Friday, February 28, 2025

पुष्प १ - साधना / ध्यानधारणा ...अध्यात्मिक प्रगतीचा महामार्ग

 


। श्री गुरू शरणं ।।  पुष्प १ 

साधना  / ध्यानधारणा ...अध्यात्मिक प्रगतीचा महामार्ग

  (शक्यतो सर्वांना समजेल अशा भाषेत केलेले  विवेचन ....)

 "साधना" या शब्दाचा शब्दशः अर्थ 'एखादे ध्येय साध्य करण्यासाठी कृती' असा होतो. पण प्रत्यक्षात ती एक आध्यात्मिक साधना आहे व सातत्याने  भक्ती व श्रद्धेने करीत राहिल्यास भगवत चरणापर्यंत मार्गस्थ होता येते किंबहूना तीच साधनेची अंतिम फलश्रुती आहे .

खरेतर उपासना, योग, ध्यान, जप, उपवास आणि तपस्या या धार्मिक आणि आध्यात्मिक अनुशासनाच्या सरावाला साधना म्हणतात. 

 "साधना" म्हणजे तप. योगी योगविद्येची साधना करतो. ज्ञानवंतांचा मार्ग ज्ञानसाधनेचा. संगीतोपासक स्वरसाधना करतात, तर कर्मयोगी कर्ममार्गाचे आचरण करतात. आयुष्यभर एकेका क्षेत्राला वाहून घेतलेल्या व्यक्ती साधनाच करीत असतात.

💐इच्छित फल प्राप्ती साठी रोज साधना करावी लागते सातत्य हवे . शक्यतो वेळ ठिकाण व आसन ही तेच ठेवावे

 साधनेस सुरवात करण्यापूर्वी समस्त प्राचीन योग्यांना, स्वत:च्या गुरु देवांना आणि भगवंताना प्रणाम करून मग साधनेस प्रारंभ करावा. 

💐 जिथे अग्नी वा पाणी यापासून काही धोका आहे, अश्या जागी, वाळक्या पानांनी झाकलेल्या जमिनीवर, वारूळानी भरलेल्या जागी, जंगली जनावरे असलेल्या जागी, चौरस्त्यावर, जिथे फार आवाज होत असेल अश्या स्थानी, भयावह ठिकाणी, जिथे फार दुर्जन वसतात अश्या स्थळी योग साधना करू नये. हा दंडक साधकाला विशेषे करून लागू आहे.

💐साधना/ ध्यानाच्या बाबत काही गोष्टी साधकाने लक्षात ठेवाव्यात उदाहरणा दाखल सांगतात, सरळ बसावे व आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावावी. नासाग्री दृष्टी ठेवल्याने मन स्थिर एकाग्र होण्यास मदत होते असे आपणास आढळून येईल. 

💐 डोळ्याच्या दोन्ही नाड्यांवर ताबा मिळवू शकल्यास, प्रतीक्रियांच्या केंद्रावरदेखील बराच ताबा मिळू शकतो, आणि तद्दद्वारा ईच्छा शक्तीवर देखील आपला बराच ताबा चालू शकतो साधनेत असताना अशी कल्पना करावी कि तुमच्या मस्तकाच्या वरती एक पद्म आहे, धर्म त्याचा मध्य भाग आहे, ज्ञान त्याचे देठ आहे, योग्याच्या अष्टसिद्धी त्या पद्माच्या आठ पाकळ्या आहेत, आणि वैरागी त्याच्या आतील कोश आहे, आत मधील कोशाला परम वैरागी म्हणजे अष्टसिद्धीविषयी त्याग भावना मानण्यात आले आहे. त्या पद्माम्ध्ये तो हिरण्यमय, सर्व शक्तिमान पुरुष विराजमान आहे असे स्मरण करावे. 

“ओम” हे त्याचे नाव आहे. तो अनीवर्तनिय आहें, दैदिप्यमान प्रकाशाने वेढलेला आहें, त्यावर आपले मन  केंद्रित करा, एक दुसरे प्रकार म्हणजे असे चिंतन करावे कि, आपल्या हृदया मघ्ये एक पोकळी आहें. त्या पोकळी मध्ये एक ज्योत तेवत आहें, ज्योत स्वतचा आत्मा आहें असे चिंतन करावे ज्योतीमागे दैदीप्यमान प्रकाश विद्यमान असून तो म्हणजे परमात्मा स्वरूप ईश्वर होय.

💐 साधना ज्या साध्यासाठी करायची असते. त्या साध्यासाठी प्रयत्नशील राहाणं, हा साधकाचा धर्म आहे. हे आपल्याला आपल्या गुरूकडून शिकायला मिळते. यासाठी साधकास सातत्याने प्रयत्नशील राहावे लागते .यश हे पूर्णतया सातत्याने केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे .

💐 तसे पहिलेतर सद्‌गुरुंनी गुरुमंत्र दिल्यानंतर साधना ही आपणासच करायची असते. पण प्रत्यक्षात ही साधना सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत असतात. गुरूमंत्राच्या उपदेशानंतर अनेक अनुभूती सद्‌गुरू देतात पण त्यासाठी साधकास  निरंतर प्रयत्नशील राहावे लागते .त्यामुळे साधनेत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टींत सद्‌गुरुंचा सहवास असल्याची अनुभूती येते. हे आपण करत नसून सद्‌गुरूच आपल्याकडून करवून घेत आहेत अशी अनुभूती येते. 

 पण मोहमायेमुळे आपण अंध झालेले असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी "अवधानाचा वाफसा" असणे आवश्‍यक आहे. तरच गुरूमंत्राची व त्यानंतर होत असलेल्या उपदेशाची पेरणी वाया जाणार नाही. 

 हे बीज वाया जाणार नाही ना? 

 अध्यात्मात प्रगती होईल ना? अशा अनेक शंका येत राहतात.  काळजी वाटते पण अशी काळजी करणे व्यर्थ आहे. कारण कर्तेकरवते हे सद्‌गुरूच आहेत. हे अनुभवाने आपल्या लक्षात येते. खरेतर आपल्या डोळ्यावरची ही झापड सद्‌गुरू दूर करतात आणि आपणा दृष्टी देतात.

खरेतर साधनेतही  अडथळे येत राहतात पण साधकाचा सद्गुरू वर ठाम विश्वास हवा  कि अनुग्रह झाला याचा अर्थ श्रीसद्गुरू माझे मालक आहेत. ते माझे मालक आहेत याचा अर्थ असा की, "मी त्यांचा आहे. माझ्यासकट माझे सगळे आता त्यांचे आहे." दैनंदिन जीवनात हा अर्थ कसा प्रकट व्हायला हवा ते पहा-*

*प्रपंचात जो जो प्रसंग येईल तो तो त्यांच्याच इच्छेने येणार. मी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यांच्याच इच्छेने मिळणार. माझे कल्याण व्हावे हीच त्यांची इच्छा असणार. म्हणून, प्रपंचातील प्रत्येक प्रसंगात --

१) माझ्या इच्छेपेक्षा "त्यांच्या" इच्छेला मनापासून मान द्यायचा.

२) त्यांच्या इच्छेने जे घडून येईल त्यात अत्यंत आनंदाने- आपलेपणाने, श्रद्धेने आणि धीराने शांत राहायचे.

