Thursday, October 23, 2025

दीपावली विशेष अंतीम पुष्प

 

दीपावली विशेष अंतीम पुष्प .
बहीण भावाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा महोत्सव ----भाऊबीज


भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याला भाऊबीजेच.निमित्त..काय आहे यम द्वितीयेचे औचित्य ...
                
सूर्याच्या अपत्यांपैकी दोन अपत्ये म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहीत होते की, तो मृत्यूची देवता आहे, आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको, म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा.*

यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळेच तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली.

*त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!

*यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेनेे त्याचे आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले. यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने... माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून?

तेव्हा यमुना म्हणाली, "मला तर कसली कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल, त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको."

यम तिला तथास्तु म्हणतो, म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात.

*या दिवशी बहीण भावाला ओवाळते. आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, आणि आलेल्या संकपासून त्याचे रक्षण व्हावे, हाच यामागील उदात्त उद्देश आहे.*
यमराज त्यांच्या बहिणी कडून झालेला आदरसत्कार पाहून ते खुप प्रसन्न झाले ।
तेव्हा यमराजाने हे वरदान दिलं की  या दिवशी  जो भाऊ  तिच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ति मिळेल  आणि मोक्ष मिळेल  तेव्हापासुन हा दिवस भाऊबीज नावाने  साजरा होतो.
त्या दिवशी सगळ्या बहिणी त्याच्या भावाच्या सुरक्षेची परमेश्वराला प्रार्थना करतात
  
भाऊबीज या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.

कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.

 या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते. 

आपण सर्वजण या दीपोत्सवाची सांगता एक दृढ निश्चयाने करूयात .नातेसंबंध दृढ करू .एकमेकात प्रेम वाढवुन आपले जीवन समृद्ध करू . यश कीर्ती व धन आपोआप  येईल.शुभम भवतु.

एकच दृढ संकल्प ...श्वासे श्वासे दत्तनाम.

Wednesday, October 22, 2025

दीपावली --- विशेष पुष्प ६ बलिप्रतिपदा --- दिवाळी पाडवा

 

दीपावली  - --विशेष पुष्प ६
बलिप्रतिपदा  ---दिवाळी पाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक...दिवाळी पाडवा




अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
    
पाडवा ... बलिप्रतिपदा काय आहे ?

कार्तिक शुध्द प्रतिपदेचा दिवस, हा "बलिप्रतिपदा" या नांवाने ओळखला जातो. विक्रम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून याचे महत्व विशेष मानले जाते. याला काही जण "व्यापारी पाडवा" असेही म्हणतात. ते आपले नववर्ष या दिवशी सुरू करतात. हा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी गुजराती लोकांत अन्नकोट करण्याची प्रथा आहे. अन्नाचे वेगवेगळ्या प्रकारचे ढीग रचून ते श्रीकृष्णाला अर्पण करतात. व्यापारी लोक याच दिवशी जमा- खर्चाच्या वह्यांची पूजा करतात. या सणाविषयी एक पुरातन कथा सांगितली जाते...!

बलिप्रतिपदेची कथा क्र-१

           फार पूर्वी एक राजा होऊन गेला. अतिशय पराक्रमी, दानशूर आणि प्रजाहितदक्ष, अशी त्याची ख्याती होती. त्याचे नांव बळीराजा. हा राजा भक्त प्रल्हादाचा नातू होय.  इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले. इंद्रपद हरण झाले तर आपण काय करणार ? अशी सर्वांना भिती वाटुलागली.

