रथसप्तमी ..
रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणले जाते आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.
भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो. हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे.
सूर्य जयंती ..
प्रतिकात्मक रीतीने दर्शविले जाते की सूर्यदेव सूर्य सात घोड्यांनी काढलेला रथ (रथ) उत्तर गोलार्धाकडे उत्तर-पूर्व दिशेने वळवतो. हे सूर्याचा जन्म देखील चिन्हांकित करते आणि म्हणूनच सूर्य जयंती (सूर्य-देवाचा वाढदिवस) म्हणून देखील साजरा केला जातो.
रथ सप्तमी हा ऋतू बदलून वसंत ऋतू आणि कापणीचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे. बहुतेक भारतीय शेतकऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची शुभ सुरुवात आहे. हा सण सर्व हिंदू त्यांच्या घरात आणि सूर्याला समर्पित असलेल्या असंख्य मंदिरांमध्ये साजरा करतात.
माघ शु. ७ ला सुर्यनारायण सात घोड्यांच्या रथावर स्वार होतात व पुर्ण क्षमतेने पृथ्वीवर अवतरतात व थंडी संपुन खर्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते. याच दिवशी घरोघरी दुध सुर्याच्या दिशेने उतु घालवले जाते व संक्रांतीनंतर पुन्हा एकदा गुळपोळीचा नैवैद्यही देवांसह सुर्यदेवालाही दाखवला जातो. शारिरिक व मानसिकही ताकद वाढावी अशा हेतुने सुर्यनमस्कार घालण्याचा संकल्पही याच दिवशी केला जातो.
माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.
कृष्णावेणी उत्सव...
पण याच रथसप्तमी पासुनश्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे'श्री कृष्णावेणी उत्सव'ही सुरु होतो. ज्या, ज्या ठिकाणातुन कृष्णा नदी वाहते अशा सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पण आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा करतात. मात्र श्री क्षेत्र नृसिंहवाडीला याचे महत्व जास्त. कारण ईशान्येकडुन कृष्णेसह वेणी तर पश्चिमेकडुन पंचगंगा अशा सप्त नद्यांचा संगम, अष्टतिर्थे, साक्षात विष्णुंचा अवतार असलेल्या नृसिंहांचा आशिर्वाद लाभलेल्या, पवित्र अशा औदुंबर वृक्षाचे अस्तित्व असलेल्या व दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणार्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे १२ वर्षांचे वास्तव्य व पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या उत्सवास श्री टेंबे स्वामी महाराजांच्या आशिर्वादामुळे, प्रेरणेमुळे आलेले भव्य स्वरुप यामुळे वाडीतील कृष्णावेणी उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे.
नर्मदा जयंती ...रथसप्तमीला म्हणजेच नर्मदा जयंतीला सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून लोकांच्या स्नानाने जमाझालेले सर्व पाप विसर्जित करतात.
असा हा पुण्यपावन दिवस सर्वांनी आनंदाने व भक्तिभावाने साजरा करावा ।
।।पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला ।।
No comments:
Post a Comment