*या दोन लक्षणांनी त्यांच्या मालकीची खरी जाणीव जीवनात उतरते.

  (पुढील भाग उद्या पाहू  पुष्प २ मध्ये )

  ।। शुभम भवतु ।।

Tuesday, February 25, 2025

महाशिवरात्री ... शिवआराधनेची पर्वणी .....अत्यंत पवित्र दिवस.

 

।।ओम नमः शिवाय ।।
।।ओम नमः शिवाय ।।

महाशिवरात्री ... शिवआराधनेची पर्वणी   .....अत्यंत पवित्र दिवस .            







१) महाशिवरात्र महत्त्व काय ?

  हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ महिन्यात  चतुर्दशीला महाशिवरात्री असते. यंदा २०२५ मध्ये २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री येत आहे. 

अशी मान्यता आहे की  महाशिवरात्रीला भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जी व्यक्ती भगवान शिव- पार्वतीचे व्रत व आराधना करते त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 

महाशिवरात्री वर्षातून एकदा येणारा महत्वाचा धार्मिक महोत्सव आहे.  महाशिवरात्री बाबत, प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात.  अशीही मान्यता आहे कि शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.            २ )महाशिवरात्रीचे व्रत का करावे : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ.

 महाशिवरात्री साजरी करण्यामागे आहेत ही विविध कारणे

 महाशिवरात्री कथा  (१)...

 समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होते ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून, कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतू मंथनातून हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे ही म्हटले जाते. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात. जागरण करतात .

महाशिवरात्र कथा  ( २ )..

या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते     एकदा ब्रह्मा आणि विष्णूदोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतत निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेले. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर हि गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरवात आणि शेवट नसणाऱ्या पिंडीच्या रुपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचा प्रयत्न निष्फल ठरला त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघे ही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या पिंडी समोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ऊॅं असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्पटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रुपात प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.


महाशिवरात्री पूजा ..

शंकराची पूजा महाशिवरात्रीचे व्रत करताना उपवास  दोन्ही वेळी२६ फेब्रुवारीला  करावा . मध्यरात्री शंकराची पूजा करावी  शंकराला पांढरे  गंध पांढरी फुले ,बिल्वपत्र धोत्र्याचे फुल खूप आवडतात .

महाशिवरात्री या दिवशी दोन्ही वेळ उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य चतुर्दशी ला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रतात मोडते .

महाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. 

 

महाशिवरात्रीचे व्रत का करावे : 

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही.  त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

महाशिवरात्री व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन वृतसमाप्ती करावी.

 हिंदू धर्मातील बहुतेक लोक हे भगवान शिव शंकराचे भक्त आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात ” महाशिवरात्रीला “  खूप महत्त्वाचे स्थान आहे.

खरे पाहता प्रत्येक महिन्याचा चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात बारा शिवरात्री येतात. परंतु या बारा शिवरात्री पैकी फेब्रुवारी -मार्च महिन्यामध्ये येणारे शिवरात्र ही ” महाशिवरात्र “ म्हणून साजरी केली जाते.

महाशिवरात्रीला अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धा ची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक होण्याची शक्यता असते.

महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्यामुळे महाशिवरात्रि रात्री सर्वजण जागरण करून महाशिवरात्रीच्या सण साजरा करतात.नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर उत्सव करून सगळेजण जागे राहतात, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर न झोपता जागे राहतात.

 खरे पाहता महाशिवरात्रि म्हणजे काय 

” महाशिवरात्र “ म्हणजेच, ” शिवाची महान अशी रात्र. ” महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने आणि भक्तीभावाने हा साजरा केला जातो.

 या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिव नामावली उच्चारली जाते. तसेच महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल शंकराला वाहिले जाते. त्यादिवशी उपोषण व जागरण करावे . ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान  १०८ जप करावा  व शिवाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत ..  

💐आपणास सर्वांना हे ज्ञातच आहे स्वामी समर्थ म्हणत असत ...

"जय शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो । हे गिरीजापती  नमामी  शंकर शिवशंकर शंभो ।।"

💐 योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज  यांचे कार्यकाळातील  महाशिवरात्री चा एक प्रसंग असा  ....संदर्भ : भगवंत अघोर कृत "शंकर गीता" ग्रंथ

एकदा महाशिवरात्रीची पर्वणी साधून मेहंदळे वाडयात भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता, भरपूर गर्दी भजन ऐकण्यासाठी जमली होती . सद्गुरू श्री शंकर महाराज सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

भजन चांगलेच रंगात आले आणि सद्गुरू श्री शंकर महाराज हसून सर्वांना म्हणाले की,

* आज महाशिवरात्री असत । * मंदिर एकदाच असे उघडत ।।.

पण महाराजांच्या बोलण्याचा सरळ अर्थ कोणालाही कळला नाही . नंतर मंडळी महाराजांकडे पाहू लागली तर काय आश्चर्य ? 

महाराजांच्या शरीराचा मूळ रंग बदलून महाराज निलवर्णी म्हणजेच निळा रंग धारण केलेल्या प्रत्यक्ष भगवान महादेवा सारखेच दिसू लागले.

 आता कुठे जमलेल्या मंडळींना महाराज मंदिर एकदाच उघडते असे का म्हणाले ह्याचा अर्थ कळला. मग जमलेल्या मंडळींनी सद्गुरू श्री शंकर महाराजांना बेलफुल वाहून त्यांची यथासांग पूजा केली आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून महाशिवरात्रीच्या दिनी साक्षात भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले .

 शिवाला आवडणारे रुद्रासूक्त ...

 रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. 

श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात

याशिवाय शिव उपासने बाबत काही महत्वपूर्ण माहिती ...   महाशिवरात्री चे निमित्ताने आपण पाहू ...                      

१) रोज शिवलिंग अभिषेक:-केला तर अनेक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते, सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते. रोजी रोटी चालू राहते, गुप्त शत्रूंना आळा बसतो,संकटातून रक्षण होते.

२) महादेवाच्या पिंडीचे रहस्य -: 

-:●:- घरात देवघरात महादेवांची पींड ठेवावी 

|| मुर्ती / फोटो नसावा

-:●:- पींड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो 

|| पितळेची असावी.

-:●:- देवघरातील पींड ३ इंचा पेक्षा मोठी असु नये 

|| ती ३ इंच पेक्षा छोटी असावी. 

-:●:- भगवान महादेव हे देवाधिदेव असुन हे न्यायप्रिय दैवत 

|| आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, आणि जसे 

|| देव, दानव, यक्ष, किन्नर, भूतं, प्रेतं, पिशाच्चं, आणि 

|| इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. आणि 

|| जिथे महादेवांची मुर्ती / फोटो असतो तिथे त्यांचे सर्व 

|| भक्त उपस्थित होतात. 


