभ आपल्याला मिळतो.

आरती दरम्यान आपण सगळेच स्वतः भोवती गोल प्रदक्षिणा का घालतो?
याचं स्कंद पुराणात महत्त्व सांगितलं आहे. ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी, रोज नवा दिवस दिसण्यासाठी पुथ्वीचं खूप मोठं कार्य आहे. तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळालं आहे. त्यामुळे तिच्या प्रति कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी स्वतः भोवती गोल फिरणं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासारखचं आहे. त्यामुळे आरती दरम्यान स्वतःभोवती गोल फिरणं हे पूर्वपार चालत आलं आहे.
देवाला प्रसन्न करण्यासाठी आरती कशी असावी या विषयी देखील विस्तृत माहिती पुराणात दिली गेली आहे. आरती करताना आपल्याला हातातलं आरतीचं ताट केवळ गोल फिरवायचं नाही तर ते फिरवताना ॐ अशी आकृती निर्माण होईल असं ताट फिरवायचं आहे. म्हणजेच देवाच्या चरणापाशी चार वेळा, देवाच्या छातीपाशी दोन वेळा आणि मुखाजवळ एक वेळा. अशा पद्धतीने ॐ ही आकृती निर्माण होते हे पुराणात नमूद केलं आहे. आपण आरती करताना साधारण दिवा किंवा धूप इ. ने आरती करतो मात्र आरती ही चार प्रकारे केली जाते. आरतीचा पहिला प्रकार म्हणजे जल आरती, दुसरा दीप आरती, तिसरा पुष्प आरती आणि शेवटी कापूर, अगरबत्ती किंवा धुपाची आरती अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण आरती करु शकतो.
पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा ५ वेळा संगीतल्या आहेत.
● पहिली आरती जी सूर्योदया पूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असं म्हंटलं जातं.
● दुसरी आहे शृंगार आरती जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते.
● तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते.
● चौथी आहे संध्या आरती जी संध्याकाळी केली जाते.
● पाचवी आहे शयन आरती जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते.
रोज देवाची आरती केल्याचे अनेक फायदे ही आहेत.

देवाची आरती केल्याने आपल्या भोवतालचं वातावरण शुद्ध होतं. आरतीमुळे देव जागृत होऊन त्याचा आपल्या भोवती वावर असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आरतीच्या गायनाने, वादयांच्या तालाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होऊन तो पवित्र होतो. त्याच्या मनातील राग, द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात. आरती करताना वापरलेल्या कापूरमुळे भोवतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होतं. श्वासाद्वारे ही हवा आपल्या शरीरात गेल्याने आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि आपल्याला शांतता प्रदान होते.
तर हे आहे आरतीचं महत्त्व आणि तिचे आपल्याला होणारे फायदे.

 हे सर्व जाणून घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला आर्ततेने आळवा व त्यांचे प्रासादिक आशीर्वाद घेऊन आपले आयुष्य सुफल करा .