          श्री विष्णुंनी यावर एक युक्ती केली, त्याने बटुवामनाचा अवतार धारण केला. व ते बळीराजाच्या दरबारात गेले.  व त्या बटुवामनाने बळी राजाकडे फक्त तीन पाऊलांपुरतेच जमिनीचे दान  मागितले. उदार मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले. परंतु वामनाच्या दोन पावलांतच सारे जग व्यापून गेले. तिसरे पाऊल कुठे ठेवणार..? शेवटी राजा बळीने आपले मस्तक पुढे केले. वामनाने बलीच्या डोक्यावर पाय ठेवला. भगवान विष्णुने त्याला पाताळाचे राज्य दिले. देवादिकांची काळजी दूर झाली. इंद्रपद सुरक्षित राहिले. श्री विष्णू बळीच्या औदार्यावर संतुष्ट झाले. बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्याचे द्वारपाल झाले. तो दिवस "बलिप्रतिपदा". या दिवशी बली व त्याची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी बळीची पिठाची मूर्ती करून तिची पूजा करतात.

बलिप्रतिपदेची कथा क्र-२

          एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला. त्यावेळी श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले, गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते, तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा. त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला. त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पाडायला सुरूवात केली. दोन दिवस झाले, तरी पाऊस काही थांबेना. सारे घाबरले. सर्वजण श्रीकृष्णांना शरण गेले. सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली, व ती श्रीकृष्णांनी मान्य केली. इंद्राचा गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला, आणि त्याखाली सर्व गोकुळवासींना घेऊन सर्वांचे रक्षण केले. म्हणून लोक या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. या दिवसाचे स्मरण म्हणून दिवाळीच्या अन्नपदार्थांचा अन्नकुट (पर्वत) करून त्यावर श्रीकृष्णांची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. गोठ्यातील गायी- बैलांना सजवून त्यांची सुध्दा या दिवशी पूजा करून मिरवणुक काढतात. खेड्यातून या दिवशी गुराखी "दीन दीन दिवाळी । गायी म्हशी ओवाळी । गायी म्हशी कुणाच्या । लक्ष्मणाच्या ।।" अशी गाणी म्हणत म्हणत त्यांना ओवाळतात. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे एके दिवशी शंकर- पार्वती द्यूत खेळत असतांना पार्वतीने याच दिवशी भगवान शंकरांना द्यूतात हरविले होते, त्यामुळे या प्रतिपदेला द्यूत प्रतिपदाही म्हणतात. सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना माहितच आहे. या दिवशी महासती पातिव्रत्य धर्माचे स्मरण म्हणून पत्नीने पतीस अभ्यंग स्नान घालावे व औक्षण करावे. सकाळी पतीचे पूजन करून गोड पदार्थांचे जेवण जेऊ घालते.
 
अशा पाडवा का साजरा करावा याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आपणही मोठ्या उत्साहात पाडवा साजरा करतो.
अनेक ठिकाणी पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते.
पाच हजार वर्षापूर्वी लोक इंद्राची पूजा करत होते. इंद्र पाऊस पाडतो तोच सर्वेसर्वा आहे असा समज होता. पण त्याकाळी आणि केवळ इंद्राची पूजा करून चालणार नाही तर जो निसर्ग आपणास भरभरून देतो निसर्गाशी आपली नाळ आपण जोडून ठेवायला हवी असा विचार  कृष्ण मांडतो.

इंद्राची पूजा नाकारून पर्वताची पूजा करणारा कृष्ण हजारो वर्षांपूर्वी आपल्याला निसर्गाचे महत्त्व सांगतो. दुर्दैवाने आपल्याला ते आजही कळलेले नाही. डोक्यात मोरपीस खोवनारा, गाईगुरांमध्ये रमणारा, धान्याच्या राशीचा नैवद्य पर्वताला दाखवून समृद्ध कृषी मूल्यांची पेरणी करणारा कृष्ण आपण समजुन घेतला पाहीजे.  कृष्णाचा निसर्ग वादाचा विचार केवळ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यापुरता मर्यादित नाही. कृष्ण प्रत्यक्ष कृती करतो.. कर्माला महत्त्व देतो.. आणि निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा उत्सव करतो.
आज बालगोपाळांच्या काठया पर्वत उचलायला तयार आहेत फक्त करंगळी चा टेका देऊन नेतृत्व करणाऱ्या कृष्णाची गरज आहे...
हे नाथ नारायण वासुदेव...
 
अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.

असे खूप काही महत्त्व आहेत. व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.

हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.  
आपणासही हे विक्रम संवत्सर आनंददायी हो हीच दत्तमहाराज यांचे चरणी प्रार्थना ।
।।पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला ।।

Tuesday, October 21, 2025

दिवाळी लक्ष्मीपुजन - पुष्प ६

 

दिवाळी  लक्ष्मीपुजन - पुष्प ६

लक्ष्मी पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

पार्श्वभूमी ---
देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते. पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.

लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन. म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.

खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते.
पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.

लक्ष्मी-कुबेर पूजन:

दिवाळीच्या लक्ष्मी पूजनावेळी कुबेराचे पूजन केल्यास धनसंपत्ती वाढते असा समज आहे. कुबेर यंत्र, कुबेर कवच, आणि कुबेर मंत्र यांचा उपासना पद्धतीत समावेश असतो.
आता आपण दैनंदिन जीवनातील कुबेराचे स्थान*
वास्तुशास्त्रात:*उत्तर दिशा कुबेर दिशा मानली जाते.*घरातील तिजोरी, धन ठेवण्याचे स्थान, बँक फाइल्स याच दिशेला ठेवाव्यात.उत्तर दिशेची स्वच्छता, प्रकाश आणि उंची योग्य असेल तर घरात धनवृद्धी आणि स्थैर्य नांदते.

कुबेराची पूजा व उपासना कशी करावी

कुबेर मंत्र:
"ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये
धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा"

हा मंत्र धनवृद्धीसाठी जपला जातो.

लक्ष्मी-कुबेर यंत्र:

हे यंत्र घरात ठेवल्याने धनप्राप्ती, व्यापार वृद्धी व ऋणमुक्ती यास मदत होते.

विशेषतः दिवाळी व धनत्रयोदशी दिवशी यंत्राची प्रतिष्ठापना शुभ मानली जाते.

दिवाळी काळात  लक्ष्मीपूजन कसे लरावे  याबाबत आपण माहिती घेऊया ....

या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य) मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका. नुसते मानसिक स्मरण केले किंवा

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ 

हा मंत्रजप ११ वेळा केला तरी चालेल.

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे.पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा.जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या परिच्छेदात जे गुण लिहिले आहेत त्यांची धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा. प्रसादात लाह्या बत्तासे  व डाळिंबाचे दाणे ही ठेवण्याचा प्रघात आहे   देवीला पिवळी  फुले अर्पण करावीत या काळात पिवळी शेवंती उपलब्ध  असते ती अर्पण करावी .ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर "#श्रीसुक्त" किंवा "महालक्ष्मी_अष्टक" यांचेही पाठ करावेत.

पूजेनंतर लक्ष्मीची प्रार्थना करावी पुजलेले पैसे व नाणी संग्रहित ठेवावीत खर्च करू नये. मोठी महत्वपुर्ण वस्तू घेताना ते पैसे वापरावेत म्हणजे पैशाची चणचण भासत नाही.

आपले सर्व आप्तेष्ट  कुटुंबीय यांचे घरी लक्ष्मी  उपस्थिती व्हावी  व समृद्धी प्राप्त व्हावी हीच दत्तमहाराज यांचे चरणी प्रार्थना.
 
।। शुभम  भवतु ।।

Monday, October 20, 2025

नरकचतुर्दशी.... दिपावली पुष्प ५

नरकचतुर्दशी.... दिपावली  पुष्प ५

दिनांक २० ऑक्टोबर रोजी सोमवार आश्विन कृष्ण पक्ष नरक चतुर्दशी  आहे

श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे

 सण साजरा करण्याची पद्धत

1. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे अभ्यंगस्नान मह्त्व 
          
३. नरकचतुर्दशीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर स्नान का करतात ?