-:●:- जोतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा  महादेवांच्या पींडीला 

|| संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा 

|| करुन नमस्कार करतात  कारण उत्तर दिशेला वरील सर्व 

|| भक्तांचा अदृश्य रुपाने उपस्थित असतात. तथा उत्तर 

|| दिशेने महादेवांच्या पींडीवर जलाअभिषेक घातलेले पाणी 

|| तीर्थ रुपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते 


-:●:- महादेवांचा फोटो अथवा मुर्ती फक्त स्मशानात असते, 

|| देवघरात महादेवांचा फोटो अथवा मुर्ती नसावी. मानवाला 

|| पींड पूजन सांगीतले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात 

|| महादेवांचे मुख्य शक्ति पीठांवर महादेवांची पींड लिंग 

|| रुपाने स्थापन केलेले समजते.


-:●:- १२ ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पींड रुपाने आहेत, 

|| यातुन संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते .


-:●:- महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह  रुद्रसुक्त पठण करीत 

|| जलाभिषेक करावा. 


-:●:- महादेवांना जल अति प्रिय आहे, एखाद्याने महादेवांस 

|| जल अर्पण केल्यास ते त्यावर खुप प्रसन्न होतात. 


-:●:- महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन 

|| सामुदायिक  जलरुद्राभिषेक केल्यास विपूल पर्जन्यमान 

|| राहते. 


-:●:- गुरुचरित्रात असे म्हटले आहे की, नित्यच्या 

|| रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली 

|| मृत्यू टळतो.


-:●:- श्रीमद्भागवतात म्हटले आहे की,  महादेवांची नित्य 

|| नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी 

|| वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते 

|| आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते. 

 💐महादेवाचे उपासनेत या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही  अर्पण करू नका.  . भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज  असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

३) खाली दिलेल्या या गोष्टी :------ भगवान शंकरांना कधीही अर्पण करु नका 

१ } शंख 🔸:------------ 

|| शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या 

|| असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त 

|| असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. शिवपिंडीवर  केव्हाही शंख जल घालू नये .


२ } हळद कुंकू 🔸:------------ 

|| भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी 

|| संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. 

|| हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद 

|| किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. 

|| या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.


३ } तुळशी पत्र 🔸:------------ 

|| असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका 

|| कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली 

|| होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. 

|| त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न 

|| वापरण्याचा पण वृंदाने केला होता.


४ } नारळ पाणी 🔸:------------ 

 नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून 

|| शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून 

|| वापर केला जातो. पण, भगवान शंकरांना अर्पण केलेले  पाणी निर्माल्य होते.


५ } उकळलेले दूध 🔸:------------ 

|| उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध 

|| कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा 

|| गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे 

|| पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा 

|| वापर करणेही टाळावे.


६ } केवड्याचे फूल 🔸:------------ 

|| भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. 

|| शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे 

|| बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता 


७ } कुंकू किेंवा शेंदूर 🔸:------------ 

|| कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा 

|| करण्यात वर्ज्य केला आहे. 


४) शिवाने_धारण_केलेल्या_चिन्हांचा_मतितार्थ  काय आहे ते जरा समजून घ्या 

१. चंद्र: ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते  मनोभावनांद्वारे व्यक्त होत असते. चंद्रकला हे त्याचेच द्योतक आहे.

२. नाग हा सजगतेचे प्रतिक आहे. शिवाच्या गळ्यातील नाग चेतनेची सजगता दर्शवतो.

३. त्रिशूल: शिव तत्व जागृती, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था यापेक्षा श्रेष्ठ परंतु या तिन्ही अवस्थांना धारण केलेले       आहे, याचे त्रिशूल हे प्रतिक आहे.

४. त्रिनेत्र: सजगता, ज्ञान आणि शहाणपणा हे त्रिनेत्राने दर्शवतात.

५. डमरू. ब्रम्हांडामधील प्रत्येक गोष्ट निर्माण होते आहे, लय पावत आहे पुन्हा निर्माण होत आहे. ही निर्मितीची      प्रक्रिया आहे. डमरू याचेच प्रतिक आहे.

६. नंदी: नंदी म्हणजे धर्म, सत्य, योग्य निवड. शिवाने नंदीवर सवारी केली आहे. जेंव्हा तुम्ही सत्यासोबत असता      तेंव्हा ईश्वरी तत्व तुमच्या सोबत अस


#शिवाने_डोक्यावर धारण केलेल्या #चंद्रकोरीचे महत्व:

चंद्र मनाचे द्योतक आहे आणि मनाचे अस्तित्व संपणे म्हणजे शिव तत्व. मनाचे अस्तित्व नसताना “ती” अवस्था कशी वर्णन करू शकतो किंवा अनुभवू शकतो? काहीही समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी मनाची गरज असते. ”निर्मनावस्था, अनंत चेतना” अनुभवण्यासाठी देखील अल्पश्या प्रमाणात मनाची गरज आहे. अव्यक्ताच्या अनुभूतीसाठी लागणाऱ्या त्या अल्प मनाचे प्रतिक शिवाच्या माथ्यावरील छोटीशी चंद्रकोर आहे.भगवान शिवाच्या गळ्यातील नागाचे महत्व:

निव्वळ चेतनेची पोकळी असणे, कोणतीही कृती नसून केवळ सजगता असणारी अवस्था म्हणजेच शिव, म्हणजेच समाधीवस्था. या अवस्थेची ओळख व्हावी म्हणून शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे. नाग हा या सजगतेचे प्रतिक आहे.

ध्यानावास्थेमध्ये व्यक्तीचे डोळे बंद असतात मात्र ती व्यक्ती झोपलेली नसते तर दक्ष, सजग असते. चेतनेची ही स्थिती दर्शवण्यासाठी शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे.


५)भगवान शिवाच्या #त्रिशुळाचे महत्व.

त्रिशूल चेतनेच्या तीन स्थिती: जागृत, स्वप्न आणि निद्रावस्थाचे प्रतिक आहे. तसेच ते सत्व, रजस आणि तमस गुणांचे प्रतिक आहे. शिवाने त्रिशूल धारण केले आहे म्हणजे तो या तिन्ही जागृती, स्वप्न आणि निद्रावस्थेपेक्षा श्रेष्ठ असून या तिन्ही अवस्था त्याने धारण केल्या आहेत.


ईश्वरी तत्व त्रिगुणांपेक्षा श्रेष्ठ असून हे त्रिगुण त्याने धारण केले आहेत.

शूल म्हणजे समस्या, दुःख. त्रिशूल म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या, दुःखांचे निराकरण.


💥जीवनात तीन यातना आहेत.

१. आधिभौतिक (शारीरिक),

२. अध्यात्मिक,आणि

३. आदिदैविक.


या सर्वांतून मुक्त करणारे म्हणजे त्रिशूल जे शिवाने आपल्या हातात धारण केले आहे.

भगवान शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहणाऱ्या गंगा नदीचे महत्व

गंगा म्हणजे ज्ञान जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते. मस्तक हे ज्ञानाचे प्रतिक आहे.

हृदय प्रेमाचे प्रतिक आहे.

गंगा प्रेमाचे प्रतिक असती तर ती शिवाच्या हृदयातून निघाली असती. परंतु ती तर मस्तकावरून, जटेतून निघाली आहे, म्हणजेच ती निव्वळ ज्ञानाचे प्रतिक आहे.

