 |
।।ओम नमः शिवाय ।। |
महाशिवरात्री ... शिवआराधनेची पर्वणी .....अत्यंत पवित्र दिवस .
१) महाशिवरात्र महत्त्व काय ?
हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ महिन्यात चतुर्दशीला महाशिवरात्री असते. यंदा २०२५ मध्ये २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री येत आहे.
अशी मान्यता आहे की महाशिवरात्रीला भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जी व्यक्ती भगवान शिव- पार्वतीचे व्रत व आराधना करते त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
महाशिवरात्री वर्षातून एकदा येणारा महत्वाचा धार्मिक महोत्सव आहे. महाशिवरात्री बाबत, प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. अशीही मान्यता आहे कि शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात. २ )महाशिवरात्रीचे व्रत का करावे : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ.
महाशिवरात्री साजरी करण्यामागे आहेत ही विविध कारणे
महाशिवरात्री कथा (१)...
समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होते ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून, कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतू मंथनातून हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे ही म्हटले जाते. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात. जागरण करतात .
महाशिवरात्र कथा ( २ )..
या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते एकदा ब्रह्मा आणि विष्णूदोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतत निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेले. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर हि गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरवात आणि शेवट नसणाऱ्या पिंडीच्या रुपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचा प्रयत्न निष्फल ठरला त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघे ही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या पिंडी समोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ऊॅं असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्पटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रुपात प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.
महाशिवरात्री पूजा ..
शंकराची पूजा महाशिवरात्रीचे व्रत करताना उपवास दोन्ही वेळी२६ फेब्रुवारीला करावा . मध्यरात्री शंकराची पूजा करावी शंकराला पांढरे गंध पांढरी फुले ,बिल्वपत्र धोत्र्याचे फुल खूप आवडतात .
महाशिवरात्री या दिवशी दोन्ही वेळ उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य चतुर्दशी ला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रतात मोडते .
महाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.
महाशिवरात्रीचे व्रत का करावे :
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.
महाशिवरात्री व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन वृतसमाप्ती करावी.
हिंदू धर्मातील बहुतेक लोक हे भगवान शिव शंकराचे भक्त आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात ” महाशिवरात्रीला “ खूप महत्त्वाचे स्थान आहे.
खरे पाहता प्रत्येक महिन्याचा चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात बारा शिवरात्री येतात. परंतु या बारा शिवरात्री पैकी फेब्रुवारी -मार्च महिन्यामध्ये येणारे शिवरात्र ही ” महाशिवरात्र “ म्हणून साजरी केली जाते.
महाशिवरात्रीला अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धा ची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक होण्याची शक्यता असते.
महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्यामुळे महाशिवरात्रि रात्री सर्वजण जागरण करून महाशिवरात्रीच्या सण साजरा करतात.नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर उत्सव करून सगळेजण जागे राहतात, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर न झोपता जागे राहतात.
खरे पाहता महाशिवरात्रि म्हणजे काय
” महाशिवरात्र “ म्हणजेच, ” शिवाची महान अशी रात्र. ” महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने आणि भक्तीभावाने हा साजरा केला जातो.
या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिव नामावली उच्चारली जाते. तसेच महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल शंकराला वाहिले जाते. त्यादिवशी उपोषण व जागरण करावे . ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान १०८ जप करावा व शिवाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत ..
💐आपणास सर्वांना हे ज्ञातच आहे स्वामी समर्थ म्हणत असत ...
"जय शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो । हे गिरीजापती नमामी शंकर शिवशंकर शंभो ।।"
💐 योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे कार्यकाळातील महाशिवरात्री चा एक प्रसंग असा ....संदर्भ : भगवंत अघोर कृत "शंकर गीता" ग्रंथ
एकदा महाशिवरात्रीची पर्वणी साधून मेहंदळे वाडयात भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता, भरपूर गर्दी भजन ऐकण्यासाठी जमली होती . सद्गुरू श्री शंकर महाराज सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भजन चांगलेच रंगात आले आणि सद्गुरू श्री शंकर महाराज हसून सर्वांना म्हणाले की,
* आज महाशिवरात्री असत । * मंदिर एकदाच असे उघडत ।।.
