Tuesday, April 29, 2025

अक्षय तृतीया | बुधवार ३० एप्रिल २०२५

 


अक्षय तृतीया बुधवार ३० एप्रिल २०२५ या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’  मानले जाते 

अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे.या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला.

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. अक्षय्य तृतीयेमागील अध्यात्मशास्त्र या लेखातून जाणून घेऊयात !

या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.

या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो.

या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.

 अक्षय्य तृतीया दिवसाचे महत्त्व: 

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं

तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।

उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः

तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न

अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.

अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ का मानले जाते ? - 

‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे.  एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ तासपर्यंत राहातात कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते. 
या दिवशी केलेल्या धार्मिक कृतींमुळे अधिक लाभ होतो - ‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धार्मिक कृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्‍या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा. 

अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत - ‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवशी पुढील प्रमाणे विधी केल्यास त्याचा लाभ होतो. या दिवशी पवित्र जलात स्नान करावे ,श्रीविष्णूची पूजा करावी, जप, होम, दान आणि पितृतर्पण करावे . या दिवशी अपिंडक श्राद्धकरावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.

उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान - या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.

उदकुंभाचे महत्त्व : उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.

. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.

उदकुंभ दानाचा मंत्र : ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा

एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः । अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं क
अक्षय त्रितीया हा दिवस चार प्रमुख मुहूर्तां एक आहे*.या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही.*
*हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी १२ वाजेनंतर पितरांचा अन्नाचा नैवेद्य करावा.*
*घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी.*
*या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवावे. या दिवशी* *पितरांना उदककुंभ दान करतात*.
पत्रावलिवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा.*
*त्यात गंध , फुले  , तीळ , सुपारी , विड्याची पाने  , दक्षिणा , पाणी घालावे गटात सूत्राचे वेष्टन करावे. म्हणजेच यज्ञ कंकण होय हे घटात समसंख्यानुसार गुंडाळावे व गटात आंब्याचे पाने लावावे*
घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. या दिवशी केलेले दान , हवन , तर्पण *,  *पूजा ,  जप इ. पुण्य कर्म अक्षय्य टिकते म्हणून 'अक्षय्यतृतीया ' ही शुभतिथी प्रमाणे पितृतिथी देखील आहे.*
*पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगास्नान , यज्ञहोम , यवदान , यवमभक्षण करावे.*
*पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभ निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी - कुंकू समारंभ करायचा असतो.

वैशाख मासातील प्रथम प्रासादिक व्रत व उत्सव आहे अक्षय तृतीया.कृत युगाचा प्रारंभ याच युग तिथीला झाला होता. त्यामुळे या तिथीच्या प्रारंभाच्या  प्रवाहअनुरूप त्या युगामध्ये व्यक्तीला आयुष्य जास्त प्रमाणात होते. सेवा उपासना जास्त व्हायच्या. पुण्यदायक  आचार विचार  व्हायचे. आणि एकमेकांमध्ये एक वेगळीच बांधिलकी आपल्याला दिसायची. या कृत युगासारखीच फलश्रुती या युगातही आपल्याला मिळवता यावी या उद्देशाने एक दिवस का होईना आपल्याला या दिवशी मिळत असते, ती अक्षय तृतीयेच्या दिवशी. विशेष म्हणजे चैत्र गुरु गौरीची सुरुवात आपण चैत्र तृतीयेच्या दिवशी करत असतो आणि या व्रताची सांगता सौभाग्यदोन व्रत वैशाखात तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला होत असते. झोपाळ्यावर गौरीहराचे पूजन केल्यानंतर एका सुवासिनीला बोलावून हळदीकुंकू देऊन तिला कैरीचे पन्हे,आंब्याचा रस, त्यासोबत यथा शक्ती सौभाग्य अलंकार देऊन सन्मान करायचा असतो. म्हणून या तिथीला चुडा दानाचे जास्त महत्व आहे.
तसेच याच दिवशी बदरीकाश्रमाचे द्वार उघडले जातात. कारण भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी तीन महत्त्वाच्या अवतार याच दिवशी झाले होते.
1.पहिला अवतार - भगवान नर आणि नारायण जी बद्रिकाश्रमाची प्रमुख देवता आहे.
2.दुसरा अवतार-  भगवान हयग्रीव , ज्यांनी हयग्रीव असूरांचा वध केला, आणि त्यांच्या संवादातून ललिता सहस्रनामा सारखे प्रासादिक स्तोत्र मानव कल्याणासाठी जगाबाहेर आले.
3.तिसरा अवतार- भगवान  परशुराम यांनी 21 वेळा क्षत्रिय विहीन पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि समवेत पृथ्वीला खरं दान कसे करतात हे सुद्धा जगासमोर आणून दिले. कोकणासारखा प्रांत या परशुरामाच्या आशीर्वादाने प्रगतीस व प्रकट्याला आले. या तीन महत्त्वाच्या भगवान विष्णूच्या अवतारांचे प्रकट्याचे महत्त्वाचे पर्व अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले. 
ज्यावेळेस पांडव वनवासात होते, त्यावेळेस भगवान कृष्णाची व त्यांची भेट एका मंदिरात झाली. त्यावेळेस त्यांनी विचारले की परमेश्वरा आम्ही तर खूप सारे दानधर्म केले. खूप पूजा उपासना व होम हवन केले मग त्यांचे पुण्य कुठे गेले की ज्यामुळे हा वनवास आमच्या पदरी आला. भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही जे काही पुण्य कर्म केले ते पुण्य कर्म तुमच्या सुख किंवा दुःख त्यांच्या फल प्राप्तीमध्येच उपयोगी आले. मग पांडवांनी विचारले की असे काही व्रत नाही का? किंवा सण नाही का? किंवा दिवस नाही का? की ज्या दिवशी आम्ही काही पुण्य केले तर त्यांचे फळ अक्षय राहील. *त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की त्या दिवशी तिळाच्या दाणा एवढे दान जनमानसाच्या कल्याणासाठी जरी केले तर त्या दानाचे श्रेय अक्षय टिकते म्हणजेच आपण त्याचा कितीही उपयोग केला तरी ते दान लयाला जात नाही* म्हणून या दिवशी *देव कर्म जास्त करायचे म्हणजेच देवांचे पूजन, अभिषेक, होमवन या दिवशी जास्त करावे.* तसेच वैशाख महिन्यात उष्णतेचा उद्रेक असतो. त्यावेळेस जर जीवसृष्टीला अन्न पाणी देऊ शकलो तर त्या जीवाच्या आशीर्वादाने विपुल अशा अखंड सौख्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणून याच दिवशी या तिथीला पाणपोया उभारल्या जातात . परंतु प्रत्येकाला हे शक्य नसते म्हणून घरच्या घरी उदक कुंभाचे पूजन व दान , शिद्या सह करावे. अशी आपली पूर्वाचार्यांची परंपरा होती.
समवेत पंखा दान करायचा विधी होता. जो अनवाणी असेल त्याला जोडदान केले जायचे. ज्याच्या डोक्यावर छत्र नसेल त्याला छत्री दान दिली जायची. असे अनेक उपाय आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले होते.
*अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जाणारा महत्त्वाचे विधी*
सकाळी लवकर उठल्यानंतर आई-वडिलांचे पूजन त्यांचे स्मरण पती-पत्नी एकमेकांबद्दल आदर भावना ठेवणे. तसेच आपल्या देवघरातील देवांना योग्य ते स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक करणे. आराध्य देवतांच्या नावाने हवन करणे. गाईच्या गवरीने अग्नी प्रज्वलित करून  तिळाच्या तेलाने किंवा तुपाने  ज्या काही आपल्या इष्टदेवता असतील त्यांच्या स्तोत्रमंत्रांनी हवन करणे. या दिवशी दान दिल्यास अक्षय पुण्य व  अपेक्षित समृद्धी मिळते . पितर तर्पण व व त्यांचेबाबत   ऋण निर्देश फार महत्वाचा आहे .

वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय तृतीया
अस्यां तिथौ क्षयमुपैति हृतं न दत्तं !
तेनाक्षयेति कथिता मुनिभि स्तृतीया !! 
 श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात
हे युधिष्ठिरा , या तिथीला केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात.
दानाचे महत्व :-
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये दान देण्याला विशेष असे महत्व आहे.
दान म्हणजे " डोनेशन' नाही.
दान कोणी दिले आणि काय दिले या गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला पण कळू नये.
 दान दिल्याने समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते. दानासारखे पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही, फक्त दान हे सत्पात्री करावे.
अन्नदानात् परं दानं
विद्यादानमत:परम् !
अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं  च विद्यया !!
 अन्नदानापेक्षा विद्यादान हे श्रेष्ठ आहे.
मूर्ख माणूस अपात्र व्यक्तीला दान देतो,   पात्र व्यक्तीला देत नाही.
 आपल्या अज्ञानामुळे हा दानधर्म निष्फळ ठरतो. 
आधुनिक काळात पण दानाची आवश्यक्ता आहे
  


* अक्षय्य तृतीया . मुळात *अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे* असा होतो. या तिथीला *साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त* मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.