||ओम गं गणपतये नमः ||

Thursday, August 28, 2025

गणेशोत्सव विशेष. - गणपती दैवता बाबत विशेष - पुष्प ११

।। ओम गं गणपतये नमः ।।
गणेशोत्सव .. पुष्प ११

विषय : गणपती दैवता बाबत विशेष माहिती 

💐💐गणपती बाप्पाला  तुळस का वाहत  नाहीत ?
श्री गणपती म्हणजे चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती .. पण गणपतीचं आज घराघरांत आगमन मोठ्या जल्लोषात होतं . बाप्पाच्या पुजनात दुर्वांची जुडी आणि मोदकाचा नैवद्य अग्रस्थानी असतो. पण घराघरात पुजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला वर्ज्य मानली जाते. वर्षातून फक्त एकच दिवस गणेश चतुर्थीला ती गणपतीला वाहिली जाते. सर्व देवदेवतांच्या पुजेत स्थान मिळवणाऱ्या तुळशीला गणेशपुजेत स्थान न देण्यामागं काही कथा सांगितल्या जातात. पौराणिक कथेनुसार, धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णूसोबत विवाह करण्याचा हट्ट केला होता. तेव्हा देवाशी लग्नाऐवजी मानवी वर शोधू असं म्हटलं. त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली. ध्यानधारणा आणि तप केले. एकदा ती भगीरथी नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिनं पाहिलं. त्याच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली. यामुळं त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला. याचं कारण गणपतीनं तिला विचारलं. त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. गणपती म्हणाला की, मी मोहपाषात अडकणार नाही. मी ब्रम्हचर्याच्या मार्गावर आहे. मी विवाह करणार नाही. गणेशाच्या या उत्तरानं आपला अपमान झाल्याचं समजून त्याला शाप दिला की, तुझा विवाह होईल. वृंदेन दिलेल्या शापावर गणपतीनंही शाप दिला की, तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल. माझ्या पुजेत तुला स्थान नसेल. गणपतीच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली. तिनं गणपतीची माफी मागितली. त्यानंतर वृंदानं गणपतीची उपासना केली. तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की, तुला माझ्या पुजेत वर्षातून फक्त एकदात स्थान मिलेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल. या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही. पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पोटी झाला. त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत विवाह झाला. त्याचा मृत्यू होताच तिनं चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला आणि वृक्षरुपात तुळस झाली. त्यानंतर तुळशीला विष्णूपत्नी मानलं जाऊ लागलं. विष्णू पत्नी म्हणून तिची पुजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पुजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीच्या पुजेत तुळशीला मान मिळतो.  अशी ही तुळस औषधी पत्रित समाविष्ट होऊन श्री चरणी समर्पित झाली . 

💐💐💐  गणपती बाप्पा मोरया का म्हणले  जाते  ?  मोरयाचा अर्थ काय ?

 पुण्यनगरीचे अगदी जवळ  १५ किलोमीटर अंतरावर चिंचवड हे ठिकाण मोरया गोसावी  समाधी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात.  चिंचवड येथील गणपती मंदिरात बाप्पा मोरया म्हणण्यास  सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले  जाऊ लागले .
 या मागची पार्श्वभूमी अशी की ....

इ स 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते.
मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की, वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल.दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवांनी त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी यांनी मंगलमूर्ती वाड्यात प्रतिष्ठित केली   . त्यानंतर यांची समाधीही चिंचवड  येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते. ...मोरगाव, हे महाराष्ट्रातील अष्ट विनायकांचे स्थान. महाराष्ट्रातील पुजारी आणि स्थानिकांच्या मते, 'मोरया' हा शब्द  गणेशाचा पंथ गाणपत्य या  पंथाचे संस्थापक मोरया गोसावी यांच्या सन्मानार्थ वापरला जातो . गणेशाने त्याला आशीर्वाद दिला आणि घोषित केले की प्रत्येक वेळी त्याच्या नावाचा उल्लेख केला जाईल तेव्हा 'मोरया' अनुसरण करावे. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष झाला.
 सर्व गणेश भक्तांनी गणेशाची श्रद्धेने व भक्तीभावनेने  सेवा करावी गणपती बाप्पा त्यांना व कुटुंबास  सुख समृद्धी व  यश देतील यात संशय नाही . 

|| शुभम भवतु ||

Wednesday, August 27, 2025

गणेशोत्सव विशेष. - महती अष्ट विनायकाची - पुष्प १०

।। ओम गं गणपतये नमः ।।
गणेशोत्सव ...पुष्प  १०

महती अष्ट विनायकाची ... अत्यंत पवित्र व प्रासादिक. अष्टविनायक  स्थाने

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.*

*श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.*
 
*श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.*
 
*महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.*
 
*(१) मोरगांव.*
*अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे..प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.*
 
*जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले आहे,त्यांचे वंशज पिरंगुट या गावी आजही राहतात.*
 