  ब्राह्ममुहूर्तात केले गेलेले स्नान हे 'देवपरंपरा' या श्रेणीत येते व देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात

अ. शुद्धता, पवित्रता व निर्मळता या प्रकारचे संस्कार होणे

आ. ब्राह्ममुहूर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ बनणे

इ. ईश्‍वरी चैतन्य ग्रहण होण्यासाठी स्वत:ला दक्ष करणे व ईश्‍वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्‍ती व या तीन शक्‍तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्‍तीही ग्रहण करता येणे

ई. स्नानोत्तर लावण्यात येणारा टिळा दुष्ट शक्‍तींवर सुष्ट शक्‍तींनी मात केल्याचे निदर्शक आहे !

2. यमतर्पण – अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

3. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

4. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.

५. नरक चतुर्दशीच्या दिवशी करायच्या विविध कृतींमागील शास्त्र

१. ब्राह्मणभोजन

‘नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.

२. वस्त्रदान

वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.

३. यमदीपदान

यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.
नरक चतुर्दशी हाच  दिवाळीतील पहिला मोठा  व महत्वपुर्ण दिवस आहे . आपण ही  हा दिवस भक्तिभावाने व आनंदाने साजरा करून  बली प्रतिपदेच्या स्वागतास सज्ज व्हा . कल्याण मस्तु ।

नरकचतुर्दशी.... दिपावली  पुष्प ५


दिनांक २० ऑक्टोबर रोजी सोमवार आश्विन कृष्ण पक्ष नरक चतुर्दशी  आहे

श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे

 सण साजरा करण्याची पद्धत

1. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे अभ्यंगस्नान मह्त्व 
          
३. नरकचतुर्दशीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर स्नान का करतात ?

  ब्राह्ममुहूर्तात केले गेलेले स्नान हे 'देवपरंपरा' या श्रेणीत येते व देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात

अ. शुद्धता, पवित्रता व निर्मळता या प्रकारचे संस्कार होणे

आ. ब्राह्ममुहूर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ बनणे

इ. ईश्‍वरी चैतन्य ग्रहण होण्यासाठी स्वत:ला दक्ष करणे व ईश्‍वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्‍ती व या तीन शक्‍तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्‍तीही ग्रहण करता येणे

ई. स्नानोत्तर लावण्यात येणारा टिळा दुष्ट शक्‍तींवर सुष्ट शक्‍तींनी मात केल्याचे निदर्शक आहे !

2. यमतर्पण – अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.


3. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

4. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.

५. नरक चतुर्दशीच्या दिवशी करायच्या विविध कृतींमागील शास्त्र

१. ब्राह्मणभोजन

‘नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.

२. वस्त्रदान

वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.

३. यमदीपदान

यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.

नरक चतुर्दशी हाच  दिवाळीतील पहिला मोठा  व महत्वपुर्ण दिवस आहे . आपण ही  हा दिवस भक्तिभावाने व आनंदाने साजरा करून  बली प्रतिपदेच्या स्वागतास सज्ज व्हा . कल्याण मस्तु ।

Sunday, October 19, 2025

दिवाळी / दीपावली ( आनंदोत्सव ,दीपोत्सव )

 

दीपावली पुष्प  

 दिवाळी / दीपावली  
( आनंदोत्सव  ,दीपोत्सव )

💐सर्वत्र साजरा होणारा  महोत्सव  💐

दिवाळीकिंवादीपावलीहा शब्ददीप’ (दिवा) आणिआवली’ (ओळ) या दोन शब्दांपासून तयार झाला आहेम्हणजेच दिव्यांची ओळ.

ही उत्सवमाला अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, आणि अधर्मावर धर्माचा विजय याचं प्रतीक आहे.

हिंदू धर्मात ही पंचदिनीय उत्सव सर्वात मोठा आणि पवित्र मानला जातो .

🪔 दिवाळीचा धार्मिक आणि पौराणिक अर्थ

💐. भगवान श्रीरामांचा अयोध्येत पुनरागमन:

 दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते.

अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.

 जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला  त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. विशेष। म्हणजे दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.