पण महाराजांच्या बोलण्याचा सरळ अर्थ कोणालाही कळला नाही . नंतर मंडळी महाराजांकडे पाहू लागली तर काय आश्चर्य ?
महाराजांच्या शरीराचा मूळ रंग बदलून महाराज निलवर्णी म्हणजेच निळा रंग धारण केलेल्या प्रत्यक्ष भगवान महादेवा सारखेच दिसू लागले.
आता कुठे जमलेल्या मंडळींना महाराज मंदिर एकदाच उघडते असे का म्हणाले ह्याचा अर्थ कळला. मग जमलेल्या मंडळींनी सद्गुरू श्री शंकर महाराजांना बेलफुल वाहून त्यांची यथासांग पूजा केली आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून महाशिवरात्रीच्या दिनी साक्षात भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले .
शिवाला आवडणारे रुद्रासूक्त ...
रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात
याशिवाय शिव उपासने बाबत काही महत्वपूर्ण माहिती ... महाशिवरात्री चे निमित्ताने आपण पाहू ...
१) रोज शिवलिंग अभिषेक:-केला तर अनेक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते, सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते. रोजी रोटी चालू राहते, गुप्त शत्रूंना आळा बसतो,संकटातून रक्षण होते.
२) महादेवाच्या पिंडीचे रहस्य -:
-:●:- घरात देवघरात महादेवांची पींड ठेवावी
|| मुर्ती / फोटो नसावा
-:●:- पींड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो
|| पितळेची असावी.
-:●:- देवघरातील पींड ३ इंचा पेक्षा मोठी असु नये
|| ती ३ इंच पेक्षा छोटी असावी.
-:●:- भगवान महादेव हे देवाधिदेव असुन हे न्यायप्रिय दैवत
|| आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, आणि जसे
|| देव, दानव, यक्ष, किन्नर, भूतं, प्रेतं, पिशाच्चं, आणि
|| इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. आणि
|| जिथे महादेवांची मुर्ती / फोटो असतो तिथे त्यांचे सर्व
|| भक्त उपस्थित होतात.
-:●:- जोतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पींडीला
|| संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा
|| करुन नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व
|| भक्तांचा अदृश्य रुपाने उपस्थित असतात. तथा उत्तर
|| दिशेने महादेवांच्या पींडीवर जलाअभिषेक घातलेले पाणी
|| तीर्थ रुपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते
-:●:- महादेवांचा फोटो अथवा मुर्ती फक्त स्मशानात असते,
|| देवघरात महादेवांचा फोटो अथवा मुर्ती नसावी. मानवाला
|| पींड पूजन सांगीतले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात
|| महादेवांचे मुख्य शक्ति पीठांवर महादेवांची पींड लिंग
|| रुपाने स्थापन केलेले समजते.
-:●:- १२ ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पींड रुपाने आहेत,
|| यातुन संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते .
-:●:- महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत
|| जलाभिषेक करावा.
-:●:- महादेवांना जल अति प्रिय आहे, एखाद्याने महादेवांस
|| जल अर्पण केल्यास ते त्यावर खुप प्रसन्न होतात.
-:●:- महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन
|| सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपूल पर्जन्यमान
|| राहते.
-:●:- गुरुचरित्रात असे म्हटले आहे की, नित्यच्या
|| रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली
|| मृत्यू टळतो.
-:●:- श्रीमद्भागवतात म्हटले आहे की, महादेवांची नित्य
|| नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी
|| वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते
|| आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.
💐महादेवाचे उपासनेत या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका. . भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
३) खाली दिलेल्या या गोष्टी :------ भगवान शंकरांना कधीही अर्पण करु नका
१ } शंख 🔸:------------
|| शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या
|| असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त
|| असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. शिवपिंडीवर केव्हाही शंख जल घालू नये .