ज्ञान हे मुक्त, स्वतंत्र आणि शुद्धी करणारे असते. ही ज्ञानाची वैशिष्टे आहेत. ज्ञान हे प्रवाही असते. म्हणून गंगेने, ज्ञानाने शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहत रहाणे क्रमप्राप्त आहे.


भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व:

तिसरा डोळा दक्षता आणि सजगतेची निशाणी आहे.

💐शिवाच्या #नील वर्णाचे #महत्व :

निळा रंग आकाशाचे द्योतक आहे. आकाश सर्वव्याप्त, अनंत असून असीम असते. निराकार आहे. शिव तत्वाला देखील आकार नाही, ती कोणी व्यक्ती नाही. त्या अथांग, अनंत, अनाकलनीय ईश्वरी तत्वाला लोकांना आकलनीय करण्यासाठी प्राचीन ऋषींनी हा आकार दिला आहे.

ज्ञान देखील निराकार असून ते विश्वातील अणू रेणूमध्ये प्रसवत असते.

#शिव तत्व म्हणजे समस्त विश्व भरून उरले आहे.


💥शिवलिंगाचे_महत्व:

लिंग म्हणजे ओळख. सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचे प्रतिक. जे दिसू शकत नाही मात्र ज्याच्यामुळे आपण इतरांना ओळखू शकतो ते म्हणजे लिंग.

एक बाळ जन्माला येते, ते मुलगा आहे कि मुलगी, हे कसे कळते? शरीराच्या निव्वळ एका अवयवामुळे ते शरीर मुलाचे आहे कि मुलीचे ते कळते. त्या जननेन्द्रीयाला देखील लिंगम म्हणतात.

तद्वत, आपण निर्मितीच्या ईश्वराला कसे ओळखणार? तो तर आकारहीन, निराकार आहे. मग त्याला ओळखण्यासाठी काहीतरी प्रतिक हवे नां? असे एकच प्रतिक ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोन्ही ओळखले जाईल, समस्त ब्रम्हांडाला  सर्वव्यापी परंतु निराकार ईश्वराला जाणण्याचे प्रतिक शिवलिंग होय.

शिवलिंग प्राचीन नव्हे अतिप्राचीन आहे. शिवलिंगाद्वारे आपण साकाराकडून निराकाराकडे जातो. विश्व आणि विश्वनिर्माता हे एकच आहेत यांचे ते द्योतक आहे. शिव आणि शक्ती ही दोन निर्मितीची तत्वे आहेत. सुप्त, अव्यक्त आणि चैतन्यदायी व्यक्त यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे शिवलिंग. शिवलिंग म्हणजे निव्वळ शिव तत्व नाहीतर सर्वोच्च चेतनाशक्तीचे परिपूर्णत्व.


भगवान शिवाचे वाहन,नंदीचे महत्व:

पूर्वीपासून सर्वत्र बैल, नंदी सदाचरणी, धर्माचे प्रतिक म्हणून सुपरिचित आहे. भगवान शिवाचे वाहन नंदी आहे याचा मतितार्थ हाच आहे की, जेंव्हा तुम्ही सदाचरणी, सत्याचरणी असता ती अनंत आणि भोळी भाबडी चेतना आपल्या सोबत असते.


शिव तांडवाचे महत्व:

समस्त ब्रम्हांड हे विशाल चेतनेचे, शिव तत्वाचे नृत्य आहे. त्या विशाल चेतनेच्या नृत्यातून ती लाखो करोडो सजीवांमध्ये प्रकट झाली. हि अनंत निर्मिती म्हणजे शिवाचे तांडवच आहे, हे विश्व शिवाचे स्थानच आहे.


शिवाचे निवास स्थानं:कैलास

शिवाचे निवास स्थान कैलास पर्वत आणि स्मशान आहे.”कैलास“ म्हणजे जिथे निव्वळ उत्सव असतो, आणि “स्मशान“ म्हणजे जिथे रिक्तपणा आहे. दिव्यत्व रिक्तपणा तसेच उत्सव असेल तेथेच पहायला मिळते. रिक्तपणा आणि उत्सव आपल्या प्रत्येकामध्ये आहे.


“ॐ नमः शिवाय “ चे महत्व:

ओम नमः शिवाय अत्यंत परिणामकारक मंत्र आहे. तो तुमच्या अंतर्गत ऊर्जा निर्माण करतो तसेच वातावरण शुद्धीचे कार्य करतो. मंत्रांमध्ये असे ध्वनी असतात जे आपली चेतना ऊर्ध्वगतीला नेतात.


ओम नमः शिवाय हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण “न”, ”म“, ”शि“, “वा“, “य“ हे शब्द पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंच महाभूतांचे प्रतिक आहेत.

ॐ हा या ब्रम्हांडाचा ध्वनी आहे.ॐ म्हणजे शांती आणि प्रेम.

म्हणून जेंव्हा या पंच महाभूतांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद असतो तेथे आनंद, परमानंद असतो.मंत्रांची शक्ती ग्रहांच्या श्रेष्ठ आहे. ग्रहांचे विपरीत परिणाम ॐ नमः शिवायच्या जपाने नष्ट करू शकता.

महाशिवरात्री या दिवशी दोन्ही वेळ उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रत आहे.

महाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. 

 

 शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही.  त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

महाशिवरात्री व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.

 हिंदू धर्मातील बहुतेक लोक हे भगवान शिव शंकराची भक्त आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात ” महाशिवरात्रीला “  खूप महत्त्वाचे स्थान आहे.

खरे पाहता प्रत्येक महिन्याचा चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात बारा शिवरात्री येतात. 

  परंतु या बारा शिवरात्री पैकी फेब्रुवारी -मार्च महिन्यामध्ये येणारे शिवरात्र ही ” महाशिवरात्र “ म्हणून साजरी केली जाते.


महाशिवरात्रीला अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धा ची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक

 होण्याची शक्यता असते.


महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्यामुळे महाशिवरात्रि रात्री सर्वजण जागरण करून महाशिवरात्रीच्या सण साजरा करतात.नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर उत्सव करून सगळेजण जागे राहतात, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर न झोपता जागे राहतात.


 खरे पाहता महाशिवरात्रि म्हणजे काय 

” महाशिवरात्र “ म्हणजेच, ” शिवची महान अशी रात्र. ” महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने आणि भक्तीभावाने हा साजरा केला जातो.


 या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिव नामावली उच्चारली जाते. तसेच महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल शंकराला वाहिले जाते. त्यादिवशी उपोषण व जागरण करावे . ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान  १०८ जप करावा  व शिवाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत .. ओम नमः शिवाय । शुभम भवतु ।।

Wednesday, February 19, 2025

गजानन महाराजांचे प्रकटीकरण

 

समाधी मंदिर शेगाव


(२० फेब्रुवारी २०२५ )

वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.

“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.


कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.


शेगावीचा योगीराणा – संत गजानन महाराज यांचा कार्यकाळ: १८७८ ते १९१० हा आहे.

श्री देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याश्याच्या रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्रीगजाननविजय ह्या पोथीमध्ये आलेले आहेत.


एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळीअक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर, तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले. 