*अक्षय्य तृतीया  या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन
नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे. 
उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.
*अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?*
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. 
थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
*अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?*
या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll
२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
3) भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।
रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।
ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.
*विशेष सूचना - कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते.*


तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी लाभो ही सद्गुरूंचे चरणी प्रार्थना !. 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

भक्तजनांचा कल्पवृक्ष - श्री हरिबाबा

 

भक्तजनांचा कल्पवृक्ष- श्री हरिबाबा महाराज  - जया एकादशी हरिबाबा महाराजांची पुण्यस्मरण तिथी 
(शके १९७९-१८२०) इ. स. १८९८

‘संभवामि युगे युगे’ या भगवंताच्या वचनानुसार भगवंत जगात वेळोवेळी माणसाचा देह धारण करुन येत असतो. क्वचित वेळी तो अवतार म्हणून येतो, तर इतर वेळी संत म्हणून जन्म घेऊन समाजाला स्वतःच्या वागण्यातून आदर्श जीवनाचे धडे देत असतो.  परमेश्‍वराचं नाम घेणं हा प्रत्येक संताच्या उपदेशाचा गाभा आणि जीवनाचा मंत्र असला तरी प्रत्येक संताची ते सांगण्याची पध्दत वेगवेगळी असते. श्रीरामदासस्वामींनी कडकडीत वैराग्य पाळून रामनामाचा घोष केला, तर श्री तुकाराम महाराजांनी संसारात पडूनही विठ्ठलाच्या भक्तीसाठी सर्व सुखांवर तुळशीपत्र ठेवलं.  श्रीगोंदवलेकर महाराजांनी संसाराकडे एका वेगळया नजरेनं पहात रामनामाची कास कशी धरावी हे शिकवलं, तर वेगवेगळे व्यवसाय वाट्‌याला आलेल्या श्री गोरा कुंभार, श्री सावतामाळी, श्री नरहरी सोनार यांच्यासारख्या अनेक संतांनी आपल्या कामाच्या माध्यमातून परमेश्‍वराचं अनुसंधान कसं ठेवायचं हे समाजाला शिकवलं. 

वेगवेगळया प्रांतांत आणि वेगवेगळया वातावरणात अशा संतांनी जन्म घेतला तरी त्यांची स्वतःची अशी वेगळी जीवनपध्दती असते. तिच्या प्रमाणेच राहून ते लोकांवर संस्कार घडवतात. विरक्ती हा त्यांच्या जीवनाचा आत्मा असतो. लोकांकडून त्यांना काहीच अपेक्षा नसते.  उलट लोकांनाच भरभरून देण्यासाठी ते आलेले असतात. फलटणच्या पवित्र भूमीत अशाच एका संतानं फलटणवासियांना अचानक दर्शन दिलं ते इथल्या मारूतीच्या मंदिरात. तो सुवर्णदिन होता आश्विन शुध्द द्वादशी शके १९७९. काही संताचा जन्म कुठे आणि कधी झाला, त्यांचे आई-वडिल कोण इ. गोष्टी सगळ्‌यांना माहीत असतात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आपण जयंती म्हणून साजरा करतो. परंतू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, शेगावचे श्री गजानन महाराज किंवा शिर्डीचे श्री साईबाबा यांच्यासारख्या ज्या विभूतींच्या जन्माबद्दल काहीच माहिती नसते, त्या ज्या दिवशी लोकांसमोर प्रकट झाल्या तो दिवस आपण त्यांचा प्रकटदिन म्हणून साजरा करतो. फलटणचे श्रीहरिबाबा हे याच मालिकेतले संत असल्यामुळे आपण त्यांचा प्रकटदिन उत्सव मोठया जल्लोषात साजरा करतो. 

तर त्या दिवशी माध्यान्हीला मारूती मंदिरात फलटणकरांना ज्या संताचं दर्शन झालं त्याचं नावही त्याना कळू शकलं नव्हतं. कारण त्यांनी नाव विचारल्यावर त्यांना भलतंच उत्तर मिळालं होतं.  हळूहळू गावात ही बातमी पसरल्यावर कुणी उत्सुकतेनं, तर कुणी गंमत म्हणून, कुणी दर्शनासाठी; तर कुणी टर्रर् उडवण्यासाठी म्हणून तिथं येऊन गेले. पण संध्याकाळ झाली तरी हा महात्मा सकाळी घातलेल्या सिध्दासनातच स्थिर होता. संध्याकाळी फलटण संस्थानाचे अधिपती मुधोजीराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या नित्यक्रमाप्रमाणे मारुतीच्या दर्शनाला आले असताना हा दिव्यात्मा त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी जवळ जाऊन अतिशय विनम्रपणे त्यांचं दर्शन घेऊन राजवाड्‌यावर चलण्याची प्रार्थना केली. राजाच्या आणि फलटणनगरीच्या पूर्वपुण्याईमुळेच जणु हा महात्मा इथं आलेला असल्यामुळे राजाच्या प्रार्थनेला त्वरित मान देऊन राजमंदिरात जाता झाला.  राजानंही अतिशय भक्तिभावानं पूजन करुन सुग्रास भोजन अर्पण केलं. राजवाड्‌यातला कण न् कण आज धन्य झाला होता!

हळूहळू या महात्म्याविषयी सर्वत्र चर्चा सुरु झाली तेव्हा हे कळालं की फलटणला प्रकट होण्याअगोदर हा महात्मा पणदरे या फलटणपासून जवळ असलेल्या गावी लोकांना दिसला होता.  त्यानंतर नातेपुते आणि पंढरपुर या पुण्यक्षेत्री काही काळ राहून नंतर शिखर शिंगणापुर या महादेवाच्या तीर्थक्षेत्री बराच काळ रमला. आणि त्यानंतर मात्र फलटणक्षेत्री आपलं नियोजित जनउध्दाराचं कार्य करण्यासाठी मानवरूपातला हा शंकर त्याचाच अंशावतार असलेल्या मारुतीच्या मंदिरात प्रकट झाला. पूर्वी या महात्म्याला पाहिलेल्या भाविकांकडूनच त्याला ’हरिबाबा’ या नावानं ओळखतात हेही कळालं. फलटणक्षेत्री प्रकट झाले त्यावेळी हरिबाबांचं वय साधारणपणे ४० वर्षांचं असावं. परंतु अशा विभूतींच्या वयाचं आणि क्षमतेचं गणित बांधणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं असतं.

राजानं हरिबाबांना राजवाडयात नेलं खरं, पण वैराग्य हाच अलंकार घालून वावरणारे हरिबाबा त्या ऐश्‍वर्यात थोडेच रमणार होते! सोनं, चांदी, पैसे आणि ऐश्‍वर्य यांचं अप्रूप सामान्य माणसाला. हरिबाबांसारख्या योगिराजाला त्याचं काय! लोकांना या गोष्टीची प्रचिती वेळोवेळी पहायला मिळत असे. राजानं नेसवलेलं किंमती वस्त्र दुसर्‍याच क्षणी काढून टाकून आपल्या नेहमीच्या दिगंबर अवस्थेत जाणं, त्यानं कौतुकानं दिलेलं चांदीचं भांडं कुठेही भिरकावून देणं या वैराग्याची झलक दाखवणार्‍या गोष्टींच्या जोडीलाच कधी एखाद्याच्या घरात शिरून तिथले कपडे बाहेर फेकून देणं, घरात लहान मूल असेल तर त्याला उचलून त्याचे मुके घेणं, कधी मध्यरात्रीला रस्त्यात उभं राहून भजन करणं, तर कधी शिव्याच देत सुटणं, कधी दगड गोळा करुन त्यावर आपण स्थानापन्न होणं, तर कधी तापलेल्या वाळूवर शांतपणे आडवं होऊन वर तल्लीनपणे विठ्ठलाचं भजन करणं अशा लीला लोकांना पहायला मिळत. हे भजनही द्रविड, तेलंगी, कानडी अशा वेगवेगळया भाषांमधलं असायचं. तरीही त्या गाण्यामध्ये असा भाव आणि तल्लीनता असायची की ऐकाणार्‍यानं भाषा कळली नाही तरीही स्वतःला विसरुन जावं.  भजनाचा शेवट ’पुंडलीक वरदा हरिविठ्ठल‘ अशी गर्जना करुन होत असे. 

श्री हरिबाबा कधी कधी देवळात येत. तेव्हा कधी देवाचं दर्शन घेऊन निघून जातं, तर कधी तिथं चालू असलेलं कीर्तन, प्रवचन ऐकायलाही थांबत. आणि कधी तर तिथं चक्क झोपी जात. कधी ते शांत वाटत, तर कधी त्यांची मुद्रा उग्र भासत असे. या उग्र मुद्रेमुळे मुलं हरिबाबांना फार घाबरत असतं. आणि मुलंच काय, मोठी माणसं सुध्दा हरिबाबा येताना दिसले की घराची दारं पटापट लावत असत. कधी कधी हरिबाबा एखाद्याच्या घरी जाऊन खायला भाकरी मागत. ज्याच्या घरी हरिबाबा गेले ती व्यक्ती श्रध्दावान असेल तर व्यवस्थित सगळे पदार्थ वाढलेलं ताट बाबांसमोर येई, परंतु बाबांनी सगळे पदार्थ एकत्र कालवून खायला सुरुवात केली की यजमान पहातच राही. आता विकारांचा मागमूस नसलेल्या त्या महात्म्याला जिभेच्या चोचल्या मध्ये कुठून रस असणार!