*(२) थेऊर.*
*अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्रीगणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.*
 
*थेऊर पुणे- सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)*
 
*(३) सिद्धटेक.*
*सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतं. मात्र सध्या पूल झाला आहे.*
 
*(४) रांजणगाव.*
*अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.*
 
*या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की, त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे" महागणपती’ असेही म्हटले जाते.*
 
*अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.*
 
*(५) ओझर.*
*अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.*
 
*मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.*
 
*मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.*
 
*(६) लेण्याद्री.*
*अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.*
 
*लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.*
 
*(७) महड.*
*महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.*
 
*या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.*
 
*रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.*
 
*(८) पाली.*
*पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.*
 
*हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.*
 
*पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.*
 
*भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.*
 
*अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.....
 प्रत्येक गणेश भक्तांनी या स्थानी भेट देऊन पूर्ण श्रद्धेने श्री चरणी नतमस्तक होऊन उपासना करावी आपल्या जीवनात चतुरविध पुरुषार्थ प्राप्ती झाल्याशिवाय  राहणार नाही .

श्री गणेशाचे चरणी आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना .शुभम भवतु ।

|| सिद्धी विनायक चरणी समर्पण ।|
 

Tuesday, August 26, 2025

गणेशोत्सव विशेष. - गणपतीची १०८ नावे व अर्थ - गणेशोत्सव पुष्प ९

।। ओम गं गणपतये नमः ।।
गणेशोत्सव  पुष्प

विषय ---गणपतीची १०८ नावे अर्थ   

आजचा विषय गणपतीची १०८ नावे
बुद्धी आणि यशाची देवता, गणेशाची 
१०८ नावे आहेत आणि प्रत्येक नाव देवाच्या एका पैलूचे प्रतिनिधित्व करते. आपण गणपती बाप्पा समोर घरात गणपती असेपर्यंत रोज एक वेळा  ही नावे म्हणून दुर्वा अर्पण कराव्या 
 