 दिवाळी हा सण दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. आता प्रथम आपण

 या  दिवसाचं महत्त्व जाणून घेऊ

💐 पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.

 

💐 दिवस  भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला:

या दिवशी श्रीकृष्णाने दैत्य नरकासुराचा वध करून पृथ्वीवरील लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यामुळे या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते.


एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.

तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.

  💐 दिवस   लक्ष्मी पूजन:

या दिवशी लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली म्हणून लक्ष्मीपूजन विशेष केले जाते. ती संपत्ती, सौख्य आणि समृद्धीची देवी मानली जाते.

देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.

 दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते

पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे पुत्र होते.

 लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.

म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.

खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते.

पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.

 💐  दिवस  भगवान विष्णूंचे वामनावतार आणि बलिराजाचा दिवस (बलीप्रतिपदा):

दिवाळीनंतरचा दिवस राजा बली याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. विष्णूने वामन रूप घेत बलीला पाताळात पाठवले, पण त्याला प्रत्येक वर्षी पृथ्वीवर येण्याची परवानगी दिलीत्याचेच स्मरण बलीप्रतिपदा म्हणून करतात.

 अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.

असे खूप काही महत्त्व आहेत

व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.

 हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.

कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.

💐 दिवाळीचा पाचवा दिवस आहे गोवर्धन पुजा.

 रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आप आपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.

परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्री राम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.

आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये.

पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.

याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.

तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते.

💐सहावा दिवस आहे भाऊबीज 

यादिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले.

त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.

यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात.

 

💐पारंपरिक दिवाळी साजरी करण्याची  पद्धत

घर स्वच्छ करणे आणि रंगोळी काढणे

दिवे लावणे आणि मंदिरे सजवणे

लक्ष्मी-गणपती पूजन करणे

फटाके फोडणे (पर्यावरणपूरक पद्धतीने)

मिठाई, फराळ, आणि नववर्षाच्या शुभेच्छा देणे

 पुण्य संचय म्हणून वृद्ध, गरिबांना दान देणे 

 खरेतर दीपावलीचा धार्मिक संदेश असा आहे " आपल्या अंतःकरणातला अंधार दूर करून ज्ञान, सत्य आणि प्रेमाचे दिवे पेटवण्याचा उत्सव आहे.”

 दिवाळी सण मोठा ..नाही आनंदा तोटा .

 तर  हे दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला या गोष्टी  माहीत असायला हवी. अनेक शुभ कार्य  दिवाळीच्या मुहूर्तवर सुरवात करतातअबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्व समाज एकसंघ होऊन या सणात सहभागी होतात . आपणही  सर्व भक्तांनी या आनंदोत्सवात सहभागी व्हाएक विनंती  आनंदातही काही वेळ काढून दत्त महाराजांची  उपासना करा शुभम भवतु

 

 💐 दिवाळी ...धार्मिक अधिष्ठान असलेला उत्सव ...भारतात सर्व धर्म प्रांतात   साजरा करतात.. 

 जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.*

 *आंध्रातील तेलुगू समाज.*

*ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंवा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात लक्ष्मीपूजन करतात.*

 *बंगाली समाज.*

*दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.*

 *बौद्ध समाज.*

*गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.*

 *तमिळनाडूतीत मद्रासी लोक.*

*प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.*

 *महाराष्ट्रातील मराठी समाज.*

*लक्ष्मी पूजन सोडले, तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे अशी असते   दिवाळी

 *कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.*

 *दिवाळी अंक.*

*महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात वाचतात.*

 *दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात.

*केरळमधील मल्याळी समाज.* *दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.*

*पंजाबातील शीख समाज : शीखांच्या व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.*

 *सिंधी समाज : पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.

💐आपले सर्व आप्त स्वकीय कुटुंबीय   यांना दिवाळी नूतन वर्ष सुख समृद्धी , समाधान आयु आरोग्य प्राप्त व्हावे हीच दत्तमहाराज यांचे चरणी प्रार्थना . कल्याण मस्तु ।।