एखाद्यानं हरिबाबांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकलं की बाबांनी त्याच्या डोक्याचं पागोटं काढून स्वतःच्या डोक्यावर ठेवावं हा प्रकारही काही वेळा बघायला मिळे. कधी हरिबाबा अचानक खदाखदा हसायला लागत, तर कधी एकदम मौनसुध्दा धारण करत. समाज म्हटल्यावर सगळया प्रकारची माणसं असणारच. कधी हरिबाबांना कौतुकानं दूध पाजणारा भाविक जसा भेटायचा, तसा कधी दारू पाजणारा किंवा गांजा ओढायला देणारा रसिकही भेटायचा. परंतु या सगळयाच्या पलिकडे गेलेल्या बाबांना त्यानं काय फरक पडणार! समोर ठेवलेल्या पैशांना, वस्तूंना आणि अर्पण केलेल्या वस्त्रांना देखिल हाच न्याय मिळत असे. हरिबाबा गावातून हिंडत असताना त्यांच्या हातून घडणार्‍या कृतीतून काही वेळा नुकसान होत असे. ते टाळण्यासाठी राजानं बाबांच्या मागेमागे फिरायला स्वतःचे सेवक ठेवले होते. परंतु काही दिवसांतच ‘हे जमणं शक्य नाही’ हे लक्षात आल्यामुळे राजानं ती योजना बासनात गुंडाळून ठेवली.
 
साधू-संतांची योग्यता सर्वसामान्य माणसाला समजू शकत नाही. कारण तो बाह्यरुपावरुन ती ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण हिर्‍याची पारख करायला जसा रत्नपारखीच लागतो, तसा संत आणि साधूंना ओळखणं हे फक्त साधूंनाच शक्य असतं. बाकीच्यांच्या लक्षात फक्त त्यांचं विचित्र वागणंच रहातं. खरं तर हे विचित्र वागणं त्यांनी एवढयाकरताच धारण केलेलं असतं की त्यामुळे फक्त स्वार्थासाठीच त्यांच्याकडे येणार्‍या लोकांना जरब बसावी. सर्वसामान्य माणूस हा त्याच्या पूर्वकर्मांची फळ भोगत भोगत जीवन जगत असताना अगदी जेरीस आलेला असतो. संत सत्पुरूष त्याचं हे जगणं सुसह्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करायला आलेले असतात. पण माणूस त्या सत्पुरूषाला ‘आपल्या इच्छा पूर्ण करणारं यंत्र’ समजून स्वतःमध्ये काही सुधारणा करण्याऐवजी त्यालाच सारखा मागत राहतो. सत्पुरुष हे साक्षात् परमेश्वरस्वरुप असल्यामुळे काहीही द्यायला समर्थ असतात. पण माणसाचं ‘हे हवं ते हवं’ हे कितीही मिळालं तरी न संपणारं असल्यामुळे सत्पुरुष ते नियंत्रणात ठेवायला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. 

‘चित्त शुध्द ठेवून प्रत्येक काम करा‘ अशा सोप्या शब्दांमध्ये हरिबाबा उपदेश करत. चित्त शुध्द असल्याशिवाय आपली कोणतीही सेवा देव सुध्दा स्वीकारत नाही असं सांगत असताना दांभिकपणे, म्हणजे प्रदर्शन करुन सेवा करणार्‍या लोकांवर ते परखडपणे टीका करत. एकदा पणदर्‍यात राहणार्‍या धोंडी वाणी यांच्या घरी गेले असताना हरिबाबा तिथं जमलेल्या भाविकांना रात्रभर उपदेशाचं अमृत देत होते आणि सारे भाविकही कानांमध्ये प्राण आणून ते स्वीकारत होते. बाबांच्या पणदर्‍यात त्या दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये घडलेला तो एकमेव प्रसंग होता की जेव्हा बाबा सलग एवढा वेळ भक्तांना आयुष्य सार्थकी लावण्याचा कानमंत्र देत होते. 

सत्पुरुषांच्या नुसत्या कृपादृष्टीनं सुध्दा समोरच्या व्यक्तीला झालेल्या रोगापासून मुक्ती मिळते.  हा अनुभव हरिबाबांच्या बाबतीत सुध्दा असंख्य लोकांनी घेतला.  अगदी असाध्य झालेल्या आणि डॉक्टरांनी सुध्दा हात टेकलेल्या रोग्यांना देखिल बाबांकडून संजीवनी मिळाल्याची उदाहरणं त्या पंचक्रोशीमध्ये नेहमीच घडत असत. आपलं दुःख दूर करणारी व्यक्ती आपल्यासाठी देवासमान असते. इथं हरिबाबा तर साक्षात् देवच होते. पण देवाला ओळखणं एवढं सोपं थोडंच आहे! त्यामुळे घरी आलेल्या बाबांना धक्के मारुन बाहेर काढणारे अज्ञानी जीव सुध्दा काही कमी नव्हते. परंतु विकारांवर ताबा मिळवलेले हरिबाबांसारखे दयासागर त्या अज्ञानी जीवांच्याही कल्याणासाठी प्रयत्न करतच रहातात. 

आपल्या पूर्वजांकडून आपल्याला अनेक पारंपारिक व्रतवैकल्यं समजतात. वेगवेगळया गोष्टी साध्य होण्यासाठी वेगवेगळी व्रतं असतात. पण असा अनुभव येतो की एखादं पारंपारिक व्रत एखाद्या सत्पुरूषानं करायला सांगितलं की त्यामध्ये फलप्राप्ती अगदी त्वरित होते याला कारण म्हणजे त्या सत्पुरूषाच्या वाणीमध्ये असलेलं अपार सामर्थ्य.  एखादा पारंपारिक मंत्र सुध्दा सत्पुरूषाकडून मिळाला की तो जपल्यावर त्वरित फळ देतो. त्यामागेही हेच कारण असतं. श्रीहरिबाबांनी एका स्त्रीला सोमवारचं व्रत करायला सांगितल्यानंतर तिला पुत्रप्राप्ती झाली.  संतमहात्मे हे खरं तर स्वतःचं सामर्थ्य त्यामागे लावून अशा व्रताचं महात्म्य वाढवत असतात!

रोग्याच्या अंगाला लावायला माती देणं किंवा त्याच्या अंगावर थुंकणं हा प्रकार इतर अनेक संतांप्रमाणेच श्रीहरिबाबांच्या चरित्रातही पहायला मिळतो. माती किंवा थुंक्याच्या माध्यमातून रोगमुक्तीचा अतिशय प्रबळ आणि पवित्र संकल्पच ते संत त्या रोग्यापर्यंत पोहोचवत असतात.  आणि तो संकल्प सिध्दीला जाणं म्हणजेच त्या रोग्याला रोगापासून मुक्ती मिळणं असतं. 

सत्पुरूषांकडे काय मागावं हे सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा कल्पवृक्षाला भाजीसाठी भोपळा मागण्याचा प्रकार घडतो. परंतु संसारातल्या म्हणजे व्यवहारातल्या गोष्टी कितीही मागून घेतल्या तरी कायमस्वरुपी समाधान कधीही मिळत नाही आणि मग माणूस एकामागून एक मागण्या करत असतानाच त्याचं आयुष्य संपतं. पण त्यापासून इतर कोणी सहसा धडा शिकताना दिसत नाही. श्रीहरिबाबांनी अशा व्यवहारातल्या गोष्टी मागायला आलेल्या कित्येक लोकांच्या इच्छा पूर्ण करुन ते मागणं कसं अपूर्ण, म्हणजे चुकीचं आहे हे दाखवून दिलं. 

प्रेतामध्ये परत प्राण आणणं हा चमत्कार इतर अनेक संतांप्रमाणे श्रीहरिबाबांच्या चरित्रातही दिसतो. पण हे एवढं सरळ असतं तर संतांनी सगळयांनाच मरणाच्या पाशातून सोडवलं असतं. पण असं घडत नाही. कारण नैसर्गिक म्हणजे काळमृत्यूच्या बाबतीत संत कधीही हस्तक्षेप करत नाहीत. अपमृत्यू, म्हणजे गंडांतर असेल तरच समोरच्या परिस्थितीनुसार संत निर्णय घेऊन त्या व्यक्तीला जीवनदान देतात. काही वेळा अशा व्यक्तीकरता नियतीनं काही विशिष्ट कार्य राखून ठेवलेलं असतं त्यामुळे त्या व्यक्तीला मिळालेलं जीवनदान हीही नियतीचीच योजना असते. 