सहस्रनाम किंवा हजार नामांच्या जपात गणेशाच्या कोणत्याही नावाचा वापर केला जातो .
१. अखुरथ : ज्याचा सारथी म्हणून उंदीर असतो
२. आलमपाटा : सदैव शाश्वत स्वामी
३. अमित : अतुलनीय स्वामी
४. अनंतचिद्रूपमयम् : अनंत आणि चैतन्य रूप
५. अवनीश : संपूर्ण जगाचा स्वामी
६. अविघ्न : अडथळे दूर करणारा
७. बालगणपती : लाडका आणि लाडका मुलगा
८. भालचंद्र : चंद्र-शिखर असलेला स्वामी
९. भीम : प्रचंड आणि अवाढव्य
१०. भूपती : देवांचा स्वामी
११. भुवनपती : देवांचा देव
१२. बुद्धनाथ : बुद्धीचा देव
१३. बुद्धिप्रिया : ज्ञान दाता
१४. बुद्धविधाता : ज्ञानाचा देव
१५. चतुर्भुज : ज्याला चार हात आहेत
१६. देवदेव : सर्व प्रभूंचा स्वामी
१७. देवांतकनशाकरिन : वाईट आणि असुरांचा नाश करणारा
१८. देवव्रत : जो सर्व तपश्चर्या स्वीकारतो
१९. देवेंद्रशिका : सर्व देवांचा रक्षक
२०. धार्मिक : दान देणारा
२१. धूमरवर्ण : धुम्रपान करणारा स्वामी
२२. दुर्जा : अजिंक्य स्वामी
२३. द्वैमातुरा : ज्याला दोन माता आहेत
२४. एकाक्षरा : एकच अक्षराचा तो
२५. एकदंत : एकल-टस्क स्वामी
२६. एकादृष्ट : एकल-टस्क भगवान
२७. एशानपुत्र : भगवान शिवाचा पुत्र
२८. गदाधार : ज्याच्याकडे शस्त्र म्हणून गदा आहे
२९. गजकर्ण : ज्याचे डोळे हत्तीसारखे आहेत
३०. गजानन : हत्तीचे तोंड असलेला स्वामी
३१. गजाननेती : हत्तीचे तोंड असलेला स्वामी
३२. गजवक्र : हत्तीची सोंड
३३. गजवक्त्र : ज्याचे तोंड हत्तीसारखे आहे
३४. गणधक्ष्य : सर्व गणांचा स्वामी (देव)
३५. गणाध्यक्षा : सर्व खगोलीय पिंडांचा नेता
३६. गणपती : सर्व गणांचा स्वामी (देव)
३७. गौरीसुता : गौरीचा मुलगा (पार्वती)
३८. गुनिना : जो सर्व गुणांचा स्वामी आहे
३९. हरिद्र : जो सोनेरी रंगाचा आहे
४०. हेरंबा : आईचा लाडका मुलगा
४१. कपिला : पिवळसर-तपकिरी रंगाचा
४२. कवीशा : कवींचा मास्टर
४३. के आरटीआय : संगीताचा देव
४४. कृपालु : दयाळू स्वामी
४५. कृषपिंगक्षा : पिवळसर-तपकिरी डोळे
४६. ​​क्षमाकरम : क्षमा करण्याचे ठिकाण
४७. क्षिप्रा : ज्याला शांत करणे सोपे आहे
४८. लंबकर्ण : मोठ्या कानांचा स्वामी
४९. लंबोदरा : प्रचंड पोट असलेला स्वामी
५०. महाबला : प्रचंड बलवान स्वामी
५१. महागणपती : सर्वशक्तिमान आणि सर्वोच्च स्वामी
५२. महेश्वरम : विश्वाचा स्वामी
५३. मंगलमूर्ती : सर्व शुभ स्वामी
५४. मनोमय : हृदय जिंकणारा
५५. मृत्युंजय : मृत्यू जिंकणारा
५६. मुंडकर्म : आनंदाचे निवासस्थान
५७. मुक्तिदय : शाश्वत आनंदाचा दाता
५८. मुशीकवाहन : ज्याच्याकडे सारथी म्हणून उंदीर आहे
५९. नादप्रतितिष्ठ : जो संगीताची प्रशंसा करतो आणि प्रेम करतो
६०. नमस्तेतु : सर्व दुष्कर्म आणि दुर्गुण आणि पापांचा विजय करणारा
६१. नंदना : भगवान शिवाचा मुलगा
६२. निदेश्वरम : संपत्ती आणि खजिना देणारा
६३. ओंकारा : ज्याला OM चे स्वरूप आहे
६४. पितांबरा : ज्याचे शरीर पिवळे रंगाचे असते
६५. प्रमोदा : सर्व निवासांचा स्वामी
६६. प्रथमेश्वर : सर्वांत प्रथम
६७. पुरुष : सर्वशक्तिमान व्यक्तिमत्व
६८. रक्त : ज्याचे शरीर लाल रंगाचे असते
६९. रुद्रप्रिया : भगवान शिवाची प्रिय
७०. सर्वदेवात्मन : सर्व दिव्य अर्पण स्वीकारणारा
७१. सर्वसिद्धांत : कौशल्य आणि बुद्धीचा दाता
७२. सर्वात्मन : विश्वाचा रक्षक
७३. शांभवी : पार्वतीचा मुलगा
७४. शशिवर्णम : ज्याचा रंग चंद्रासारखा आहे
७५. शूरपकर्ण : मोठ्या कानांचा देव
७६. शुबान : सर्व शुभ स्वामी
७७. शुभगुणकानन : जो सर्व गुणांचा स्वामी आहे
७८. श्वेता : जो पांढऱ्या रंगासारखा शुद्ध असतो
७९. सिद्धिधाता : यश आणि सिद्धी देणारा
८०. सिद्धिप्रिया : शुभेच्छा आणि वरदान देणारी
८१. सिद्धिविनायक : यशाचा दाता
८२. स्कंदपुर्वजा : स्कंदचा मोठा भाऊ (भगवान कार्तिक)
८३. सुमुख : शुभ चेहरा
८४. सुरेश्वरम् : सर्व प्रभूंचा स्वामी
८५. स्वरूप : सौंदर्याचा प्रियकर
८६. तरुण : वयहीन
८७. उदंड : वाईट आणि दुर्गुणांचा नेमसिस
८८. उमापुत्र : देवी उमा (पार्वती) चा मुलगा
८९. वक्रतुंडा : वक्र ट्रंक लॉर्ड
९०. वरगणपती : वरदान देणारा
९१. वरप्रदा : शुभेच्छा आणि वरदान देणारा
९२. वरदविनायक : यशाचा दाता
९३. वीरगणपती : वीर स्वामी
९४. विद्यावर्धि : बुद्धीचा देव
९५. विघ्नहार : अडथळे दूर करणारा
९६. विघ्नहर्ता : अडथळे नष्ट करणारा
९७. विघ्नराजा : सर्व अडथळ्यांचा स्वामी
९८. विघ्नराजेंद्र : सर्व अडथळ्यांचा स्वामी
९९. विघ्नविनाशनय : सर्व अडथळे आणि अडथळे नष्ट करणारा
१००. विघ्नेश्वर : सर्व अडथळ्यांचा स्वामी
१०१. विकटी: प्रचंड आणि अवाढव्य
१०२. विनायक : सर्वांचा स्वामी
१०३. विश्वमुख : विश्वाचा स्वामी
१०४. विश्वराजा : जगाचा राजा
१०५. यज्ञकाय : सर्व पवित्र आणि यज्ञ अर्पण स्वीकारणारा
१०६. यशस्करम : कीर्ती आणि दैव देणारा
१०७. यशवासीन : प्रिय आणि सदैव लोकप्रिय प्रभु
१०८. योगाधिप : ध्यानाचा स्वामी

