अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे.या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. अक्षय्य तृतीयेमागील अध्यात्मशास्त्र या लेखातून जाणून घेऊयात !
या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.
या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो.
या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
अक्षय्य तृतीया दिवसाचे महत्त्व:
अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः
तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न
अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ का मानले जाते ? -
‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. एका कलहकालाचा अंत आणि दुसर्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ तासपर्यंत राहातात कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.
या दिवशी केलेल्या धार्मिक कृतींमुळे अधिक लाभ होतो - ‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धार्मिक कृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते.अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते.या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.
अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत - ‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवशी पुढील प्रमाणे विधी केल्यास त्याचा लाभ होतो. या दिवशी पवित्र जलात स्नान करावे ,श्रीविष्णूची पूजा करावी, जप, होम, दान आणि पितृतर्पण करावे . या दिवशी अपिंडक श्राद्धकरावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.
उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान - या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.
उदकुंभाचे महत्त्व : उदककुंभालाच ‘सर्वसमावेशक स्तरावरील निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.
. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे
. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.
देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.
उदकुंभ दानाचा मंत्र : ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः । अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं क
अक्षय त्रितीया हा दिवस चार प्रमुख मुहूर्तां एक आहे*.या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही.*
*हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी १२ वाजेनंतर पितरांचा अन्नाचा नैवेद्य करावा.*
*घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी.*
*या दिवशी केळीचे पूजन करताना खाली गहू ठेवावे. या दिवशी* *पितरांना उदककुंभ दान करतात*.
पत्रावलिवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मृत्तिका घट ठेवावा.*
*त्यात गंध , फुले , तीळ , सुपारी , विड्याची पाने , दक्षिणा , पाणी घालावे गटात सूत्राचे वेष्टन करावे. म्हणजेच यज्ञ कंकण होय हे घटात समसंख्यानुसार गुंडाळावे व गटात आंब्याचे पाने लावावे*
घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. या दिवशी केलेले दान , हवन , तर्पण *, *पूजा , जप इ. पुण्य कर्म अक्षय्य टिकते म्हणून 'अक्षय्यतृतीया ' ही शुभतिथी प्रमाणे पितृतिथी देखील आहे.*
*पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गंगास्नान , यज्ञहोम , यवदान , यवमभक्षण करावे.*
*पार्वती मातेचा उत्सव सांगता समारंभ निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी - कुंकू समारंभ करायचा असतो.
वैशाख मासातील प्रथम प्रासादिक व्रत व उत्सव आहे अक्षय तृतीया.कृत युगाचा प्रारंभ याच युग तिथीला झाला होता. त्यामुळे या तिथीच्या प्रारंभाच्या प्रवाहअनुरूप त्या युगामध्ये व्यक्तीला आयुष्य जास्त प्रमाणात होते. सेवा उपासना जास्त व्हायच्या. पुण्यदायक आचार विचार व्हायचे. आणि एकमेकांमध्ये एक वेगळीच बांधिलकी आपल्याला दिसायची. या कृत युगासारखीच फलश्रुती या युगातही आपल्याला मिळवता यावी या उद्देशाने एक दिवस का होईना आपल्याला या दिवशी मिळत असते, ती अक्षय तृतीयेच्या दिवशी. विशेष म्हणजे चैत्र गुरु गौरीची सुरुवात आपण चैत्र तृतीयेच्या दिवशी करत असतो आणि या व्रताची सांगता सौभाग्यदोन व्रत वैशाखात तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला होत असते. झोपाळ्यावर गौरीहराचे पूजन केल्यानंतर एका सुवासिनीला बोलावून हळदीकुंकू देऊन तिला कैरीचे पन्हे,आंब्याचा रस, त्यासोबत यथा शक्ती सौभाग्य अलंकार देऊन सन्मान करायचा असतो. म्हणून या तिथीला चुडा दानाचे जास्त महत्व आहे.
तसेच याच दिवशी बदरीकाश्रमाचे द्वार उघडले जातात. कारण भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी तीन महत्त्वाच्या अवतार याच दिवशी झाले होते.
1.पहिला अवतार - भगवान नर आणि नारायण जी बद्रिकाश्रमाची प्रमुख देवता आहे.
2.दुसरा अवतार- भगवान हयग्रीव , ज्यांनी हयग्रीव असूरांचा वध केला, आणि त्यांच्या संवादातून ललिता सहस्रनामा सारखे प्रासादिक स्तोत्र मानव कल्याणासाठी जगाबाहेर आले.
3.तिसरा अवतार- भगवान परशुराम यांनी 21 वेळा क्षत्रिय विहीन पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि समवेत पृथ्वीला खरं दान कसे करतात हे सुद्धा जगासमोर आणून दिले. कोकणासारखा प्रांत या परशुरामाच्या आशीर्वादाने प्रगतीस व प्रकट्याला आले. या तीन महत्त्वाच्या भगवान विष्णूच्या अवतारांचे प्रकट्याचे महत्त्वाचे पर्व अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले.