२ } हळद कुंकू 🔸:------------
|| भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी
|| संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही.
|| हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद
|| किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही.
|| या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.
३ } तुळशी पत्र 🔸:------------
|| असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका
|| कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली
|| होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता.
|| त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न
|| वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४ } नारळ पाणी 🔸:------------
नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून
|| शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून
|| वापर केला जातो. पण, भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५ } उकळलेले दूध 🔸:------------
|| उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध
|| कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा
|| गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे
|| पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा
|| वापर करणेही टाळावे.
६ } केवड्याचे फूल 🔸:------------
|| भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे.
|| शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे
|| बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता
७ } कुंकू किेंवा शेंदूर 🔸:------------
|| कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा
|| करण्यात वर्ज्य केला आहे.
४) शिवाने_धारण_केलेल्या_चिन्हांचा_मतितार्थ काय आहे ते जरा समजून घ्या
१. चंद्र: ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते मनोभावनांद्वारे व्यक्त होत असते. चंद्रकला हे त्याचेच द्योतक आहे.
२. नाग हा सजगतेचे प्रतिक आहे. शिवाच्या गळ्यातील नाग चेतनेची सजगता दर्शवतो.
३. त्रिशूल: शिव तत्व जागृती, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था यापेक्षा श्रेष्ठ परंतु या तिन्ही अवस्थांना धारण केलेले आहे, याचे त्रिशूल हे प्रतिक आहे.
४. त्रिनेत्र: सजगता, ज्ञान आणि शहाणपणा हे त्रिनेत्राने दर्शवतात.
५. डमरू. ब्रम्हांडामधील प्रत्येक गोष्ट निर्माण होते आहे, लय पावत आहे पुन्हा निर्माण होत आहे. ही निर्मितीची प्रक्रिया आहे. डमरू याचेच प्रतिक आहे.
६. नंदी: नंदी म्हणजे धर्म, सत्य, योग्य निवड. शिवाने नंदीवर सवारी केली आहे. जेंव्हा तुम्ही सत्यासोबत असता तेंव्हा ईश्वरी तत्व तुमच्या सोबत अस
#शिवाने_डोक्यावर धारण केलेल्या #चंद्रकोरीचे महत्व:
चंद्र मनाचे द्योतक आहे आणि मनाचे अस्तित्व संपणे म्हणजे शिव तत्व. मनाचे अस्तित्व नसताना “ती” अवस्था कशी वर्णन करू शकतो किंवा अनुभवू शकतो? काहीही समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी मनाची गरज असते. ”निर्मनावस्था, अनंत चेतना” अनुभवण्यासाठी देखील अल्पश्या प्रमाणात मनाची गरज आहे. अव्यक्ताच्या अनुभूतीसाठी लागणाऱ्या त्या अल्प मनाचे प्रतिक शिवाच्या माथ्यावरील छोटीशी चंद्रकोर आहे.भगवान शिवाच्या गळ्यातील नागाचे महत्व:
निव्वळ चेतनेची पोकळी असणे, कोणतीही कृती नसून केवळ सजगता असणारी अवस्था म्हणजेच शिव, म्हणजेच समाधीवस्था. या अवस्थेची ओळख व्हावी म्हणून शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे. नाग हा या सजगतेचे प्रतिक आहे.
ध्यानावास्थेमध्ये व्यक्तीचे डोळे बंद असतात मात्र ती व्यक्ती झोपलेली नसते तर दक्ष, सजग असते. चेतनेची ही स्थिती दर्शवण्यासाठी शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे.
५)भगवान शिवाच्या #त्रिशुळाचे महत्व.
त्रिशूल चेतनेच्या तीन स्थिती: जागृत, स्वप्न आणि निद्रावस्थाचे प्रतिक आहे. तसेच ते सत्व, रजस आणि तमस गुणांचे प्रतिक आहे. शिवाने त्रिशूल धारण केले आहे म्हणजे तो या तिन्ही जागृती, स्वप्न आणि निद्रावस्थेपेक्षा श्रेष्ठ असून या तिन्ही अवस्था त्याने धारण केल्या आहेत.