त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की, स्वामी समर्थाच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उध्दार करावा व तिथेच देह सोडावा हे विसरू नको. त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिध्द कपिलधारा तीर्थावर आले व १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिध्दी दिली. या योगसिध्दीनंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या संतमेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करुन लाड कारंजा या गावी आपल्या घरी आणले. येथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे, अलंकार व भेटवस्तू देऊ लागले. बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे, अलंकार सर्व तिथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिरामबाबांजवळ आले व ४- ५ दिवस तेथे राहिले.गजानन महाराज मणिरामबाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिरामबाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मणिरामबाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेच्यावेळी मणिरामबाबांनी संत गजाननास आकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्याप्रमाणे संत गजानन महाराज आकोटला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले. दोघांनीही अंतरज्ञानाने परस्परांना ओळखले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले कि, मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थाजवळ होतो. त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले. त्यानंतर तू माझे किर्याकर्म करून शेगांवला भक्तांचा उध्दार करण्याकरिता जावे असे सुचविले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिध्दीप्राप्ती शिकविली व आपल्या काही शक़्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशाप्रकारे गजानन नरसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगांवला आले.


सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले.  महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत, म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.


गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित किंबहुना त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली. दि. ०८ सष्टेबर १९१० रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले .


गजानन महाराज शेगाव संत गजानन महाराज मंदिर शेगाव 

‘मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्र्वरावाचून कोणीही तारणहार नाही,’ हे ईश्र्वरीतत्त्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म, भक्ती, योग हे तीन मार्ग सांगितले आहेत. या तिन्ही मार्गांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे. हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. कारण ते ईश्र्वराचे निस्सीम भक्त होते. यामुळे ईश्र्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. परमार्थात खोटेपणाला मुळीच थारा नसतो.


परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. माघ वद्य ७ शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, 


"कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||


जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे,


"दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||" 


जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. 


जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे,


"बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | 

लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||" 


बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.


gajanan maharaj and ramchandra patilश्रीगजानन महाराज रामचंद्र पाटलास गोसाव्यांच्या वेषात दर्शन देत आहेत - श्रीगजानन विजय अ. २१

श्रीगजानन विजयमध्ये वर्णिलेले चमत्कार हे एका दृष्टीने अद्भुत असले तरी सर्वस्वे अद्भुत नाहीत. तसे चमत्कार अन्य साधुपुरुषांच्या, मुक्तपुरुषांच्या चरित्रात अनेकदा आढळून येतात. विविध धर्मग्रंथातही त्यांचा उल्लेख सापडतो. उदाहरणार्थ- पंढरपूर मुक्कामी असताना बापूराव नामक महाराजांचा भक्त स्वत: विठ्ठल मंदिरात जाऊ शकला नाही. श्रीगजानन महाराजांनी त्याला विठोबाचे दर्शन घडवून दिले. इतरांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनीही महाराजांकडे दर्शनाचा आग्रह धरला. तेव्हा अगोदर बापूरावांसारखे निरागस व शुद्ध मनाचे व्हा, असे महाराज म्हणाले, पंढरपुरात कॉलऱ्याने ग्रस्त झालेल्या एका सोबत्याला सोडून जेव्हा इतर लोक जाऊ लागले, तेव्हा श्रीगजानन महाराजांनी स्वत: त्या आजारी माणसाचा पत्कर घेतला. तो बरा होईपर्यंत त्यांनी जाणे तहकूब केले. बाळापूर येथील बाळकृष्णपंत व पुतळाबाई वृद्धावस्थेत शेवटीशेवटी दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर जाऊ शकत नव्हती. स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे बाळकृष्ण उत्सवाच्या दिवशी समर्थांची वाट पाहत होते. खरोखरच समर्थांची जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी ऐकू आली आणि समर्थ बाळकृष्णासमोर उभे ठाकले. पाहता पाहता क्षणात समर्थ व क्षणात गजानन महाराज अशी दोन्ही रूपे बाळकृष्णांना दिसू लागली. एका दृष्टीने हा चमत्कार म्हणता येईल, पण दुसऱ्या दृष्टीने हा चमत्कार नाही. अशाच प्रकारचे दर्शन श्री मथुरबाबू यांना घडले असल्याचा उल्लेख श्रीरामकृष्ण-लीलाप्रसंग या ग्रंथात आहे. श्रीरामकृष्ण व्हरांड्यात फिरत होते. मथूरबाबूंचे त्यांच्याकडे लक्ष होते. पाहता पाहता मथूरबाबूंचा आपल्या डोळ्यांवर विश्र्वास बसेना. कारण एकदा शिव व एकदा श्रीरामकृष्ण असे त्यांना दर्शन घडले.


श्रीगजानन महाराजांनी गंगायमुनेचे स्मरण करताच भास्कर पाटलांच्या शेतातील कोरडी विहीर तुडुंब भरून जाणे, नर्मदेची स्मृती करताच बुडणारी नाव तरून जाणे या चमत्कारांमागेही श्रीमहाराजांची इच्छाशक्तीच होती. ही इच्छाशक्ती लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभी राहिल्याचा उल्लेख ‘श्री गजानन विजय’मध्ये आहे. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तीनांही श्रीगजाननमहाराजांबद्दल नितांत आदर होता, ही गोष्टही चमत्कारांमधील कार्यकारणसंगती दर्शवून जाते. गंगाभारतीचा सर्वांगावर उतलेला कुष्ठरोग श्रीगजाननमहाराजांनी नष्ट केला. महापुरुषांचा स्पर्शामुळे घडून आलेल्या अशा घटनांचा उल्लेख अन्य वाङ्मयांतही आढळून येतो.


श्री गजानन महाराजश्री गजानन महाराज

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,


"मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||."


ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.


मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंबर अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले,


"तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||."


महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत.पादुका,पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला.


gajanan maharajसमाधी मंदिर शेगाव

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले,


"मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||."


यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले,


"दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||."


देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.


गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।। 

या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।। 

हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।। 

हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।


।। गण गण गणात बोते ।।

Thursday, February 13, 2025

श्रीगुरुप्रतिपदा (माघ वद्य प्रतिपदा) श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज निजनांदगमन दिवस!

 


श्रीगुरुप्रतिपदा (माघ वद्य प्रतिपदा) श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज निजनांदगमन दिवस!

गुरुवार १३फेब्रुवारी २०२५

नमो सदा श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज ।।


 गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झालेश्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन

गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या.

 

बहुधान्य संवत्सर माघमास ।कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पती होता सिंहराशीस । उत्तर दिशो होता सूर्य पैं ।।

शिशिरऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसं शुभमुहूर्ती गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते जाहले ।। 

मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं ।बैसोनि शिष्यांस संबोधोनी । आमुचा वियोग झाला म्हणौनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ।। 

त्या गाणगापूरांत । आम्हक असोंच पूर्ववत । भावना धृढ धरा मनांत । तुम्हा दृष्टांत तेथें होईल ।।

आम्ही जातो आनंद स्थानासी । तेथें पाहलों याची खूण तुम्हांसी । फुले येतील जिनसजिनसीं ।। 

श्रीगुरूचरित्र अ. ५३ ओवी ३१ ते ३५


दयेची, कृपेचीच जी शुद्ध मूर्ती ...धाव घेई हे मन गाणगापुरी.....!!

ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पादुका। मन्त्र मूलं गुरु वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा।।


माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. 