 ह्या नावांचा उच्चार करा गणरायाची प्रार्थना करा यशस्वी व्हा . कल्याण मस्तु


 

Monday, August 25, 2025

गणेशोत्सव विशेष. - सार्वजनिक गणेशोत्सव इतिहास --पुष्प ८

 

।। ओम गं गणपतये नमः ।।
 गणेशोत्सव    पुष्प   

सार्वजनिक  गणेशोत्सव इतिहास --

💐💐गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास स्वामीं ....
 
समर्थांनी दासबोध आणि मनाचे श्लोक याची सुरवात गणपतीला वंदून केली आहे.
 
ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
 
गिरीधरस्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथा मध्ये व समर्थ आणि समर्थसंप्रदाय ग्रंथामध्ये पान क्रमांक 106 वर गणेशोत्सवाचे आयोजन केल्याचे वर्णन खालील ओवी मध्ये सांगितले आहे.
 
'समर्थे सुंदरमठी गणपती केला । दोनी पुरूषे सिंदूरवर्ण अर्चिला ।
सकळ प्रांतासी मोहोछव दाविला । भाद्रपद माघपर्यंत ।
शिवराजासी अकरा मुष्ठी भिक्षा मागो धाडीली ।
शिवराज म्हणे माझी परिक्षा समर्थे मांडीली ।
अकरा अकरी (एकवीसाशे-121) खंडया कोठी पाठविली ।
हनुमान स्वामीमुष्ठी लक्षुनिया ॥
 
वरील ओवील मध्ये तर स्पष्ट दिसून येत की समर्थांनी सुंदर मठात म्हणजेच आनंदवन भुवनी पहिल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात केली. भाद्रपत महिन्या पासून ते माघ महिन्या पर्यंतर थोडक्यात सांगायचं झाल तर जगातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास पाच महिने सुरु होता.
 