ईश्वरी तत्व त्रिगुणांपेक्षा श्रेष्ठ असून हे त्रिगुण त्याने धारण केले आहेत.
शूल म्हणजे समस्या, दुःख. त्रिशूल म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या, दुःखांचे निराकरण.
💥जीवनात तीन यातना आहेत.
१. आधिभौतिक (शारीरिक),
२. अध्यात्मिक,आणि
३. आदिदैविक.
या सर्वांतून मुक्त करणारे म्हणजे त्रिशूल जे शिवाने आपल्या हातात धारण केले आहे.
भगवान शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहणाऱ्या गंगा नदीचे महत्व
गंगा म्हणजे ज्ञान जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते. मस्तक हे ज्ञानाचे प्रतिक आहे.
हृदय प्रेमाचे प्रतिक आहे.
गंगा प्रेमाचे प्रतिक असती तर ती शिवाच्या हृदयातून निघाली असती. परंतु ती तर मस्तकावरून, जटेतून निघाली आहे, म्हणजेच ती निव्वळ ज्ञानाचे प्रतिक आहे.
ज्ञान हे मुक्त, स्वतंत्र आणि शुद्धी करणारे असते. ही ज्ञानाची वैशिष्टे आहेत. ज्ञान हे प्रवाही असते. म्हणून गंगेने, ज्ञानाने शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहत रहाणे क्रमप्राप्त आहे.
भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व:
तिसरा डोळा दक्षता आणि सजगतेची निशाणी आहे.
💐शिवाच्या #नील वर्णाचे #महत्व :
निळा रंग आकाशाचे द्योतक आहे. आकाश सर्वव्याप्त, अनंत असून असीम असते. निराकार आहे. शिव तत्वाला देखील आकार नाही, ती कोणी व्यक्ती नाही. त्या अथांग, अनंत, अनाकलनीय ईश्वरी तत्वाला लोकांना आकलनीय करण्यासाठी प्राचीन ऋषींनी हा आकार दिला आहे.
ज्ञान देखील निराकार असून ते विश्वातील अणू रेणूमध्ये प्रसवत असते.
#शिव तत्व म्हणजे समस्त विश्व भरून उरले आहे.
💥शिवलिंगाचे_महत्व:
लिंग म्हणजे ओळख. सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचे प्रतिक. जे दिसू शकत नाही मात्र ज्याच्यामुळे आपण इतरांना ओळखू शकतो ते म्हणजे लिंग.
एक बाळ जन्माला येते, ते मुलगा आहे कि मुलगी, हे कसे कळते? शरीराच्या निव्वळ एका अवयवामुळे ते शरीर मुलाचे आहे कि मुलीचे ते कळते. त्या जननेन्द्रीयाला देखील लिंगम म्हणतात.
तद्वत, आपण निर्मितीच्या ईश्वराला कसे ओळखणार? तो तर आकारहीन, निराकार आहे. मग त्याला ओळखण्यासाठी काहीतरी प्रतिक हवे नां? असे एकच प्रतिक ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोन्ही ओळखले जाईल, समस्त ब्रम्हांडाला सर्वव्यापी परंतु निराकार ईश्वराला जाणण्याचे प्रतिक शिवलिंग होय.
शिवलिंग प्राचीन नव्हे अतिप्राचीन आहे. शिवलिंगाद्वारे आपण साकाराकडून निराकाराकडे जातो. विश्व आणि विश्वनिर्माता हे एकच आहेत यांचे ते द्योतक आहे. शिव आणि शक्ती ही दोन निर्मितीची तत्वे आहेत. सुप्त, अव्यक्त आणि चैतन्यदायी व्यक्त यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे शिवलिंग. शिवलिंग म्हणजे निव्वळ शिव तत्व नाहीतर सर्वोच्च चेतनाशक्तीचे परिपूर्णत्व.