आजच्या तिथीला भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यति पूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या 'विमल पादुका' स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.


भगवान श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात, म्हणून या तीन पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत.


विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वत: श्रीनृसिंहसरस्वती महाराज म्हणतात, 


तुम्हां सहित औदुंबरी । आमुच्या पादुका  मनोहरी ।

पूजा करिती जे तत्परीं । मनोकामना पुरती जाणा ॥

श्रीगुरुचरित्र १९.८१ ॥


देव वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की, जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल.  भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, 


कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचें जेथ स्थान ।

पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥

श्रीगुरुचरित्र ५१.२१ ॥


पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्पपुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्प

भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना 'निर्गुण पादुका' म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणा-या पादुका असाच घ्यायला हवा.  या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. 


श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषाना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो खाली देत आहोत.


श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही!


शुभम भवतु

Tuesday, February 11, 2025

कुरवपुर एक दुर्गम पण जागृत दत्तक्षेत्र

 



अ) दुर्गम श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी ..

कुरवपुर ला येणे सर्वानाच आवडते परंतु तीथे सुख सुविधा नसल्यामुळे भक्त लोकांना तीथे रहायला आवडत नाही परंतु तीथे सुख सुविधा नाहीत अन्नछञ नाही हाँटेल्स नाहीत या साठी कोणीही व्यक्ती जबाबदार नाही तीथे विराजमान असल्यालेल्या परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना या गोष्टी नको आहेत त्यांची ईच्छा नसल्यामुळे अजूनही या गोष्टी बनू शकल्या नाहीत 1980 साली कुरवपुर च्या कृष्णा नदीवर सरकार कडून पुल मंजूर झाला आहे तरीही आज 44 वर्ष झाली तरी तो पुल पुर्ण होऊ शकला नाही आहे याचे कारण एकच आहे की परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना वाटते इथे गर्दी वा गोंधळ वाढायला नको कारण इथे गर्दी वाढली तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पुर्ण कराव्या लागणार तसेच चांगल्या भक्तांच्या बरोबर वाईट भक्त सुद्धा परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे दर्शन घेणार आणि परमात्मा हेच नको आहे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची ईच्छा आहे फक्त निवडक निस्सीम श्रद्धा असलेल्या भक्तानाच दर्शन देण्यासाठी कुरवपुरात बोलावावे जे लोक भाग्यवान आहेत ज्यानी आपल्या भक्तिने मागिल जन्मी परमात्मा प्राप्ती केली आहे अश्या भाग्यवान पुण्यवान भक्तानाच परमात्मा कुरवपुर मध्ये बोलवतो, कुरवपुर मध्ये जाणे सोपे नाही आहे इथे जाण्यासाठी अनेक जन्माची भक्ती फळास यावी लागते इथे जाण्यासाठी  अनेक जन्माची सत्कर्माची  पुंजी असावी लागते तसेच इथे जाण्यासाठी प्रबळ ईच्छा असावी लागते व परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ भेटण्यासाठी तीव्र ओढ असावी लागते त्यांच्या वर श्रद्धा असावी लागते तेव्हाच तीथून आपल्याला बोलवणे येते परंतु तीथे जाण्यासाठी ऐवढ्या गोष्टी का बघीतल्या जातात..? तर त्याचे उत्तर आहे हे कलियुग आहे इथे भक्त प्रल्हादा सारखे भक्त आहेतच तसेच हिरण्यकश्यपु सारखे सुद्धा आहे आणि परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना फक्त भक्त प्रल्हादा सारखेच भक्त प्रिय आहेत त्यामुळे त्यानाच आपले दर्शन घडावे,आपण इथेच आहो याचा सुद्धा अनुभव यावा  म्हणून तर इथे येण्यासाठी खुप गोष्टी बघीतल्या जातात, म्हणून कुरवपुर या ठिकाणी जे जे जाऊन आलेत व ज्यानी ज्यानी भगवंताचे कुरवपुर मध्ये जाऊन दर्शन घेतले आहे ते सर्वजण धन्य आहेत तेच या कलियुगातील भगवंताचे प्रिय भक्त प्रल्हाद आहेत  . तेच श्री श्रीपाद वल्लभ  यांना प्रिय आहेत.

आता प्रथम पाहू श्रीक्षेत्र कुरवपूर ...कसे जावे ? इथे  दुर्गम क्षेत्री पुजारी कसे आले ? श्रीपाद आश्रम पंचदेव पहाड काय  आहे ?

  १ )या क्षेत्री असे जावे

कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक (KURAVPUR)-

हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावरआहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. याक्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या अठराअक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. 

मुंबई, बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वेमार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो. होडिने १ कि. मी. प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबादया बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते. तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ कि. मी. अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते. नंतर होडिने प्रवासकरून १ कि. मी. अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचतायेते. हा मार्ग अधिक सोयीचा आहे. पंचदेव पहाड यागावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.

२): कुरवपूरचे अर्चक अर्थात पुजारी कसे आले ?

नारायण महाराज नावाचे एक ग्रहस्थ होते. त्यांचे वरचेवर कुरवपूर या स्थानी येणे जाणे होते. तेथील सर्व परिस्थिती त्यांना माहित होती. म्हणजे मंदिरातील पुजे पासून ते पुजारी लोकांच्या पर्यत म्हणजे सर्व माहिती असणारे असे ते नारायण महाराज होते. एकदा ते असेच एका गावी गेले व त्या गावातील एका मंदिरात गेले. तेव्हा त्या गावातील मंदिरात नेहमी असणारे पुजारी नव्हते. त्याजागी त्या पुजाऱ्याचा पुतण्या, केशव हे सर्व करत होता. नारायण महाराजांनी बारीकपणे त्या केशव पुजाऱ्याचे कार्य पाहिले. केशव पुजारी हे आपल्या काकांच्या म्हणजे गोविंद पुजाऱ्याच्या हाताखाली तयार झाल्यामुळे अगदी व्यवस्थित कोणतेही गोंधळ न करता मंदिरातील सर्व पुजा-अर्चा अत्यंत चोख पार पाडली. भजन, कीर्तन, पालखी, गायन अत्यंत छान केले. आणि त्याचा प्रभाव श्री नारायण महाराजांच्यावर पडला. त्या राञी नारायण महाराजाना झोप पण आली नाही. त्यांच्या मनात एक विचार सूरू होता. तो विचार घेऊन दुसरे दिवशी ते मंदिरात पोहचले. त्यांनी केशव पुजाऱ्यांच्याकडे त्याच्या आई वडीलांच्या बद्दल चौकशी केली तेव्हा कळाले, त्यांचे आई वडील इथून तीन मैल अंतरावर असलेल्या एका गावात रहातात.