‘प्राणीमात्रांवर दया करावी’ हा संदेश संत हे मनुष्यप्राण्यावर दया करुन खर्‍या अर्थानं आचरणात आणतात. कारण स्वार्थ, कृतघ्नता, शौर्याच्या नावाखाली केलेलं क्रौर्य हे दुर्गुण माणसाइतके इतर कुठल्याच प्राण्यात नसावेत. तरी ते मानवसमाजासाठी आपला देह सतत झिजवत राहतात. सापासारखा प्राणी हा दिसला की त्याला ठार मारायचं ही आपल्या डोक्यात पक्की असलेली कल्पना. पण आपण त्याला त्रास दिला नाही तर साप काहीही उपद्रव करत नाही, हे हरिबाबांनी एकदा एका सापाला मारायला निघालेल्या लोकांना पटवून दिलं. 

असह्य आणि असाध्य झालेली पोटदुखी रोग्याला काहीतरी खायला देऊन बरी करणं ही गोष्ट बर्‍याच संतांच्या चरित्रात का बघायला मिळते, याचा विचार केला तर या किंवा मागच्या कुठल्या तरी जन्मात दुसर्‍याच्या पोटावर अन्याय करण्यामुळे त्याला ही पोटदुखी जडलेली असते हे संतांच्या लक्षात येतं. कर्म जाळण्याचं सामर्थ्य असणारे संत स्वतःची शक्ती खर्ची घालून दुःखितांचे दुःख दूर करतात.  देवाला मलिदा अर्पण करण्याचा नवस पूर्ण न करण्यामुळे एका जणाला लागलेली असह्य पोटदुखी श्रीहरिबाबांनी अंतर्ज्ञानानं ओळखून त्याच्याकडून तो नवस पुरा करुन घेऊन बरी केली. सगळं ज्यानं आपल्याला दिलंय त्या देवालाच ‘मी तुला अमकं-तमकं अर्पण करीन’ अशी लालूच दाखवणं आणि काम होताच दिलेलं हे वचन सोयिस्करपणे विसरणं ह्या दोन्ही गोष्टी लीलया करणार्‍या माणसाच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच!

श्रीहरिबाबांनी नुसता स्पर्श केल्यामुळे रोग बरा होणं, विषबाधा दूर होणं वगैरे अनुभवही खूप लोकांनी घेतले. पण एकदा खुद्द हरिबाबांनाच पोटदुखीचा असह्य त्रास होऊ लागला. तेव्हा भक्तांनी बाबांना औषध घेण्याचा आग्रह केला. त्यावर बाबा म्हणाले, ‘अरे औषधानं रोगाचा नाश होईल, पण कर्मांच्या नाशाचं काय?‘  यातून बाबांना हेच सांगायचं होतं की कर्मांच्या फळातून माझीही सुटका नाही. अर्थात ही कर्म बाबांनी भक्तांच्या सुटकेसाठी त्यांची स्वतःच्या अंगावर घेतलेलीच कर्म बहुताशांनं असायची. हातानं काम करावं, पण मनात विठ्ठलाचं नाम असावं, संसार मनापासून करावा पण देवाचं विस्मरण होऊ नये, सुख किंवा दुःख; दोन्हीही जास्त मनात ठेवू नये, कोणाचाही अनुभव घेतल्याशिवाय त्याला चांगला किंवा वाईट ठरवू नये, आपल्या पूर्वकर्मांमुळे आपलं चित्त मलीन झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला सत्पुरुष ओळखता येत नाही. अशा अगदी सोप्या शब्दांमध्ये हरिबाबा उपदेश करत.

सीताराम करंजकरांचा पांगळा मुलगा हरिबाबंानी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच उठून पळू लागला हा लोकांना चमत्कार वाटला, परंतु संसारात पांगळे झालेल्या किती लोकांना बाबांनी उभं केलं त्याची गणती कोण करणार! बाबांच्या आशीर्वादानं पीक शतपटीनं वाढलं हा चमत्कार लोकांनी अनुभवला, पण बाबांनीच पेरलेलं भक्तीचं पीक किती पिढयाचं कल्याण करणारं ठरणार हे कोण बरं सांगू शकेल! मान-सन्मान, सोपस्कार या गोष्टी योगी माणसाचं नुकसान करायला कारणीभूत होतात. त्यामुळे योगी सत्पुरुष हे नेहमी आपण खुळे आहोत असाच सार्‍यांचा समज व्हावा असं वागतात. श्री हरिबाबांनीही तेच केलं. त्यामुळे त्यांना खर्‍या अर्थानं ओळखणार्‍या लोकांनीच त्यांच्यावर खरं प्रेम केलं. काहींनी त्यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तर कित्येकांनी त्यांच्या बाह्यरंगावरुनच त्यांना बाद ठरवून टाकलं. प्रत्यक्षात जीवनाची परीक्षा उत्तिर्ण होण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करणार्‍या गुरूंचीच परीक्षा घेणार्‍या लोकांची कीव करावी तेवढी थोडीच. पण अज्ञानी माणूस कोणत्या थरापर्यंत चुका करेल हे सांगणं अशक्य असतं. असो. 

तर अशा रितीनं श्रीहरिबाबांचं जनकल्याचं कार्य त्या पंचक्रोशीमध्ये अविरतपणे चालू होतं. स्वतःच स्वतःचे मालक असलेले हरिबाबा त्यांच्या मनात येईल तसा सर्वत्र संचार करत. परंतु समस्या असलेल्या घरासमोर बोलावणं धाडल्याप्रमाणे अचानक दत्त म्हणून उभे रहात आणि त्या व्यक्तीला उपाय सांगून लगेच दिसेनासेही होत. हरिबाबा हे लोकांना प्राणवायुसारखे झाले होते. कारण समस्येचं निराकरण म्हणजे हरिबाबा हे सूत्रच झालं होतं. आणि समस्या नाही असा या जगात कोण बरं आहे? दिवसेंदिवस हरिबाबांचे भक्त वाढत चालले होते. आणि बाबांनीही लोकांची दीन अवस्था बघून आपल्या दयेचं आणि कृपेचं छत्र जास्तीत जास्त लोकांवर धरण्याचा प्रयत्न ठेवला होता. पण शेवटी मानवी देह धारण केला की सत्पुरुषांच्या जीवनालाही मर्यादा येतात. देहाचे सर्व भोगही त्यांना भोगणं क्रमप्राप्त होऊन जातं. बाबांची सेवा करणारेही खूप लोक होते. पण वयोमानाप्रमाणे देहाला येणारा थकवा कसा बरं दूर होणार? बाबा हे देहात असूनही विदेही अवस्थेत होते हे खरं असलं तरीही देहाच्या आधारानंच आत्मा काम करत असल्यामुळे देहाची कमी कमी होत जाणारी कार्यक्षमता सत्पुरुषांच्या कार्यावर परिणाम घडवतेच. 

सदगुरू श्री हरिबाबा समाधी

सदगुरू श्री हरिबाबा समाधी
हल्ली हरिबाबांचा मुक्काम फलटण शेजारच्या मलठणमध्येच होता. काया थकलेली होती. त्यामुळे भ्रमंती जवळजवळ थांबली होती. कधी फिरायला जावसं वाटलं तर बाबा कुठल्या तरी भक्तांच्या खांद्यावर बसून जात. हरिबाबा धर्मशाळेत एका खोलीत रहात. त्या खोलीत भक्तमंडळी सतत भजन करत असत. श्रीहरिबाबांच्या आज्ञेप्रमाणे भक्तांनी रथसप्तमीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम करुन उत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. पहिल्या वर्षी भक्तांनी भजन, अन्नदान आणि इतर धार्मिक कार्यक्रम करुन तो उत्सव साजरा केला. दुसर्‍या वर्षी रथसप्तमी जवळ आल्याबरोबर भक्तांना मागच्या वर्षीची आठवण झाली आणि मग सारे उत्साहानं कामाला लागले. सुंदर असा मंडप उभारला गेला. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्याचं पूजन करण्यात आलं. अळीअळीतून भक्तांच्या दिंडया निघाल्या. सारे निघाले होते उत्साहानं आणि भक्तिभावानं त्यांचं आराध्य दैवत असलेल्या श्रीहरिबाबांच्या दर्शनाला. दिवसभर त्या उत्सवमूर्तीसमोर भजनादी कार्यक्रम झाले. दुसर्‍या दिवशी महाप्रसाद झाला. भात, सांबार, लापशी असा बेत होता. आकंठ प्रसाद घेऊन सारे भक्तगण तृप्त झाले. तिसर्‍या दिवशी म्हणजे नवमीला संध्याकाळी रावजींचे चिरंजीव नारायणबुवा यांचं संत एकनाथ महाराजांच्या आख्यानावर कीर्तन झालं. पुढे दशमीला दहीहंडीचा कार्यक्रम होऊन या भक्तिजागराची सांगता झाली.
 