भगवान शिवाचे वाहन,नंदीचे महत्व:
पूर्वीपासून सर्वत्र बैल, नंदी सदाचरणी, धर्माचे प्रतिक म्हणून सुपरिचित आहे. भगवान शिवाचे वाहन नंदी आहे याचा मतितार्थ हाच आहे की, जेंव्हा तुम्ही सदाचरणी, सत्याचरणी असता ती अनंत आणि भोळी भाबडी चेतना आपल्या सोबत असते.
शिव तांडवाचे महत्व:
समस्त ब्रम्हांड हे विशाल चेतनेचे, शिव तत्वाचे नृत्य आहे. त्या विशाल चेतनेच्या नृत्यातून ती लाखो करोडो सजीवांमध्ये प्रकट झाली. हि अनंत निर्मिती म्हणजे शिवाचे तांडवच आहे, हे विश्व शिवाचे स्थानच आहे.
शिवाचे निवास स्थानं:कैलास
शिवाचे निवास स्थान कैलास पर्वत आणि स्मशान आहे.”कैलास“ म्हणजे जिथे निव्वळ उत्सव असतो, आणि “स्मशान“ म्हणजे जिथे रिक्तपणा आहे. दिव्यत्व रिक्तपणा तसेच उत्सव असेल तेथेच पहायला मिळते. रिक्तपणा आणि उत्सव आपल्या प्रत्येकामध्ये आहे.
“ॐ नमः शिवाय “ चे महत्व:
ओम नमः शिवाय अत्यंत परिणामकारक मंत्र आहे. तो तुमच्या अंतर्गत ऊर्जा निर्माण करतो तसेच वातावरण शुद्धीचे कार्य करतो. मंत्रांमध्ये असे ध्वनी असतात जे आपली चेतना ऊर्ध्वगतीला नेतात.
ओम नमः शिवाय हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण “न”, ”म“, ”शि“, “वा“, “य“ हे शब्द पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंच महाभूतांचे प्रतिक आहेत.
ॐ हा या ब्रम्हांडाचा ध्वनी आहे.ॐ म्हणजे शांती आणि प्रेम.
म्हणून जेंव्हा या पंच महाभूतांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद असतो तेथे आनंद, परमानंद असतो.मंत्रांची शक्ती ग्रहांच्या श्रेष्ठ आहे. ग्रहांचे विपरीत परिणाम ॐ नमः शिवायच्या जपाने नष्ट करू शकता.
महाशिवरात्री या दिवशी दोन्ही वेळ उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रत आहे.
महाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.
महाशिवरात्री व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.
हिंदू धर्मातील बहुतेक लोक हे भगवान शिव शंकराची भक्त आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात ” महाशिवरात्रीला “ खूप महत्त्वाचे स्थान आहे.
खरे पाहता प्रत्येक महिन्याचा चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात बारा शिवरात्री येतात.
परंतु या बारा शिवरात्री पैकी फेब्रुवारी -मार्च महिन्यामध्ये येणारे शिवरात्र ही ” महाशिवरात्र “ म्हणून साजरी केली जाते.
महाशिवरात्रीला अध्यात्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धा ची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक
होण्याची शक्यता असते.
महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्यामुळे महाशिवरात्रि रात्री सर्वजण जागरण करून महाशिवरात्रीच्या सण साजरा करतात.नैसर्गिक ऊर्जेच्या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर उत्सव करून सगळेजण जागे राहतात, आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून रात्रभर न झोपता जागे राहतात.
खरे पाहता महाशिवरात्रि म्हणजे काय
” महाशिवरात्र “ म्हणजेच, ” शिवची महान अशी रात्र. ” महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा एक पवित्र सण आहे संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने आणि भक्तीभावाने हा साजरा केला जातो.
या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिव नामावली उच्चारली जाते. तसेच महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल शंकराला वाहिले जाते. त्यादिवशी उपोषण व जागरण करावे . ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान १०८ जप करावा व शिवाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत .. ओम नमः शिवाय । शुभम भवतु ।।