नारायण महाराज केशव पुजारीच्या वडीलांना म्हणजे रंगभटजीना भेटायला त्यांच्या गावी गेले. जेव्हा ते रंगभटजीना भेटले तेव्हा ते म्हणाले, "श्री दत्ताञेयांच्या प्रेरणेने मना मध्ये अकस्मात एक संकल्प निर्माण झाला आहे. आणि मला खाञी आहे हा मूळ संकल्प माझा नसून तो परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांचा आहे. मी फक्त निमित्त आहे !" असे बोलून ते पुढे म्हणाले "रायचूर पासून २० मैला वरती कुरूगड्डी नावाचे एक गाव आहे. या कुरूगड्डी गावात दत्ताञेय प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे अतिशय पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील सर्व पुजा अर्चा तेथील दोन ब्राम्हणच करतात. पण त्या दोन्हीही ब्राम्हणांची लग्न होऊ शकलेले नाहीत. दोन्ही ब्राम्हण वृद्ध झालेले आहेत आणि मंदिरातील पुजा अर्चा पुढेही सूरू ठेवायची आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलाला म्हणजे केशवला आम्हाला दत्तक देता का ? आम्ही त्याला कुरूगड्डी मधील पुजारी बनवतो." असे बोलून त्यांनी विनंती केली. तेव्हा केशव पुजारींच्या आई म्हणाल्या "कुठ ते निर्जन ठिकाण ? अनोळखी ठिकाण ? खुप दुर असलेले ते स्थान, अपरिचित लोक ! त्यामुळे मी माझ्या मुलाला दत्तक देणार नाही ! मी माझा मुलगा देणार नाही, माझा मुलगा मला जड झालेला नाही. आम्ही त्याचे पालन पोषण करणेस समर्थ आहोत." तेव्हा नारायण महाराज खुप नाराज झाले व तिथून निघून गेले. 

Show quoted text

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आज्ञेने आणि आशिर्वादाने आश्रमात नित्य अन्नदान चालू आहे. डिसेंबर 2007 पासून ते 2014 पर्यंत पांडुरंग स्वामी मंदिरात नित्य अन्नदान चालू होते. नंतर दि. 03-05-2014 पासून श्रीपाद छाया आश्रमाची पक्की इमारत बांधली तेथे सुद्धा नित्य अन्नदान चालू आहे. रोज 200 गरीब मुले, अनाथ, वृद्ध लोक जेवायला असतात. अन्नासाठी तळमळणार्‍यांना अन्न दिल्यास त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.  अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता हे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. दत्त संप्रदायात असे सांगितले गेले आहे की जेथे अन्नदान चालू असते तेथे स्वामी सूक्ष्मरुपात येत असतात.

 नंदिनी गो-शाळेत 50 गाई आहेत. येथून आलेल्या दूधाने देवळात अभिषेक होतो आणि अन्न दानांत वापरले जाते.आपल्या पुराणात गोपूजेला खूप महत्व दिले आहे. हिंदू परंपरेत गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. याला गोपूजा म्हणतात. पुराणात सांगतात की चार समुद्र  गाईच्या दूधात आहेत. वैदिक विद्वान म्हणतात की गायीच्या सर्व भागामध्ये सर्व जग लपलेले आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवण्यासाठी गायीची उपासना केली पाहिजे.

येथे श्रीपाद श्री वल्लभ गुप्त रूपाने उपस्थित आहेत .प्रत्येक दत्तभक्तांनी पुण्य अर्जित करून येथे दर्शनास येऊन पुण्यसंचय करावा शुभम भवतु ।

Tuesday, February 4, 2025

रथसप्तमी (सूर्य जयंती ,नर्मदा जयंती व कृष्णावेणी उत्सवाची सुरवात ) - मंगळवार ४ फेब्रुवारी २०२५

 





रथसप्तमी  ..

रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणले जाते आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.

भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी रथसप्‍तमी हा सण साजरा केला जातो. हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे.


सूर्य जयंती ..

 प्रतिकात्मक रीतीने दर्शविले जाते की सूर्यदेव सूर्य सात घोड्यांनी काढलेला रथ (रथ) उत्तर गोलार्धाकडे उत्तर-पूर्व दिशेने वळवतो. हे सूर्याचा जन्म देखील चिन्हांकित करते आणि म्हणूनच सूर्य जयंती (सूर्य-देवाचा वाढदिवस) म्हणून देखील साजरा केला जातो.

 रथ सप्तमी हा ऋतू बदलून वसंत ऋतू आणि कापणीचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे. बहुतेक भारतीय शेतकऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची शुभ सुरुवात आहे. हा सण सर्व हिंदू त्यांच्या घरात आणि सूर्याला समर्पित असलेल्या असंख्य मंदिरांमध्ये साजरा करतात.

माघ शु. ७ ला सुर्यनारायण सात घोड्यांच्या रथावर स्वार होतात व पुर्ण क्षमतेने पृथ्वीवर अवतरतात व थंडी संपुन खर्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते. याच दिवशी घरोघरी दुध सुर्याच्या दिशेने उतु घालवले जाते व संक्रांतीनंतर पुन्हा एकदा गुळपोळीचा नैवैद्यही देवांसह सुर्यदेवालाही दाखवला जातो. शारिरिक व मानसिकही ताकद वाढावी अशा हेतुने सुर्यनमस्कार घालण्याचा संकल्पही याच दिवशी केला जातो. 

माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. 


कृष्णावेणी उत्सव...

पण याच रथसप्तमी पासुनश्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे'श्री कृष्णावेणी उत्सव'ही सुरु होतो. ज्या, ज्या ठिकाणातुन कृष्णा नदी वाहते अशा सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पण आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा करतात. मात्र श्री क्षेत्र नृसिंहवाडीला याचे महत्व जास्त. कारण ईशान्येकडुन कृष्णेसह वेणी तर पश्चिमेकडुन पंचगंगा अशा सप्त नद्यांचा संगम, अष्टतिर्थे, साक्षात विष्णुंचा अवतार असलेल्या नृसिंहांचा  आशिर्वाद लाभलेल्या, पवित्र अशा औदुंबर वृक्षाचे अस्तित्व असलेल्या व दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणार्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे १२ वर्षांचे वास्तव्य व पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या उत्सवास श्री टेंबे स्वामी महाराजांच्या आशिर्वादामुळे, प्रेरणेमुळे आलेले भव्य स्वरुप यामुळे वाडीतील कृष्णावेणी उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे.

नर्मदा जयंती ...रथसप्तमीला  म्हणजेच नर्मदा जयंतीला  सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून लोकांच्या स्नानाने  जमाझालेले  सर्व पाप विसर्जित करतात.

असा हा पुण्यपावन दिवस सर्वांनी आनंदाने  व  भक्तिभावाने साजरा करावा ।

।।पायी हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला ।।


Sunday, February 2, 2025

श्रीकृष्णावेणी उत्सव व गोपाळकाला.. श्री क्षेत्र नृसिंहवाडी

 


श्रीकृष्णावेणी उत्सव व गोपाळकाला..  श्री क्षेत्र नृसिंहवाडी 
(महाराजांचे राजधानीतील प्रमुख व प्रासादिक महोत्सव )


भक्तचित्तस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी |

भक्ततृष्णा हरे देवि कृष्णावेणी नमोऽस्तु ते ||


दिनांक ४ फेब्रुवारी मंगळवारी रथसप्तमी च्या मूहूर्तावर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी क्षेत्री प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुरू केलेला कृष्णावेणी उत्सव सुरू होतो आहे या निमित्ताने आपण कृष्णावेणी या नामाचा नेमका अर्थ काय होतो याचे चिंतन करू!