आरंभीं वंदीन विघ्नविनायक । जया ब्रम्हादिक वंदितील ॥
वंदितील संत कवि ऋषि मुनि । मग त्रिभुवनीं कार्यसिद्धी ॥
 
समर्थ गाथा १५९८ ओवी मध्ये तर याच वर्णन समर्थनही अचूक केला आहे
गणपति पाहूणे आले । सिद्धलाडूसी मोद्क केले । तूपासाखरेनें घोळले रे रे । भक्त जेवितां धाले रे ॥१॥
 
समर्थांच्या आनंदवनभुवनी कवितेतील ८ ओवी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल.
हे साक्ष देखिले दृष्टी । किती कल्लोळ ऊठिले । विघ्नघ्ना प्रार्थिले गेलो । आनंदवनभुवनी ॥8॥
 
गणेशोत्सव कशासाठी आयोजित करण्यात आला असावा याचे वर्णन समर्थांनी ' सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची 'या त्यांच्या जगप्रसिद्ध आरतीमध्ये केल्याचे दिसून येते. या ओवीची रचना समर्थांनी १६५८  मध्ये केली आहे.
 
थोडक्यात इतिहास पहायचा झाला तर विजापूरचा सरदार अफझलखान हिंदवी स्वराज्यावर चाल करून आल्याचे शिवथरघळीतील आनंदवनभुवनामध्ये समर्थांना समजून आले.
 
'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...' या आरतीद्वारे समर्थांनी 'संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।'
असा म्हणजेच आमच्या शिवाजी राजेंना या संकटामध्ये पाव आणि त्यांचे निर्वाणापासून रक्षण कर, असा नवस समर्थांनी गणपतीला केला आहे.
 
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी । आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥
 
सन १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि छत्रपतींना निर्वाणीपासून रक्षिणाऱ्या गणपती नवस फेडण्यासाठी समर्थांनी शिवरायांकडे अकरा मुष्ठी भिक्षा मागितली. शिवरायांनी दिलेले १२१ खंडी धान्य भाद्रपद चतुर्थी ते माघ चतुर्थीपर्यंत सरासरी दररोज ६७५ किलो दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास सुमारे पाच महिने चाललेल्या या महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवास दररोज ११००० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यास उपस्थित राहिले असावेत. खालील ओवी नक्कीच त्याची प्रचीती देत असावी.
 
'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥
 
त्यामुळेच समर्थांचा हा महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव कोकणासह देशात सर्वदूर पसरला आणि समर्थ रचित गणपतीची आरती 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची यामुळे म्हण्याची सुरवात झाली आणि ते आजतागायत सर्वच गणेशोत्सवामध्ये म्हणण्याचा प्रघात सुरू आहे.
 
“ दास रामाचा वाट पाहे सदना ” ही ओवी तर आज प्रत्येकाला नकीच माहित असेल कारण गणपती विसर्जना पासून ते पुढचा वर्षीचा गणपती उस्तव चालू होई पर्यंतर सर्वजण त्या गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात.
 
थोडक्यात सांगायचे झाले तर समर्थांनी तेंव्हा चालू केलेला हा सार्वजनिक गणेश उत्सव आज पण असाच चालू आहे आणि पुढे पण चालू राहील आणि त्याची प्रचीती पुढील ओवी मध्ये आपणाला ते नक्कीच दिसून येईल.
 
गणाधीश माझें कुळींचे दैवत । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥
पूर्ण करी ज्ञान तेणें समाधान । आत्मनिवेदन रामदासीं ॥

💐💐  आपण जरा महाभारतकालीन गणपती अवतार पाहूया
 
गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते. गणेशाने सत्ययुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.
 
पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव
 
सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले. लोकमान्यांनी जनसामान्यांची एकत्रीकरण स्वातंत्र्या विषयी जन जागृती निर्माण करण्यासाठी गणेशोत्सवाचा फार प्रभावी उपयोग केला .  

आजचे हे पुष्प श्री गजाननाचे चरणी समर्पित.
हिंदुस्तान विश्वगुरु हो हीच  गणरायाचे चरणी प्रार्थना ।