दुसर्‍या दिवशी म्हणजे एकादशीला श्रीहरिबाबांच्या खोलीमध्ये बाबांचा सेवक बाबांचे पाय चेपून देत होता. बाकीचेही काही भक्त बाजूला बसले होते. पण एका क्षणी अचानकच बाबांचे पाय एकदम गार वाटू लागले. एकानं, दुसर्‍यानं, तिसर्‍यानं हे पाहिल्यावर सगळेच हादरले. एका जणानं पटकन जाऊन वैद्यांना बोलवून आणलं. पण वैद्यांनी तपासताक्षणीच खिन्न आवाजात सांगितलं, ‘बाबांनी देह कधीच सोडलाय.....‘ ते शब्द तिथं असलेल्या शिष्यांच्या कानात उकळलेल्या शिसाच्या रसागत पडले अन् त्या खोलीत एकच रडारड सुरु झाली. रथसप्तमीच्या उत्सवाची कालच सांगता झाली. आणि सारे आनंदाचे डोही तरंगत असताना....... ही एकच लाट सार्‍यांना दुःखसागराच्या तळाशी घेऊन गेली? कुणालाच काही सुचत नव्हतं. तिथं आता दुःख आणि विरहाशिवाय काहीच नव्हतं. इतकी वर्ष फलटण आणि परिसरातल्या लोकांचा आधार बनलेला तो महापुरूष त्याच्या साम्राज्यात परत गेला होता....... अशक्य ते शक्य करणारा ईश्वरी जादुगार आज गुप्त झाला होता..... भक्तजनांचा कल्पवृक्ष आज अचानक सुकला होता...... अगदी साध्या भाषेत जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा संत स्वधामाच्या वारीला गेला होता....... या देहाचं चीज सत्कर्म करण्यामध्येच आहे हे सांगणारा दिगंबर स्वतःचा सुगंध घराघराला देऊन स्वतःच्या घरी गेला होता........ दिसल्यापासून आजतागायत कुणालाही न उलगडलेला हा परमेश्वर आता अचानक आला तसाच अचानक गेला होता. 

हळूहळू डोंगरावरच्या वणव्यासारखी ही बातमी सार्‍या भक्तांची मनं होरपळून काढत सर्वदूर पसरली, आणि काही वेळातच मलठणच्या दिशेनं लोकांचे लोंढेच लोंढे वाहू लागले. भजन-दिंडयाही येऊ लागल्या. भगवंताच्या आणि हरिबाबांच्या नामघोषानं मलठण दणाणून निघालं.  पूर्वेच्या बाजूला हरिबाबांचा देह आसनस्थ करून ठेवण्यात आला होता. थोडयाच वेळात तिथं मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही एवढी गर्दी झाली. आणि एक एक करुन सारे जण त्या दैवताचं अंत्यदर्शन डोळयांमध्ये साठवू लागले. खुद्द मालोजीराजे निंबाळकर हे देखिल दर्शन घेऊन गेले. त्यांनी केलेल्या सूचनेबरहुकूम पर्वतराव निंबाळकर यांनी त्रिजटेश्‍वराच्या आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या मध्यावर सुंदर अशी समाधी बांधून घेतली. श्री मुधोजीराजे निंबाळकर हेही दर्शन घेऊन गेले.

त्यानंतर भक्तांनी बाबांना स्नान घालण्यासाठी पाणी तापवलं. गोविंदराव कानडे यांनी पुरुषसुक्त म्हणून बाबांना पंचामृताचा अभिषेक घातला. मंगलस्नान घातलं, त्यानंतर बाबांच्या डोक्यावर टोपी आणि अंगावर कफनी घालण्यात आली. कपाळावर केशराचा टिळा लावण्यात आला.  त्यावर अक्षता लावल्या गेल्या. गळयात फुलांच्या माळा घालण्यात आल्या. टोपीवर तुळसीपत्रं ठेवली गेली. नंतर बाबांची पूजा आणि आरती झाली, आणि मग ढोल, ताशे, झांजा, शंख, शिंग, तुतारी, घंटा, दुंदुभी अशा वाद्यांच्या गजरात फुलांच्या विमानात बसवून त्या योगमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. पुंडलिकांच्या आणि त्रिजटेश्वराच्या मंदिराला उजवी घालून ती मिरवणूक समाधीस्थळी आली. समाधीच्या आतमध्ये उत्तम आसन तयार करण्यात आलं. त्यावर श्रीहरिबाबांना बसवण्यात आलं. शेजारी दोन नंदादीप जळत होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर जेव्हा समाधी बंद करण्यात आली, तेव्हा!‘ सद्गुरु हरिबुवा महाराज की जय’ च्या गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला, समाधीच्या वरच्या भागावर महाराजांच्या कोरलेल्या पादुकांचंही पूजन करण्यात आलं. माघ शुध्द एकादशी शके १८२० (इ.स.१८९८) ला दुपारी ४.३० वाजता जरी हा सोहळा संपन्न झाला, तरी पुढे कितीतरी वेळ भक्तमंडळी या ठिकाणी खिळून होती!

श्रीहरिबाबांच्या दर्शनाला नित्यनेमानं येणारे लोक जरी खूप होते आणि हरिबाबांनी अगणित लोकांवर जरी कृपा केलेली असली, तरी समर्थ रामदासस्वामींना जसे कल्याण किंवा श्री गोंदवलेकर महाराजांना जसे केतकर बुवा तशा हरिबाबांना लाटे गावच्या मोरे घराण्याची सून झालेल्या गोजिराबाई या अधिकारी शिष्या होत्या. भक्ती आणि अधिकार या पूर्णपणे वेगवेगळया गोष्टी आहेत. भक्ती करणारे खूप भक्त किंवा शिष्य असले तरी तेवढा अधिकार प्राप्त केलेला शिष्य हा फार विरळा असतो. गोजिराबाईंना सारेजण ‘आईसाहेब’ या नावानं ओळखत आणि त्यांनीही असंख्य लोकांचं कल्याण करुन लाटे या गावीच देहत्याग केला. धन्य गुरु हरिबाबा आणि धन्य शिष्योत्तमा आईसाहेब.  

ओम श्री हरिबाबाय नमः

Sunday, April 27, 2025

कुरवपुर एक दुर्गम पण जागृत दत्तक्षेत्र

 

कुरवपुर

कुरवपुर  एक दुर्गम पण जागृत दत्तक्षेत्र


दुर्गम श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी ..


कुरवपुर ला येणे सर्वानाच आवडते परंतु तीथे सुख सुविधा नसल्यामुळे भक्त लोकांना तीथे रहायला आवडत नाही परंतु तीथे सुख सुविधा नाहीत अन्नछञ नाही हाँटेल्स नाहीत या साठी कोणीही व्यक्ती जबाबदार नाही तीथे विराजमान असल्यालेल्या परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना या गोष्टी नको आहेत त्यांची ईच्छा नसल्यामुळे अजूनही या गोष्टी बनू शकल्या नाहीत 1980 साली कुरवपुर च्या कृष्णा नदीवर सरकार कडून पुल मंजूर झाला आहे तरीही आज 44 वर्ष झाली तरी तो पुल पुर्ण होऊ शकला नाही आहे याचे कारण एकच आहे की परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना वाटते इथे गर्दी वा गोंधळ वाढायला नको कारण इथे गर्दी वाढली तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पुर्ण कराव्या लागणार तसेच चांगल्या भक्तांच्या बरोबर वाईट भक्त सुद्धा परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे दर्शन घेणार आणि परमात्मा हेच नको आहे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची ईच्छा आहे फक्त निवडक निस्सीम श्रद्धा असलेल्या भक्तानाच दर्शन देण्यासाठी कुरवपुरात बोलावावे जे लोक भाग्यवान आहेत ज्यानी आपल्या भक्तिने मागिल जन्मी परमात्मा प्राप्ती केली आहे अश्या भाग्यवान पुण्यवान भक्तानाच परमात्मा कुरवपुर मध्ये बोलवतो, कुरवपुर मध्ये जाणे सोपे नाही आहे इथे जाण्यासाठी अनेक जन्माची भक्ती फळास यावी लागते इथे जाण्यासाठी  अनेक जन्माची सत्कर्माची  पुंजी असावी लागते तसेच इथे जाण्यासाठी प्रबळ ईच्छा असावी लागते व परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ भेटण्यासाठी तीव्र ओढ असावी लागते त्यांच्या वर श्रद्धा असावी लागते तेव्हाच तीथून आपल्याला बोलवणे येते परंतु तीथे जाण्यासाठी ऐवढ्या गोष्टी का बघीतल्या जातात..? तर त्याचे उत्तर आहे हे कलियुग आहे इथे भक्त प्रल्हादा सारखे भक्त आहेतच तसेच हिरण्यकश्यपु सारखे सुद्धा आहे आणि परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना फक्त भक्त प्रल्हादा सारखेच भक्त प्रिय आहेत त्यामुळे त्यानाच आपले दर्शन घडावे,आपण इथेच आहो याचा सुद्धा अनुभव यावा  म्हणून तर इथे येण्यासाठी खुप गोष्टी बघीतल्या जातात, म्हणून कुरवपुर या ठिकाणी जे जे जाऊन आलेत व ज्यानी ज्यानी भगवंताचे कुरवपुर मध्ये जाऊन दर्शन घेतले आहे ते सर्वजण धन्य आहेत तेच या कलियुगातील भगवंताचे प्रिय भक्त प्रल्हाद आहेत  . तेच श्री श्रीपाद वल्लभ  यांना प्रिय आहेत.

आता प्रथम पाहू श्रीक्षेत्र कुरवपूर ...कसे जावे ? इथे  दुर्गम क्षेत्री पुजारी कसे आले ? श्रीपाद आश्रम पंचदेव पहाड काय  आहे ?