स्वामी महाराजांनी रचलेल्या कृष्णा लहरी वरील भाष्यामधे कृष्णावेण्यै नमः किंवा कृष्णावेणीभ्यां नमः असा एकवचनी आणि द्विवचनी नामनिर्देश केलेला आढळतो.

म्हणजे कृष्णावेणी हे एकवचनी नाम आहे तसेच ते कृष्णा + वेणी = अशा दोन नामांनी एकत्रित बनलेले आहे असे दिसते!

मग प्रश्न असा आहे की जर ही दोन नावे आहेत तर मग मातेचा श्रीविग्रह एकच कसा? कारण माहुली येथे दोघींचा स्वतंत्र अर्चाविग्रह आहे!

सर्वसिद्धिप्रदायक वेण्णानदी अत्यंत वेगाने येऊन मिळाल्याने इथून पुढे ती कृष्णावेणी म्हणून प्रसिद्ध झाली, अशी व्याख्या कृष्णा माहात्म्यात येते जलसमूह किंवा जलप्रवाह म्हणजे वेणी होय!

वेणीचा दुसरा आणि सर्वांना माहित असलेला अर्थ म्हणजे केसांची वेणी!

पण वेणी म्हणजे नदी या अर्थाने कृष्णावेणी असा अर्थ ध्वनित होतो!

गंगा यमुना सरस्वती यांच्या संगमाला काय म्हणतात त्रि_-वेणी संगम!

मग त्रि म्हणजे तीन आणि वेणी म्हणजे नदीप्रवाह होय!

म्हणून कृष्णामाईस कृष्णावेणीमाता म्हणताना आपण एकवचनी नामाने कृष्णानदी तर द्विवचनी नामाने कृष्णामाई वेण्णामाई असाही अर्थ घेऊ शकतो .

माघ शु. ७ म्हणजेच रथसप्तमीला ला सुर्यनारायण सात घोड्यांच्या रथावर स्वार होतात व पुर्ण क्षमतेने पृथ्वीवर अवतरतात व थंडी संपुन खर्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते. 


*पण याच रथसप्तमी पासुनश्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे'श्री कृष्णावेणी उत्सव'ही सुरु होतो. ज्या, ज्या ठिकाणातुन कृष्णा नदी वाहते अशा सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पण आनंदी वातावरणात हा उत्सव साजरा करतात. मात्र श्री क्षेत्र नृसिंहवाडीला याचे महत्व जास्त. कारण ईशान्येकडुन कृष्णेसह वेणी तर पश्चिमेकडुन पंचगंगा अशा सप्त नद्यांचा संगम, अष्टतिर्थे, साक्षात विष्णुंचा अवतार असलेल्या नृसिंहांचा  आशिर्वाद लाभलेल्या, पवित्र अशा औदुंबर वृक्षाचे अस्तित्व असलेल्या व दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणार्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे १२ वर्षांचे वास्तव्य व पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या उत्सवास श्री टेंबे स्वामी महाराजांच्या आशिर्वादामुळे, प्रेरणेमुळे आलेले भव्य स्वरुप यामुळे वाडीतील कृष्णावेणी उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच आहे. प्रत्येक दत्तभक्तांनी या पवित्र उत्सवाचे काळात कृष्णामाई व श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा .


उत्सवाच्या दिवशी सकाळी मानकरी ब्राह्मणाच्या घरातुन वाजत गाजत अतिशय उत्साहात श्री कृष्णावेणी मातेची मुर्ती मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला(उत्तरेला) भव्य व आकर्षक शामियान्यामध्ये, सुशोभित केलेल्या जागेवर वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांच्या विधीयुक्त संकल्पाने प्रतिष्ठापित केली जाते. माघ पौर्णिमेपर्यंत चालणार्या या उत्सवामध्ये श्री कृष्णावेणी मातेची दैनंदिन पुजा, आरती इ. व्यतिरिक्त ऋकसंहिता, आरण्यक, श्री गुरुचरित्र, कृष्णा महात्म्य, श्रीमत् भागवत, श्री सुक्त, रुद्रैकादशनी, सप्तशती इ. पारायणे व रुद्र स्वाहाकार, कृष्णालहरी पठण, पुराण, प्रवचन, किर्तन, भजन व याशिवाय शास्त्रीय गायन- वादन इ. कार्यक्रम होतात. पौर्णिमेला रात्री  करवीर पिठाच्या शंकराचार्यांचे आशीर्वचन असते. त्यानंतर कृष्णावेणी उत्सवाची सांगता होते.

त्यानंतरचा दिवस म्हणजे माघ कृ. प्रतिपदा हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या श्री शैल्य गमनाचा दिवस असल्याने प्रतिपदा ते पंचमी असे ५ दिवस गोपाळकाला नावाने साजरे केले जातात. "मी येथे शरिराने जरी नसलो तरी जे भक्त माझी मनापासुन भक्ती करतात त्यांनी केव्हाही माझी आठवण काढली, धावा केला तरी मी त्यांच्यासाठी कायमच उपलब्ध आहे" असे आश्वासन श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्यगमनाच्या वेळी भक्तांना दिलेले असल्याने ५ दिवस व रात्रीही अखंडपणे अशा पद्धतीने हा गोपाळकाला उत्सव केला जातो. यानिमित्ताने मंदिर व उत्सवमुर्ती सजविण्यात येते. उत्सवाच्या मुख्य दिवशी(प्रतिपदेला) सध्याच्या भाजी मंडईच्या/पार्किंगच्या जागेत(अर्थातच त्या जागेवरील सर्व अतिक्रमणे हटवुन, जागा शुद्ध, पवित्र करुनच)  सोवळ्याने नैवैद्य केला जातो. यालाच 'बनातील प्रसाद' असे म्हणतात. इतर वेळी रोज दुपारी होणारी महापुजा या ५ दिवशी मध्यरात्री १२.३० वा असते व त्यानंतर धुप, दिप, आरती व पालखी असते. या ५ दिवशीही भक्तीगीते, भजन, प्रवचन किर्तन इ. कार्यक्रम असतातच. पंचमीला म्हणजे औदुंबर पंचमीला या गोपाळकाला उत्सवाची सांगता होते. औदुंबर पंचमीचे एक विशेष भावनिक महत्व आहे  ... श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज माघ व १ श्री शैल्य गमन करताच गाणगापूर येथील भक्त तर दुःखी झालेच पण  महाराजांनी  १२ वर्षे वास्तव्य केलेले श्री क्षेत्र नृसिंह वाडीत भक्त खूप दुःखी झाले  मन लागेना म्हणून तेथे महाराज पुन्हा प्रगट झाले ५ दिवस  भक्तगणांनी अहोरात्र  सेवा केली .आपण  स्मतृगामी असल्याची प्रचिती दिली भक्त आनंदी झाले व औदुंबर पंचमी ला महाराज पुन्हा अदृश्य झाले


अशा प्रकारे ९ दिवस कृष्णावेणी उत्सव व पुढील ५ दिवस गोपाळकाला उत्सव असा हा नृसिंहवाडीमधील सर्वात प्रदिर्घ व १४ दिवस चालणारा महोत्सव संपन्न होतो.

।।श्रीकृष्णावेणी माता की जय।।