ज्यावेळेस पांडव वनवासात होते, त्यावेळेस भगवान कृष्णाची व त्यांची भेट एका मंदिरात झाली. त्यावेळेस त्यांनी विचारले की परमेश्वरा आम्ही तर खूप सारे दानधर्म केले. खूप पूजा उपासना व होम हवन केले मग त्यांचे पुण्य कुठे गेले की ज्यामुळे हा वनवास आमच्या पदरी आला. भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही जे काही पुण्य कर्म केले ते पुण्य कर्म तुमच्या सुख किंवा दुःख त्यांच्या फल प्राप्तीमध्येच उपयोगी आले. मग पांडवांनी विचारले की असे काही व्रत नाही का? किंवा सण नाही का? किंवा दिवस नाही का? की ज्या दिवशी आम्ही काही पुण्य केले तर त्यांचे फळ अक्षय राहील. *त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले अक्षय तृतीया हा दिवस असा आहे की त्या दिवशी तिळाच्या दाणा एवढे दान जनमानसाच्या कल्याणासाठी जरी केले तर त्या दानाचे श्रेय अक्षय टिकते म्हणजेच आपण त्याचा कितीही उपयोग केला तरी ते दान लयाला जात नाही* म्हणून या दिवशी *देव कर्म जास्त करायचे म्हणजेच देवांचे पूजन, अभिषेक, होमवन या दिवशी जास्त करावे.* तसेच वैशाख महिन्यात उष्णतेचा उद्रेक असतो. त्यावेळेस जर जीवसृष्टीला अन्न पाणी देऊ शकलो तर त्या जीवाच्या आशीर्वादाने विपुल अशा अखंड सौख्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणून याच दिवशी या तिथीला पाणपोया उभारल्या जातात . परंतु प्रत्येकाला हे शक्य नसते म्हणून घरच्या घरी उदक कुंभाचे पूजन व दान , शिद्या सह करावे. अशी आपली पूर्वाचार्यांची परंपरा होती.
समवेत पंखा दान करायचा विधी होता. जो अनवाणी असेल त्याला जोडदान केले जायचे. ज्याच्या डोक्यावर छत्र नसेल त्याला छत्री दान दिली जायची. असे अनेक उपाय आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले होते.
*अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जाणारा महत्त्वाचे विधी*
सकाळी लवकर उठल्यानंतर आई-वडिलांचे पूजन त्यांचे स्मरण पती-पत्नी एकमेकांबद्दल आदर भावना ठेवणे. तसेच आपल्या देवघरातील देवांना योग्य ते स्तोत्र मंत्र म्हणून अभिषेक करणे. आराध्य देवतांच्या नावाने हवन करणे. गाईच्या गवरीने अग्नी प्रज्वलित करून तिळाच्या तेलाने किंवा तुपाने ज्या काही आपल्या इष्टदेवता असतील त्यांच्या स्तोत्रमंत्रांनी हवन करणे. या दिवशी दान दिल्यास अक्षय पुण्य व अपेक्षित समृद्धी मिळते . पितर तर्पण व व त्यांचेबाबत ऋण निर्देश फार महत्वाचा आहे .
वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय तृतीया
अस्यां तिथौ क्षयमुपैति हृतं न दत्तं !
तेनाक्षयेति कथिता मुनिभि स्तृतीया !!
श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात
हे युधिष्ठिरा , या तिथीला केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात.
दानाचे महत्व :-
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये दान देण्याला विशेष असे महत्व आहे.
दान म्हणजे " डोनेशन' नाही.
दान कोणी दिले आणि काय दिले या गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला पण कळू नये.
दान दिल्याने समाधानाचे, कृतार्थतेचे पुण्य मिळते. दानासारखे पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही, फक्त दान हे सत्पात्री करावे.
अन्नदानात् परं दानं
विद्यादानमत:परम् !
अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं च विद्यया !!
अन्नदानापेक्षा विद्यादान हे श्रेष्ठ आहे.
मूर्ख माणूस अपात्र व्यक्तीला दान देतो, पात्र व्यक्तीला देत नाही.
आपल्या अज्ञानामुळे हा दानधर्म निष्फळ ठरतो.
आधुनिक काळात पण दानाची आवश्यक्ता आहे
* अक्षय्य तृतीया . मुळात *अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे* असा होतो. या तिथीला *साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त* मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.
*अक्षय्य तृतीया या दिवशी व्रत करणार्याने प्रात:काळी स्नान करुन
नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.
उन्हापासून रक्षण करणार्या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.
*अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?*
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात.
थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
*अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?*
या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.
१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll
२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
3) भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।
रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।
ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll
या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.
*विशेष सूचना - कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते.*
तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी लाभो ही सद्गुरूंचे चरणी प्रार्थना !.