१ ) या क्षेत्री असे जावे


कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक (KURAVPUR)-
हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावरआहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. याक्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या अठराअक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. 
मुंबई, बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वेमार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो. होडिने १ कि. मी. प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबादया बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते. तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ कि. मी. अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते. नंतर होडिने प्रवासकरून १ कि. मी. अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचतायेते. हा मार्ग अधिक सोयीचा आहे. पंचदेव पहाड यागावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.

२) कुरवपूरचे अर्चक अर्थात पुजारी कसे आले ?


नारायण महाराज नावाचे एक ग्रहस्थ होते. त्यांचे वरचेवर कुरवपूर या स्थानी येणे जाणे होते. तेथील सर्व परिस्थिती त्यांना माहित होती. म्हणजे मंदिरातील पुजे पासून ते पुजारी लोकांच्या पर्यत म्हणजे सर्व माहिती असणारे असे ते नारायण महाराज होते. एकदा ते असेच एका गावी गेले व त्या गावातील एका मंदिरात गेले. तेव्हा त्या गावातील मंदिरात नेहमी असणारे पुजारी नव्हते. त्याजागी त्या पुजाऱ्याचा पुतण्या, केशव हे सर्व करत होता. नारायण महाराजांनी बारीकपणे त्या केशव पुजाऱ्याचे कार्य पाहिले. केशव पुजारी हे आपल्या काकांच्या म्हणजे गोविंद पुजाऱ्याच्या हाताखाली तयार झाल्यामुळे अगदी व्यवस्थित कोणतेही गोंधळ न करता मंदिरातील सर्व पुजा-अर्चा अत्यंत चोख पार पाडली. भजन, कीर्तन, पालखी, गायन अत्यंत छान केले. आणि त्याचा प्रभाव श्री नारायण महाराजांच्यावर पडला. त्या राञी नारायण महाराजाना झोप पण आली नाही. त्यांच्या मनात एक विचार सूरू होता. तो विचार घेऊन दुसरे दिवशी ते मंदिरात पोहचले. त्यांनी केशव पुजाऱ्यांच्याकडे त्याच्या आई वडीलांच्या बद्दल चौकशी केली तेव्हा कळाले, त्यांचे आई वडील इथून तीन मैल अंतरावर असलेल्या एका गावात रहातात.

नारायण महाराज केशव पुजारीच्या वडीलांना म्हणजे रंगभटजीना भेटायला त्यांच्या गावी गेले. जेव्हा ते रंगभटजीना भेटले तेव्हा ते म्हणाले, "श्री दत्ताञेयांच्या प्रेरणेने मना मध्ये अकस्मात एक संकल्प निर्माण झाला आहे. आणि मला खाञी आहे हा मूळ संकल्प माझा नसून तो परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांचा आहे. मी फक्त निमित्त आहे !" असे बोलून ते पुढे म्हणाले "रायचूर पासून २० मैला वरती कुरूगड्डी नावाचे एक गाव आहे. या कुरूगड्डी गावात दत्ताञेय प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे अतिशय पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील सर्व पुजा अर्चा तेथील दोन ब्राम्हणच करतात. पण त्या दोन्हीही ब्राम्हणांची लग्न होऊ शकलेले नाहीत. दोन्ही ब्राम्हण वृद्ध झालेले आहेत आणि मंदिरातील पुजा अर्चा पुढेही सूरू ठेवायची आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलाला म्हणजे केशवला आम्हाला दत्तक देता का ? आम्ही त्याला कुरूगड्डी मधील पुजारी बनवतो." असे बोलून त्यांनी विनंती केली. तेव्हा केशव पुजारींच्या आई म्हणाल्या "कुठ ते निर्जन ठिकाण ? अनोळखी ठिकाण ? खुप दुर असलेले ते स्थान, अपरिचित लोक ! त्यामुळे मी माझ्या मुलाला दत्तक देणार नाही ! मी माझा मुलगा देणार नाही, माझा मुलगा मला जड झालेला नाही. आम्ही त्याचे पालन पोषण करणेस समर्थ आहोत." तेव्हा नारायण महाराज खुप नाराज झाले व तिथून निघून गेले. 
 
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आज्ञेने आणि आशिर्वादाने आश्रमात नित्य अन्नदान चालू आहे. डिसेंबर 2007 पासून ते 2014 पर्यंत पांडुरंग स्वामी मंदिरात नित्य अन्नदान चालू होते. नंतर दि. 03-05-2014 पासून श्रीपाद छाया आश्रमाची पक्की इमारत बांधली तेथे सुद्धा नित्य अन्नदान चालू आहे. रोज 200 गरीब मुले, अनाथ, वृद्ध लोक जेवायला असतात. अन्नासाठी तळमळणार्‍यांना अन्न दिल्यास त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.  अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता हे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. दत्त संप्रदायात असे सांगितले गेले आहे की जेथे अन्नदान चालू असते तेथे स्वामी सूक्ष्मरुपात येत असतात.
 नंदिनी गो-शाळेत 50 गाई आहेत. येथून आलेल्या दूधाने देवळात अभिषेक होतो आणि अन्न दानांत वापरले जाते.आपल्या पुराणात गोपूजेला खूप महत्व दिले आहे. हिंदू परंपरेत गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. याला गोपूजा म्हणतात. पुराणात सांगतात की चार समुद्र  गाईच्या दूधात आहेत. वैदिक विद्वान म्हणतात की गायीच्या सर्व भागामध्ये सर्व जग लपलेले आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवण्यासाठी गायीची उपासना केली पाहिजे.

येथे श्रीपाद श्री वल्लभ गुप्त रूपाने उपस्थित आहेत .प्रत्येक दत्तभक्तांनी पुण्य अर्जित करून येथे दर्शनास येऊन पुण्यसंचय करावा 

।। शुभम भवतु ।।

Friday, April 25, 2025

ज्याचे प्रपंचात भगवंत आहे तोच परमार्थ


 ज्याचे प्रपंचात भगवंत आहे तोच परमार्थ  ....

ज्याचे कोणी नसते, त्याचा भगवंत असतो, आणि तसे पाहयला गेले तर भगवंता शिवाय आपले कोणीच नसते, अगदी कोणी म्हणजे कोणीच नसते.*
       म्हणून जो आपला आहे,(भगवंत)त्याच्यावरच जास्त प्रेम करावे, त्यालाच जीव लावावा, आणि त्याच्याच छत्र छायेत रहावे.*
       मणुष्य अगदी लबाड आहे, अगदी तो आपला कितीही जवळचा असो, अथवा रक्त नात्यातला असो तरी ही तो लबाडच असतो. स्वार्थ साधत असेल तरच तो आपल्याशी सलगी ठेवतो,आणि समाज्याच्या भितीने नाते टीकवतो.पण भगवंत हा निस्वार्थी व अत्यंत प्रेमळ व दयाघन असल्या कारणाने सर्व सोडून गेल्यावरही तो आपल्याला अगदी शेवटच्या स्टेप पर्यंत नव्हे नव्हे जन्मोन् जन्मी ही सोडून जात नाही, उलट माणूसच संसारीक गोष्टींपायी त्याला विसरतो, तरीपण भगवंत माणसाला कधीच एकटा सोडत नाही.
       म्हणून भगवंताशी कृतज्ञ असावे, त्याच्या नामाचा आधार घेऊन नेहमी त्याचे स्मरण व लीला मय आयुष्य (अवतारचे) अनुभवत रहावे."*

खरा मी म्हणजे देह नव्हे. पण देह माझा म्हणताना  "मी देह" असे म्हणतो व
 वागतो. मी देह आहे हे  एक टोक व मी तो आहे हे दुसरे टोक. 

जितके एकीकडून दूर, तितके दुसरीकडे जवळ. हे जवळपण सहवासाने आले.

सहवासाने मी जसा देह झालो तसा भगवंत कां होणार नाही? नामस्मरण हे त्यासाठी आहे. देहाचा विसर पडायला दुसर्‍याचा आठव पाहिजे. सर्व मार्ग त्यासाठी आहेत.

मी चोवीस तास भगवंताचाच    आहे. मी जन्मापूर्वी त्याचा होतो, मागून त्याचाच होणार.मग मध्ये मी त्याचाच असलो पाहिजे हे असे अनुसंधान पाहिजे.
प्रपंचात संकटातून कसे बाहेर पडाल? 
तर मुंगी पाण्यात पडली तर न घाबरता जीव वाचविण्याकरिता सर्वत्र निरीक्षण करते. पाण्यावर तरंगणारे पान किंवा गवताची काडी दिसताक्षणीच पानाचा आधार घेऊन किनाऱ्यावर येते. 

संसारात आर्थिक संकटे, असाध्य रोग, बेकारी, मुलीच लग्न न जमणे आणि शत्रूपिडा अशी संकटे येत असतात. अशावेळी जवळची माणसही मदतीचा हात देत नसतात.
अशा प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रमाने नोकरी किंवा कुशलतेने व्यापार करून अधिक धन कमवावे. 

जीवनात श्रमा बरोबर यश मिळविण्याकरिता उपासना करून ईश्वर कृपा प्राप्त करावी लागते. आपल्या शरीरीक आणि  बौद्धिक शक्ती बरोबर भक्तीद्वारे ईश्वर साह्य मिळविण्याची गरज असते.

दृढ श्रद्धा आणि दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या शास्त्रात संकट मोचक मंत्र दिले आहेत. विष्णू सहस्त्र नाम, रामरक्षा, हनुमान आणि दत्त गुरुंची स्तोत्रे आहेत. अधिकारी आणि अभ्यासू पुरुषांकडून तारक मंत्र आणि मंत्रविधी माहीत करून श्रद्धेने अनुष्ठान केल्यास मानसिक बळ आणि संकटाची तीव्रता कमी होऊ शकते
म्हणून आसक्ति फक्त भगवंताची असावी.

कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरुरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो. खरोखर, मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग ? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग ? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची बंधने पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की, माझा लोभ कमी व्हावा. खरे म्हणजे, आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत बसतो; इथेच आपले चुकते. काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ, एखाद्याला सांगितले की, हातपाय न हलविता, काही न करता, स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काही तरी करणे जरूरच आहे, तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो ? तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे ? तर ते भगवंतासाठी होय. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे, तरच मानव सुखी होईल.

सुधारणांनी सोयी केल्या, म्हणजे देहसुख वाढविले. त्याने परावलंबित्व मात्र आले; आणि परावलंबनात खरे सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती. विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे, किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत. विद्वानालासुद्धा ‘ मला नोकरी द्या ’ म्हणून अर्ज करावा लागतो; म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत, त्या कशाही मिळवाव्यात. पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर, तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवाणे राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये. आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी, आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे. ‘ मला कुणी शत्रू नाही आणि मित्र नाही ’ अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते; त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय; हीच विद्या होय, हाच खरा धर्म होय, आणि हेच परमार्थाचे सार होय.
जेव्हा आपण प्रत्येक कृती देवाला अर्पण म्हणून करतो तेव्हा ते यज्ञ बनतात आणि देवाच्या कृपेने त्या यज्ञाने आपणांस आनंद प्राप्ती होते.
म्हणून....आपल्या आनंदासाठी देवाने आपल्यावर केलेल्या सर्व कृपेबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे!!!

ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो.

|| श्री गुरू शरणं  ||

Wednesday, April 23, 2025

श्रीगुरुप्रतिपदा (माघ वद्य प्रतिपदा)

 

श्रीगुरुप्रतिपदा (माघ वद्य प्रतिपदा)

श्रीगुरुप्रतिपदा (माघ वद्य प्रतिपदा) श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज निजनांदगमन दिवस!


गुरुवार १३फेब्रुवारी २०२५

नमो सदा श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज ।।





 गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झालेश्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन
गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या.
 
बहुधान्य संवत्सर माघमास ।कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पती होता सिंहराशीस । उत्तर दिशो होता सूर्य पैं ।।
शिशिरऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसं शुभमुहूर्ती गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते जाहले ।। 
मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं ।बैसोनि शिष्यांस संबोधोनी । आमुचा वियोग झाला म्हणौनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ।। 
त्या गाणगापूरांत । आम्हक असोंच पूर्ववत । भावना धृढ धरा मनांत । तुम्हा दृष्टांत तेथें होईल ।।
आम्ही जातो आनंद स्थानासी । तेथें पाहलों याची खूण तुम्हांसी । फुले येतील जिनसजिनसीं ।। 
श्रीगुरूचरित्र अ. ५३ ओवी ३१ ते ३५

दयेची, कृपेचीच जी शुद्ध मूर्ती ...धाव घेई हे मन गाणगापुरी.....!!
ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पादुका। मन्त्र मूलं गुरु वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा।।

माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. 

आजच्या तिथीला भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यति पूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या 'विमल पादुका' स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

भगवान श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात, म्हणून या तीन पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत.

विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वत: श्रीनृसिंहसरस्वती महाराज म्हणतात, 

तुम्हां सहित औदुंबरी । आमुच्या पादुका  मनोहरी ।
पूजा करिती जे तत्परीं । मनोकामना पुरती जाणा ॥
श्रीगुरुचरित्र १९.८१ ॥

देव वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की, जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल.  भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, 

कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचें जेथ स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥
श्रीगुरुचरित्र ५१.२१ ॥

पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्पपुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्प
भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना 'निर्गुण पादुका' म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणा-या पादुका असाच घ्यायला हवा.  या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. 

श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषाना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो खाली देत आहोत.

श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही!

Saturday, April 19, 2025

श्रीपाद श्रीवल्लभ विश्रांती स्थान ...कुरुंदवाड

 


श्री श्रीपाद श्रीवल्लभ दत्रात्रेय मंदिर ( विश्रांतीस्थान ), कुरुंदवाड.


श्रीपाद श्रीवल्लभ विश्रांती स्थान ...कुरुंदवाड 


स्थान: कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि - कोल्हापूर. श्री क्षेत्र नरसोबावाडी पासून ३ कि मी    
सत्पुरूष: श्रीपाद श्रीवल्लभ              
स्थान माहात्म्य: श्रीपाद श्री वल्लभ यांचे विश्रांतीस्थान   


श्री कृष्णा-वेण्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या पवित्र संगमकाठी कुरुंदवाड ( कुरवपूर ) हे एक प्राचीन नगर आहे. निसर्गतःच तीर्थत्व लाभलेल्या या आकर्षक परिसराकडे साधू संतांची पावले न वळतील तर नवलच ! कृष्णा नदीच्या पूर्व तीरावरील अमरापूर ( औरवाड ) आणि पश्चिम तीरावरील कुरवपूर ( कुरुंदवाड ) हि दोनही गांवे श्री. क्षेत्र नृसिंहवाडी वसण्याच्या म्हणजे इ. स. १४३५ च्या आधीपासून अस्तित्वात आहेत. गुरुचरित्रातील अ. १८, ओवी क्र. १३ मध्ये केलेल्या वर्णनावरून  - " कुरवपूर महागहन ! कुरुक्षेत्री तोचि जाण !! पंचगंगा-कृष्णा संगम ! अति उत्तम परियेसा !!" अशा सार्थ शब्दात कुरुंदवाडचे वर्णन केले गेले आहे.

श्री दत्त प्रभूंचे अवतार, भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करीत असतात, स्मरण करताच प्रत्यक्ष येऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात. कृतयुगात स्त्री अनसुया यांच्या तपाने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्त भक्तीरुपी कल्पवृक्ष संवर्धित केला.

त्यांचा द्वितीय अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठीकापुरम ( पिठापूर ) येथे इ. स. १३२० मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी ( गणेश चतुर्थी ) च्या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा, आपस्तंभ सूत्र, भारद्वाज गोत्रेंवद्भव ब्रह्मश्री घंडीकोटा अप्पलराज शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. पिठापूरम येथे १६ वर्षे तर कुरवपुरात १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षाच्या काळात त्यांनी अद्भुत अशा लीलाचरित्र दाखवून स्वभक्तांना इह परलोकातील शास्वत सुख प्रदान केले. सण १३२० ते  १३५० च्या त्यांच्या काळात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी या रूपात, या परिसरात राहून गेलेले आहेत. कुरुंदवाड ( कुरवपूर ) मधील सध्याचे श्रीदत्त मंदिर जे पूर्वीच्या राजप्रासादालगत, त्याच्या उत्तर दिशेच्या उतारावर "अनवडी" नामक पंचगंगेच्या उपप्रवाहाकाठी आहे, तिथे त्याकाळी गर्द वनराई होती. तिथे श्री. श्रीपाद वल्लभ वामकुक्षी घेत असत. त्यामुळे हे ठिकाण त्यांचे निद्रास्थान म्हणून ओळखले जाते.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे समवेत या कृष्णा प्रयाग तीर्थावर आलेले श्री. रामचंद्र योगी महाराज यांना आपण श्री. नृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने जन्म घेऊन परत या वैकुंठ भूमीत येईन त्यावेळी परत एकदा आपली भेट होईल असे भविष्य वचन दिले होते. ते खरे करणेसाठी ते कारंजा नगरीत श्री. नृसिंह सरस्वती स्वामींच्या रुपाने तेथील माता आंबा आणि माधव यांचे पोटी इ. स. १३७८ मध्ये भाद्रपद शु. ५४ रोजी जन्माला आले असून त्यांनी इ. स. १४२२ मध्ये येथील प्रयागांवर भिलवडी जवळील औदुंबर क्षेत्रावरून येऊन संगम क्षेत्रावरील दुआबाच्या जंगलात १२ वर्षे राहून आपली तपसाधना केली असून भक्तांचा उद्द्धार करताना अनेक लीला केल्या आहेत. त्यावेळी ते भिक्षेसाठी कुरुंदवाड, आलास, शिरोळ, अमरापूर, कोल्हापूर आदी परिसरात गावांत जात असत. तर कधीकाळी भक्ताघरी भोजनही करत असत. येथील तपाच्या तपःपूर्तीनंतर त्यांनी गंधर्वपूर ( गाणगापूर ) या भीमा अमरजा नद्यांच्या संगम क्षेत्राकडे आपल्या पुढील कार्यसिद्धीसाठी दिले वचनाप्रमाणे प्रयाण केले आहे. तत्पूर्वी भक्तांसाठी मनोहर पादुका, जान्हवी व अन्नपूर्णा यांची कृष्णा प्रयाग तीर्थावर स्थापना केली असून आलासच्या वृद्ध भैरंभटास वृक्ष तोड़ करून निवास करणेस सन १४६४ मध्ये आज्ञा केली असून वंश विस्ताराचा आशीर्वाद दिला आहे. त्या सुमारास नृसिंह वाटिका हे गांव नव्यानेच अस्तित्वात आले होते.    

पुढील काळात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आधी सूचित केल्याप्रमाणे एका जैन मतस्थाकडून श्री प्रभूंची माहिती पोहोचेल, तत्पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात दिली आहेत. त्या चरित्रामृताचा श्री गणेशा करणेस भक्तास सुचवले असून त्या श्री वल्लभांचा महिमा कथन करताना ज्या ज्या गोष्टीं कथित केल्या आहेत. उदा. त्या गावी जी भावंडे तेथील शेतीतून उत्पन्न घेत होती तेथे पायथ्याला एक विहीर होती. तेथून गेल्यानंतर फावडा घेऊन पाणी काढण्याच्या शोधात वाळू उकरत असताना अंतर्भागात दडलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वरती आला. त्याच्यातील व्यंगदोष नाहीसे झाले, मात्र त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला, ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढणेत आली.

कुरवपूर ( कुरुंदवाड ) या ठिकाणीही अगदी असाच  मिळता जुळता प्रकार एका जैन श्रावकाचे माध्यमातून घडलेला आहे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांच्या निद्रस्थळी पुढील काळात शेताची भांगलण करून गवत कापत असता त्यांच्या घर गड्याच्या खुरप्याला जमिनीखालील पाषाणांशी जोरदार संघर्ष होऊन त्यातून रक्ताची चिळकांडी उडतांना पाहिले नंतर या अनपेक्षित आणि आश्चर्यकारक प्रकाराने गर्भगळीत होऊन भीतीने बोबडी वळलेल्या अवस्थेत तो वाड्यावर परतला. या ठिकाणीही अशीच पाण्याची विहीर उपलब्ध आहे. येथील जैन श्रावकाला दृष्टांत देऊन श्रीं नी अभय दिले असून पादुकारूपी पाषाणाची स्वच्छता करून विधिवत स्थापना करणेस सुचविले. हा प्रकार सुमारे १७ व्या शतकात घडला असावा असे सन १६५८ मध्ये त्र्यंबक हरी पूजक यांना येथील पूजेसाठी नियुक्त केलेल्या दाखल्यावरून अनुभवास येते. त्या काळाचे जैन श्रावक नरसगोंडा सकगोंडा पाटील ( मजरेवाडीकर ) हे असावेत असे अनुमान त्यांच्या प्राप्त वंशावळीवरून निघते. विजापूरच्या आदिलशहाने त्यांना पाटीलकीचे वतनासह २०० एकर जमीनही इनामात बहाल केल्याचे समजते. १७ व्या शतकात मंदिर बांधणी कुणी केली व पूजेचा हक्क त्रिंबक पंतांना कोणी दिला हे अनिश्चित आहे. मात्र त्यांना पाटील घराण्याकडून देवासाठी ज्वारी, डाळ, तूप इ. साठी तजवीज केली जात असे. पुढील काली हीच प्रथा चालू ठेवण्यासाठी एक सामान्य लेखा करून ठेवला आहे. त्यानुसार रायगोंडा बिन नरसगोंडा पाटील, रा. मजरेवाडी यांनी वेदमूर्ती रा. रा. जिऊभट्ट बीन गंगाधर भट पुजारी-जोशी, गोत्र गार्ग्य, सूत्र आश्वलायन मौजे कुरुंदवाड यांसी मौजे मजकूर ( कुरुंदवाड ) येथील हद्दीमधील त्यांना आदिलशहा दुसरा यांचे कारकिर्दीत मिळालेल्या इनामाच्या पाच बिघे मधील दोन बिघे जमीन हि कुरुंदवाडचे श्री. नरसोबाचे दररोजच्या नैवैद्यासाठी जसे त्यांचे पूर्वजांनी व वाड वडील सुरु केलेल्या प्रथेनुसार देवांस ज्वारी, डाळ, तूप इ. साठी देत आले, त्याच प्रमाणे पुढे चालू ठेवण्यासाठी चालू सालापासून म्हणजे शके १७६९ ( सन १८४७ ) पासून याचा प्लवंगणाम संवत्सर सन १२५७ फसली पासून या इनाम करून दिलेल्या दोन बिघे जमिनीचा वापर करून त्यांनी देणाऱ्याचे आणि यजमान स्वामींचे अभिष्ट चिंतन करणेचे आहे. असा मजकूर असून ते धरणगुत्तीचे बाजूस पंचगंगेपलीकडे गट नं. २६० ही पालखी चावर नावाने ओळखली जाणारी जमीन आहे. या मंदिरातील देवपूजेचे काम त्रिंबक हरी पूजक यांचेकडे सन १६५८ मध्ये सोपविण्यात आलेपासून पूजा - नैवेद्य ही देवकार्ये वंशपरंपरेने आजतागायत श्री. नारायण विष्णू जोशी व कृष्णाजी गुंडभट पुजारी हे वर्षा वर्षाच्या फेरपाळीने हे कार्य सांभाळत असतात. तसेच रायगोंडा बिन नरसगोंडा पाटील यांचे सध्याचे वारस श्री. दा. आ. तथा रावसाहेब पाटील ( माजी नगराध्यक्ष ) हे या मंदिराशी असणारे जुने अनुबंध कायम ठेवून आहेत.

इ. स. १४३६ मध्ये कुरुंदवाड गांव राणोजी कापशीकर घोरपडे यांचेकडून श्री. ब्रम्हीभूत हरभटजी बाबा पटवर्धन यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी यांच्या अधिपत्याखाली आले. हरभटजी बाबा ( इ. स. १६५५ ते १७५० ) हे स्वतः नृसिंहवाडीच्या दत्तगुरूंचे भक्त होते. दत्त दर्शनासाठी ते दररोज वाडीस जात असत. पुढे त्यांना कुरुंदवाडच्या दत्त मंदिराचे महात्मेही वाडीच्या दत्त मंदिरा इतके आहे असा दृष्टांत झाला. त्यानुसार मग ते इथल्या दत्त मंदिरात नियमितपणे येऊ लागले होते. तत्कालीन सत्पुरुष दत्तावतारी व प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा महान दत्त भक्तांचे पदस्पर्शही या मंदिरास व परिसरास लागले आहेत.

येथील दत्त मंदिरात "श्रीं" ची त्रिकाल पूजा केली जात असून चातुर्मास वगळता इतर वेळी दर शनिवारी पालखी सोहळा असतो. गुढी पाडवा, दसरा, दिवाळी, कार्तिक पौर्णिमा, मार्गशीर्ष शुद्ध दशमी पासून ते मार्गशीर्ष वद्य द्वितीया पर्यंत दररोज महापूजा, पालखी, मंत्रजागर, मंत्रपुष्पांजली अशी पद्धत चालू आहे. दर पौर्णिमेला लघु रुद्र असतो. कार्तिक पौर्णिमेला शिखरासह सर्व मंदिर दिवे लावून सुशोभित केले जाते. श्रीदत्त जयंतीच्या वेळी आणि श्री. नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जन्म काळा वेळी असेच विविध कार्यक्रम होत असतात. विजया दशमीला श्रींची स्वारी शिलंगणासाठी येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल च्या मैदानावर जाते आणि तिथे आरती होऊन मिरवणुकीने परतते. अशा या कुरुंदवाडच्या प्राचीन श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करणे हि आज काळाचीच गरज बनली आहे. त्याच बरोबर नूतन वास्तूत सभागृह आणि भक्त निवासाची सोय करणे हि आवश्यक आहे. एक धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र या दृष्टीने या परिसराचा विकास व्हावा हाही एक उद्देश्य आहे. एक दत्त भक्त या नात्याने आपण या जीर्णोद्धार समितीस जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य करावे आणि या उपक्रमास हातभार लावावा अशी नम्र विनंती.
सर्व दत्त भक्तांना नम्र विनंती या पवित्र व प्रसादिक दत्तक्षेत्री भेट देऊन सेवा अर्पण करून दत्तकृपा प्राप्त करून घ्यावी . शुभम भवतु
लेखक :- श्री. शशिकांत बा. पाटील आणि श्री. डॉ. दिलीप पां. कुलकर्णी 

संपर्क:-
१ )श्री. अमित पुजारी
वर्षिलिदार पुजारी  - श्री श्रीपाद श्री वल्लभ दत्रात्रेय मंदिर ( विश्रांतीस्थान ),
कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि - कोल्हापूर  
मो. नं.   ९४२१२ ००४९१ 
२ )श्री महेश जोशी 
वर्षिलिदार पुजारी  - श्री श्रीपाद श्री वल्लभ दत्रात्रेय मंदिर ( विश्रांतीस्थान ),
कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि - कोल्हापूर  
 मो नो 91 94224 15695
!! दत्त दिगंबर, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर !!