Saturday, March 29, 2025

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

 

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

श्री स्वामी प्रकट दिन
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले. 
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद 
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
"अशक्य हि सारे करितो शक्य" एक क्षणात 
"भिऊ नकोस मी पाठीशी आहे" असे सदा सांगे आम्हास.
स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत.

स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या आनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आशी.

शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावचा गाव होता. त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती, तर तो विजयसिंग खुप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंग ला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया. आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या हि दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले ”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं” बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती. आणि ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्याठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले.

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन               श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला. आता शंका हि उपस्थित होईल कि हि गोष्ट कशी काय कळली. पण यागोष्टीचा उलगडा आस झाला. कोकणातील हरिभाऊ (स्वमिसुत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यला होते. आणि एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले कि आजपासून तू माझा सुत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरीभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि “रडतोयस  काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू.” आणि ज्यावेळी हरीभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वमिसुतांचाच पूर्व अवतार होता.आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आणि या गोष्टीला स्वतः स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे.

स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. ज्यावेळी स्वमिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वमिसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उततर आसे होते”माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.” नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वमिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते तर ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामिनी त्यांना आज्ञा केली कि माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरु केल. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता, तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरु होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामिनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वैगेरे वाहून सर्व दैवतानि त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयाती पर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच आर्थ स्वामिनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्ष रित्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही हि स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगर च्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्द्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वताचे खरे नाव, ओळख लपवून चंचलभारती, दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते.

स्वामी समर्थ प्रकटदिन आपल्या सर्वांसाठी खुप मोठी महापर्वणी आजच्याच दिवशी हा ‘अक्कलकोटस्थ परब्रह्म’ आपल्या सर्वांच्या पुर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अंनत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या ऱ्हदयात ममता निर्माण करणारा, तेजरुपी मायासागराचा धनी असलेला, आपला ‘श्री स्वामी देव’ याच चैत्र शुध्द द्वितिया शके १०७१ (इ. स. ११४९) मध्ये छेली या खेडे गावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इ. स. ११४९ ते १८७८ हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु ११४९ पुर्वी आणि १८७८ नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठिण कार्य आहे. तरी सुध्दा दया सागर स्वामींनाच शरण जावून आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सुत महाराजांच्या पुढिल अभंगातून पाहू या,

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनश्री स्वामी समर्थ प्रकटदिन

दत्त माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥०१॥
छेलीखेड्या ग्रामामाजीं । झाला अवतार हा सहजी ॥०२॥
गोटी खेळण्याचा रंग । तेव्हां मनी झालो दंग ॥०३॥
तेथे होता विजयसिंग । आतां येथे करू रंग ॥०४॥
गजानन आनंदला । पाहुनियां त्या खेळाला ॥०५॥
नाचताती चहू कोणीं । नुपुरें वाजतीं चरणीं ॥०६॥
गोटी गोटीचा हा वाद । हरीचा हसण्याचा छंद ॥०७॥
हंसू लागे वक्रतुण्ड । हलवूनी प्रीती सोंड ॥०८॥
विष्णु स्तंभी प्रकटलें । दत्त गोटी फोडूनि आले ॥०९॥
माझ्या स्वामीचीं करणीं । कंप होतसे धरणीं ॥१०॥
गोटी विजयसिंग मारी । दुसरी गोटी होय करीं ॥११॥
गोटींचा हो पडला ढिग । चकित झाला विजयसिंग ॥१२॥
गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं ती शोभली ॥१३॥
गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा हा खेळ ॥१४॥
एक प्रहर खेळ केला । समर्थ दाविली ती लीला ॥१५॥
स्वामीसुत म्हणे झाला । अवतार भक्तांच्या काजाला ॥१६॥

आपल्या या वरील अभंगात स्वामीसुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे. स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. त्यापैकी हा एक आहे. ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत. या अभंगाच्या सुरूवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे, तो स्वामी महाराजांसाठी वापरला आहे. तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडूनि आले । हा उच्चार केला आहे.

स्वामीसुत म्हणतात, माझा स्वामी जो अवतरला आहे, तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव ! भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे, हेच भंगवतांचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी तो आपले नाव, रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण या वेळी परब्रह्माने स्वत:च येणे केले आहे. त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा ईतर कोणत्याही देवतेला पाठविले नाही. तर प्रत्यक्ष पुर्ण परब्रह्म स्वत:च यावेळी आपल्या मुळ रुपात अवतीर्ण झाला. असे स्वामीसुत सांगतात. ही घटना कुरूक्षेत्रा (हस्तीनापूर) जवळील छेली या खेडी गावी घडली. जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्या मागचा उद्देश्य स्पष्ट दिसून येतो की, हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूती पिडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच  धरणी दुंभगून ०८ वर्षाची बालक मुर्ती प्रकट झाली.

परब्रह्म ०८ वर्षाच्या बालक स्वरुपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात, की हस्तीनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत होता. ‘विजयसिंगे ही गोटी वटवृक्षछायेस गोमटी। भगवंत मानोनिया जगजेठी । मांडोनिया खेळतसे । नाव घेऊनि भगवंताचे गोटी आहे कौतूक त्याचे ॥ असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा ! एकटाच बोले आपसांत । म्हणे देवबापा खेळ वेगी ॥ असे म्हणत तो बालक स्वत:चा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वत:च खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत, हि भावनाच त्याच्यात नसल्यामुळे, तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंत:करण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे, हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवत्स्वरुपात नित्य मग्न असलेल्या आठ वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले.

प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तांसोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते. या खेळात काही वेळाने अन्य दोन बालक ही सामिल झाले. आता स्वामी महाराज, विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे चौघे मिळून हा गोट्याचा खेळ खेळत होते. (यातील हरिसिंग हाच पुढिल जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामीसुत होऊन आपल्या मागिल जन्मातील आठवणी कथन करू लागला.) खेळताना स्वामी महाराज खुपच हट्ट करत होते. आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भूत लिलेचे कौतूक करीत मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला. बाहेर येऊन तो ही लाला मौजेने पाहत उभा राहीला. सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले. स्वामी महाराज ही मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदगदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते.

मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशांचा हास्य आवाज ऐकून ईतर देवतांना ही याबद्दल कुतूहल निर्माण झाले. आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी लागल्या होत्या. तेवढ्यात मुलांच्या बाजूलाच असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले, तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटी मधून श्री दत्तात्रेय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्यांने धरणी माता कंप पावू लागली. तशा मग ईतर देवता ही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्प वृष्टि करत होते. यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करत होते. हे होत असतानाच विजयसिंग स्वामींची एक एक गोटी जिंकत होता, लगेच स्वामींच्या हातात एक एक नवी गोटी येत होती. थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खुप मोठा ढिग जमा झाला, हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली. आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्याच गोट्या दिसू लागल्या. हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण एक प्रहर भर हा खेळ स्वामींनी खेळून एक आगळी वेगळी लीला सर्वांना दाखविली. सर्वत्र मीच आहे. मी सर्वव्याप्त आहे. हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला. प्रकट होताच गोट्याचा खेळ खेळून प्ररब्रह्माने आपण ब्रह्मांडनायक असून या गोट्यासारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्यांशी हवे तसे खेळतो. माझ्या ईच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही. हाच बहूमोल संदेश दिला आहे.

स्वामींच्या हातातील गोटी विषयी असाच एक प्रसंग शुरसेनानी २०१५ मध्ये आला आहे. तो पुढील प्रमाणे, श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, ‘असे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे?’ असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहजलीलेने श्री स्वामीं देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. तेव्हा ती परब्रह्ममूर्ती पुढे म्हणाली, ‘आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले.’ हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपुज्य मामासाहेब देशपांडे यांच्या मधील असून, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे या संस्थेचे अध्वर्यु शिरीषदादा कवडे यांच्या बरोबरील चर्चेवेळी समजला. (संदर्भ: शुरसेनानी २०१५ दिवाळी अंक)

स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली. यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेह याची जाणीव होती. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यानांही परमेश्वर भेटला मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दिर्घ स्वरुपाची साधना करावी लागली होती. येथे मात्र विजयसिंगाला अगदि सहजतेने आणि ते ही स्वत:प्रमाणेच बालक स्वरुपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्याच्यांशी खेळला. यावरून परब्रह्माचे अथांग करूणा स्वरूप प्रकट होते. त्याची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपण ही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला ही स्वामी महाराज आपलेसे करतील. हीच शिकवण देणारा आजचा अभंग आहे.

अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र पाहण्याचा प्रयत्न करू या!

स्वामी महाराजांनी या मुलांचा उध्दार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उध्दार केला. येथिल ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमणाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळ वासिंयाना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेली वासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या नाना लीला, असंख्य खेळ याचे साक्षिदार होण्याचे महत्भाग मिळाल्यामुळे छेली वासिय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशितील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावचे दैवत ‘श्री स्वामी देव’ मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले. तेव्हा मग येथिल ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्य बोध करून स्वामी महाराज आपल्या पुढिल भ्रमंतीला निघाले. तेव्हा छेली ग्रामस्थांच्या दु:खाला पार उरला नाही. जी अवस्था श्री कृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ वासियांची झाली होती, त्याहून ही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते. त्यामुळे जड अंत:करणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दु:खात आकंठ बुडाले. इकडे स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जावून तेथिल पुरोहितांमधील हरीहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत. याचा दाखला देऊन तेथिल काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्र प्रयाग, देवप्रयागला गेले. त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला. त्यानंतर मग ब्रदिनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथिल पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरणार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैद्राबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथेच स्थिर झाले. स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथिल चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही. पण *स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबधी व चरित्रासंबंधी खात्रीशिर आणि सुत्रबध्द माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मत मतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास २३ वर्षे वास्तव्य होते. आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार यागोष्टी पाहता, स्वामी महाराज हे पुर्ण परब्रह्म स्वरुप होते. या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे. आपण ही स्वामींच्या स्वरुपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग ०१ मध्ये सविस्तर माहिती घेतल्यामुळे ईतर मत मतांतरे यात न गुतंता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पुर्ण परब्रह्म स्वरुपावर दृढ श्रध्दा आणि निष्ठा ठेवून, आपली पुढिल आध्यात्मिक वाटचाल करावी. स्वामी महाराजांना पुर्णपणे शरण जावे.

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल: इ. स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातीलअक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)संप्रदायदत्त संप्रदायभाषामराठीकार्यमहाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसारप्रसिद्ध वचन'भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे'संबंधित तीर्थक्षेत्रेअक्कलकोट, गाणगापूर

जीवन

विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे.[१] त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले.

स्वामी समर्थ प्रकट दिन

इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला.तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.

वासुदेव बळवंत फडके

इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.

महती

सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरू का ध्यास, और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज! तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

प्रकट पूर्वपिठिका

इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०)श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले.

दीक्षा

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

अक्कलकोट प्रवेश

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.

अवतार कार्य समाप्ती

इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी त्यांंच्या भक्तांंची श्रद्धा व धारणा आहे.

स्वामी समर्थ पुण्यतिथी

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले.

पूर्णब्रह्मस्वरुप अवतार

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे.

श्री स्वामी जयघोष

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे

“स्वामी समर्थ तारक मंत्र”

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||

कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पोथी

“श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पोथी” या ग्रंथरूपाने श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताचा घट समस्त भक्तांसाठी उपलब्ध करून दिला आहे. श्री स्वामीस्वरूप सदगुरू प. पू. श्री शरदजी ब. लाठकर काका यांच्या अमृतवाणीद्वारे जी प्रबोधने आविष्कृत झाली आहेत त्याचे ओवीबद्ध रुपांतर म्हणजेच ही पोथी होय. श्री स्वामी समर्थांनी कृपावंत होऊन हा ज्ञानामृताच कलश भक्तांसमोर प्रस्तुत केला आहे. या दयाघन कृपावंत सदगुरूंचे ऋण फिटणे केवळ अशक्य! सदगुरूंनी आम्हांस सदैव त्यांच्या कृपा छत्राखाली असु द्यावे ही स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.

श्री स्वामी समर्थांच्या चरित्रावर बहुविधी ग्रंथ आज उपलब्ध आहेत. श्री स्वामींचे निस्सीम भक्त श्री वामनरावजी वैद्य वांबोरीकर लिखित “श्रीगुरूलीलामृत” ग्रंथासह इतर सर्वग्रंथामध्ये शके १६८० ते १८०० या काळातील वर्णन केले आहे. परंतू श्री स्वामींच्या प्रकटीकरणाचा वृत्तांत ध्यानी घेतल्यास असे लक्षात येते की शके १०७१ मध्ये स्वामींचे अवतरण छेले खेडेग्रामी झाले आहे. या संबंधीची कथा अशी आहे की नगरचे स्वामीभक्त पिंगळा ज्योतिषी श्री. नाना रेखी यांनी स्वामींच्या आज्ञेवरून त्यांची जन्मकुंडली मांडली. त्याप्रमाणे शके १०७१ मध्ये छेले खेडेग्रामी धरणी दुभंग होऊन सप्तवर्षीय बालकाचे अवतरण झाले. या कुंडलीस श्री स्वामींनी अनुमोदन दिले व आशीर्वादार्थ श्री. नाना रेखी यांच्या तळहातावर आपले आत्मलिंग प्रदान केले. ते तथ्य लक्षात घेता शके १०७१ ते १८०० पर्यंतचा ७२९ वर्षांचा प्रदीर्घ काळात एकाच मानवी देहातून कार्य घडणे आपल्या तर्काच्या पलीकडे आहे. स्वामीस्वरूप प. पू. श्री शरदजी लाठकर काका यांच्या प्रबोधनातून याचा खुलासा झाला आहे की, स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे अजन्मा अमर तत्वाचे म्हणजेच परब्रह्म परमेश्वराच्या लीला विग्रहाचे वर्णन होय. शके १०७१ ते १२४२ या दरम्यानच्या १७१ वर्षांच्या कालावधीतील स्वामी लीलांचे वर्णन प्रस्तुत पोथीमध्ये आहे. हा कथाभाग आजपर्यंत अज्ञात होता परंतु भक्तांच्या महद भाग्यवशे दिव्य प्रबोधनांच्या निमित्ताने हे ज्ञानामृत स्वामीभक्तांपर्यंत पोथीच्या स्वरूपात पोचले आहे. ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. प्रस्तुत प्रबोधनांतील मजकूर ओवीबद्ध करून भक्तांना उपलब्ध करून देण्याचे श्रेय पुणे येथील स्वामीभक्त डॉ. श्री. माधवराव चिंतामणी दिक्षित (एम. कॉम. पिएच. डी.) यांचे आहे.

जो भक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने या पोथीचे नित्य वाचन व सप्ताह पारायण करील त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित लाभेल हे सदगुरू श्री स्वामी समर्थांचे अभिवचन आहे, याचे निरंतर स्मरण ठेवावे. प्रस्तुत पारायण पोथीचा रोज एक अध्याय वाचावा तसेच स्वामी प्रकटदिन सप्ताहात अवश्य पारायण करावे.प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती कथा समस्त स्वामीभक्तांपुढे मांडणे अगत्याचे आहे. प्रत्येक मानवाने सदगुरू मुखातून निजज्ञान प्राप्त करावे व मानवजन्म सार्थकी लावावा यासाठी कृपासागर श्री स्वामी समर्थ सदगुरू या कलियुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य निरंतर करीत आहेत व “हम गया नही जिंदा है” याची यथार्थता सिद्ध करीत आहेत. स्वामिकृपांकित स्वामीस्वरूप प. पू. श्री लाठकर काका यांच्याद्वारे नेमके हेच कार्य गत काही वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. नित्य नेमाने आसनस्थ झाल्यावर दररोज संध्याकाळी विशिष्ट कालावधीमध्ये प. पू. श्री लाठकर काकांच्या दिव्य वाणीद्वारे श्री स्वामी संचार प्रबोधने प्रस्तुत होत असतात. ही प्रबोधने श्रवण करताना स्वामींच्या आविष्काराचा अनुभव सर्व सश्रद्ध भक्तांना येतो.प्रस्तुत प्रबोधने ही मानवनिर्मित नसून सदगुरू तत्वाने ओतप्रोत भरलेल्या व सदगुरू तत्वाशी एकस्वरूप पावलेल्या मानवी देहाच्या माध्यमातून प्रकट झालेली असल्याने त्या दिव्य वाणीद्वारे श्री स्वामी समर्थांच्या आविष्काराचा प्रत्यय येत असतो.ज्या देहात श्री स्वामी समर्थांचा आविष्कार होतो, तो देह त्या गुरुतत्वाशी एकरूप झालेला असतो व त्यांच्या वाणीद्वारे ज्ञानगंगेचा दिव्य प्रवाह, भक्तांच्या कल्याणार्थ वाहू लागतो.

सप्ताह पारायण विधी

पारायण प्रारंभ करण्यापूर्वी रोज प्रातःकाळी निश्चित वेळेला उठून स्नानसंध्या झाल्यावर “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” या सिद्ध मंत्राची एक माळ करावी व ध्यानधारणा करावी, वाचनास आरंभ करण्यापूर्वी कुलदैवत, माता-पिता व गुरु यांना वंदन करून आशीर्वाद मागावेत. नंतर संकल्प करून श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची व पोथीची पूजा करावी. देवासमोर सात दिवस अखंड दीप ठेवणे. पोथीचे संपूर्ण वाचन होईपर्यंत पूर्ण सप्ताह दीप कायम ठेवावा. शक्यतो देवघरातच आसन करावे तसे शक्य नसेल तर घरात पावित्र्य राहील अशा ठिकाणी आसन मांडावे. नित्य सोवळ्यात राहून पाठ करावा. रोजचे वाचन संपे पर्यंत मधेच आसन सोडू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचन करावे. श्रद्धा भक्ती युक्त अंतःकरणाने प्रेमपूर्वक एकाग्र चित्ताने सावकाश वाचन करावे. त्यामधील तत्वरहस्य जाणून घ्यावे व बोध घ्यावा हे महत्वाचे आहे. रोजचे पाठ वाचून झाल्यावरही उत्तरांग पूजन करणे. दैनंदिन रोजचे पाठ झाल्यावर दिवसभर “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” या सिद्ध मंत्राने स्वामींचे अनुसंधान करावे. मानसिक व शारीरिक ब्रह्मचर्य पाळावे. दैनंदिन जीवनात सदाचार ठेवावा. पारायणाच्या सात दिवसांत पचनास हलके भोजन घ्यावे. भोजनात कांदा, लसूण वर्ज्य करावा. समारोपाच्या दिवशी पोथीचा पाठ पूर्ण झाल्यावर महानैवेद्य दाखवून आरती करावी. सांगतेप्रीत्यर्थ यथाशक्ती ब्राह्मण-सुवासिनी संतर्पण करणे.

💐💐 श्री स्वामी समर्थ 💐💐

Friday, March 28, 2025

गुढीपाडवा ....नवीन संवत्सर प्रारंभ

 

गुढीपाडवा ....नवीन संवत्सर प्रारंभ

विश्वावसु नाम संवत्सर

चैत्र शु.१  दिनांक ३०मार्च २०२५

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध १ म्हणजेच प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन शक १९४७ विश्वावसु नाम संवत्सर  सुरू होत आहे संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. 

नूतन संवत्सर प्रारंभ या दिवसापासून मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील साडे तीन मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. गुढी पाडव्यापासून       विश्वावसु नाम संवत्सर   शालिवाहन शक१९४७ सुरू होत आहे यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून ती ३० मार्च दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल.याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र प्रारंभ होतो 

पहाटे सुर्योदयापुर्वी  उठून सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करावे.

अभ्यंगस्नानानंतर स्वच्छ वस्त्र परीधान करून अंगणात श्री लक्ष्मी पद्म , श्री गायत्री पद्मनवग्रहांची रांगोळी काढून प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे व गुढी उभारावी.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात.   

आता गुढी कशी उभारावी  याचा विचार करूया ...

सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून, गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढा. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुनिंबाचा पाला ,चाफ्याच्या फुलाची माळ, साखरेचे कंकण, गाठीची माळ या गोष्टी एक सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे  झाकावे.

ही गुढी आपल्या  गृहप्रवेशासमोर (जवळ) उभी करावी व ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पानावर गहू ठेवावे. रांगोळी काढावी.  दाराला आंब्याचे पानांचे तोरण बांधावे. पुढील ध्यानमंत्र गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा.

ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे ||

प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू||

अर्थ..... ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे, ही प्रार्थना  हा मंत्र म्हणून झाल्यानंतर

"ॐ ब्रह्मध्वजाय नमः |"

या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभी करावी.

 घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करावे. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचावे.

या दिवशी कडुनिंबाचा पाला फुले, हिंग, जिरे, मीरे ,ओवा, गुळ यांचे मिश्रण करून घ्यावे व ते मिश्रण घरातील सर्वांना द्यावे. कडुनिंब हे अमृता पासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जात असले तरी त्याचे नित्य अनाशा पोटी सेवन केल्यास शरीर सुदृढ निरोगी राहते. अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो.

सर्व शुभकार्याचा मंगलमूहुर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा,  फक्त विवाह व उपनयन (मुंज) यास हा मुहूर्त नाही. तसेच चैत्र महिन्यात वास्तू शांतीही करू नये असे शास्त्र सांगते .

 चैत्र नवरात्र गुढी पाडवा पासून श्रीराम नवमीपर्यंत श्री राम रक्षा पठण करावी.


गुढीपाडवा वर्षारंभ कां ?

१ ) हिंदू  वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !व आपण तिथी प्रमाण मानतो  त्यामुळे हिंदू धर्मात चैत्र हा प्रथम महिना असलेने वर्षारंभ मानला गेला आहे .

२) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !तिथी अनादी काळ दर्शवते  सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे ! कालक्रमण हे ब्रह्मदेवा पासून आहे !

३) आता आपण वराह कल्पात आहोत ! या कल्पातील ७ व्या मन्वंतरात आहोत ! ७ व्या मन्वंतरातील २८ व्या युगात आहोत ! २८ व्या युगातील कलियुगात आहोत !कलियुगाच्या तिसऱ्या शालिवाहन शकात आहोत !

 शके १९४६ वर्ष दि. २९.०३.२०२५ ला संपणार आहे !या गुढीपाडव्याला ३० मार्च २०२५ ला शके १९४७   विश्वावसु नाम संवत्सर  वर्ष चालू होणार आहे !

आता बरेच लोक विचारतात गुढीवर तांब्या हा उपडा का ठेवतात ते आता पाहू ....

गुढी वरील तांब्या उपडा का ठेवतात?

                 तांब्याची तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे ताब्यात असलेली कडुलिंबाची पाने,रेशमी वस्त्र हे शुभ लहरींनी भारित बनते.जमिनीच्या आकर्षणशक्ती मुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवरील सूक्ष्म अच्छादन बनण्यास सहाय्य होते. तांब्याची दिशा तिच्या सुलट ठेवली तर,संपूर्णत:  ऊर्ध्वदिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनी लगतच्या कनिष्ठ व माध्यमिक स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा उर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा जमिनीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच ऊर्ध्व मंडलाला  मिळण्यास साहाय्य होते.

म्हणून गुढीवरील तांब्या उपडा ठेवतात.

ब्रह्मध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारणे. शास्त्रोक्तरीत्या गुढी उभारण्याची कृती व पूजन विधी ...

💐कृती

सूर्योदयापुर्वीच एका वेळूच्या काठीस तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे , काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत , नंतर काठीच्या टोकाला नवीन वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडूनिंबाचा पाला , चाफ्याच्या फूलांची व साखर गाठीची माळ या जिनसा एका सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढलेला तांब्याचा कलश उपडा झाकावा.ही गुढी आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभी करत पक्की बांधावी.

💐पूजन विधी 

☆ प्रथम हात जोडून ब्रह्मध्वजाचे ध्यान करावे.

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !

प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

ॐ ब्रह्मध्वजाय नमः !

ध्यायम् ध्यायामी !

नमस्काराणि समर्पयामि !!


💐 गुढीवरील तांब्याच्या कलशावर कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकाच्या मधोमध गंध , अक्षता , हळदी , कुंकु वहावे.

ॐ ब्रह्मध्वजाय नमः !

विलेपनार्थे चंदनं समर्पयामि !

अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि !

हरिद्रां कुंकूंमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !!


💐 गुढीस फूलांचा हार घालावा.

ॐ ब्रह्मध्वजाय नमः !

ऋतू कालोद्भव पूष्पमालाणि समर्पयामि !!

💐 गुढीस धूप ओवाळावा.

ॐ ब्रह्मध्वजाय नमः !

धूपं आघ्रापयामि !!

💐 गुढीस दिवा ओवाळावा.

ॐ ब्रह्मध्वजाय नमः !

दिपं दर्शयामि !!

💐 गुढीस मिरे , हिंग , मीठ , ओवा , साखर , कडुनिंबाच्या फूलांसह कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून

या मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा.

ॐ ब्रह्मध्वजाय नमः !

नैवेद्यं समर्पयामि !!

💐 गुढीसमोर जमिनीवर उजव्या हाताच्या

मधल्या दोन बोटांनी पाण्याचा चौकोन करून त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी व तिच्या भोवती उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवावे.

सत्यंत वर्तेन् परि सिंचयामि !

असे म्हणून गायत्री मंत्र म्हणावा व त्यानंतर

ॐ प्राणाय स्वाहा !

ॐ अपानाय स्वाहा !

ॐ व्यानाय स्वाहा !

ॐ उदानाय स्वाहा !

ॐ समानाय स्वाहा !

ॐ ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा !

असे म्हणावे.  यानंतर,

मध्यपाणियं समर्पयामि !

असे म्हणून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.

परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरीलप्रमाणे गायत्री मंत्र , ॐ प्राणाय स्वाहा......इ. मंत्र म्हणावे. 

खालील मंत्र म्हणत तीन पळ्या पाणी ताम्हणात सोडावे.

उत्तरापोशनं समर्पयामि !

हस्त प्रक्षालनं समर्पयामि !

मुख प्रक्षालनं समर्पयामि !


खालील मंत्र म्हणत गुढीस गंध अक्षता हळदी कुंकु वहावे.

करोव्दर्तनार्थे चंदनं हरीद्रा कुंकूमं सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि !


💐 मग हात जोडून पूजेत झालेल्या चूकांबद्दल गुढी देवतेस क्षमा मागावी...,शेवटी हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.

💐अनेन मया यथाज्ञानेन यथामिलित उपचारद्रव्यै कृत पंचोपचार पूजनेन श्री ब्रह्मध्वज देवता प्रीयतां न मम् !!

तिन्हीसांजेपुर्वी आत गोड धोड नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.

💐उगवत्या सूर्याला अर्घ देत नवीन वर्षाचे हसतमुखाने व पवित्र अंतःकरणाने स्वागत करावे...


💐पंचांगस्थ गणपती पूजन :-

घरातील देवपूजेनंतर एका पाटावर लाल कापड अंथरून त्यावर नवीन पंचांग ठेवावे.

" वक्रतुण्ड महाकाय......"

हे ध्यान करून गुढी प्रमाणे पंचांगावरील गणपतींचे 

" ॐ रीध्दी सिध्दी सहित पंचांगस्थ गणपतये नमः ! "

या नाममंत्राने पंचोपचार पूजन करावे.

नैवेद्य गूळ खोबर्याचा दाखवावा.

पूजनानंतर पंचांगातील पहिल्या पानावरील संवत्सर फल वाचावे.

या दिवशी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभा यात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीय तरुण, तरुणी या सणानिमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या  पोशाखामध्ये शोभा यात्रांमध्ये सहभागी होतात. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात, पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.

हा नूतन संवत्सराचा प्रथम दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा करावा.


आपणा सर्वाना हे नूतन संवत्सर आनंद सुख व समृद्धीचे जाओ हीच दत्तमहाराज यांचे चरणी प्रार्थना.  

💐 ||शुभम भवतु || 💐

Thursday, March 27, 2025

शनिपालट व साडेसाती

 

ओम श्री शनेश्वराय नमः
ओम श्री शनेश्वराय नमः
   

🌹शनिपालट व साडेसाती🌹

शनिपालट  केव्हा  ?साडेसाती म्हणजे काय ?..साडेसातीत काय काळजी घ्यावी. ?  

 फाल्गुन कृष्ण.आमावस्या शनिवार २९ मार्च २०२५ रात्री  ०९:४२ मी  शनी मीन राशीत प्रवेश करीत आहेत  त्याचा पुण्यकाल सायंकाळी  ०६:४८  ते रात्री १२:३६ पर्यंत आहे.

 म्हणजे मकर रास साडेसातीतून मुक्त होत आहे व  मेष राशीला साडेसाती सुरवात होईल. शनी ग्रहाचे चाली नुसार 6 महिने आधीपासून त्यांची छाया पुढच्या ग्रहावर पडते.त्यामुळे २९ सप्टेंबर २०२४ पासून साडेसाती असलेल्या जातकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

हा मीन राशीचा शनि मीनेस १ला, कुंभेस २रा, मकरेस ३रा, धनूस ४था, वृश्चिकेस ५वा, तुळेस ६वा, कन्येस ७वा, सिंहेस ८वा, कर्केस ९वा, मिथूनेस १०वा, वृषभेस ११वा आणि मेषेस १२वा याप्रमाणे आहे.

 मकर राशीची साडेसाती संपत असून कुंभ-मीन- मेष या राशींना साडेसाती आहे.

जन्म राशी = पाद      =    फल

वृषभ     =    सुवर्ण    =    चिंता

तुला     =    सुवर्ण    =    चिंता

मीन      =     सुवर्ण   =   चिंता

कर्क     =    रौप्य      =   शुभ

वृश्चिक  =   रौप्य      =.  शुभ

कुंभ      =   रौप्य       =.   शुभ

मिथुन  =   ताम्र        =श्रीप्राप्ती

कन्या  =   ताम्र.       =श्रीप्राप्ती

मकर   =   ताम्र        =श्रीप्राप्ती

मेष      =   लोह       =    कष्ट

सिंह    =  लोह       =    कष्ट

धनु       =   लोह       =     कष्ट

विशेषतः पुण्यकालात जप, दान, पूजा करणे पुण्यकारक व पिडापारीहारक आहे. पिडापरिहारक शनीची दाने := सुवर्ण, लोखंड, नीलमणी, उडीद, म्हैस, तेल, काळे घोंगडे, काळी अगर निळी फुले.

जपसंख्या : २३०००, प्रतिमा : लोखंडाची

 शनीचा पौराणिक मंत्र : 

नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम|

 छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम||


अशुभ स्थाने :> स्वजन्मराशीपासुन १,२,४,५,७,८,९,१२,या स्थानी असलेला शनि पिडाकारक आहे.


शनीच्या प्रतिमेच्या पूजनाचा व दानाचा संकल्प -

मम जन्मराशे: सकाशात अनिष्ट स्थानस्थितशने: पिडापरीहारार्थ एकादशस्थानवत शुभफल प्राप्त्यर्थ लोहप्रतिमाया शानैश्चरपूजनं तत्प्रितीकरम (अमुक) दानंम करिष्ये||

|| ध्यान || 

आहो सौराष्ट्र संजात छायापुत्र चतुर्भुज |

कृष्णवर्णार्कगोत्रीय बाणहस्त धनुर्धर |

त्रीशुलिश्च समागच्छ वरदो गृध्रवाहन| प्रजापतेतू संपूज्य: सरोजे पश्चिमेदले|


दानाचा श्लोक:> शनैश्चरप्रीतीकरं  दानं पीडा निवारकम! सर्वांपत्ती विनाशायं द्विजाग्र्याय ददाम्यहम!!


शनी स्तोत्र

 कोणस्थ: पिंगलो बभ्रु: कृष्णौ रौद्रोंतको यम:| सौरी: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत||

 एतानि दशनामानी प्रतरुत्थाय य: पठेत! शनैश्चरकृता पिडा न कदाचित भविष्यती!!

पीप्पलाद उवाच

नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोस्तुते| नमस्ते बभ्रुरुपाय कृष्णायच नमोस्तुते!!१!!

नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकायच || नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरयेविभो !!२!!

नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते ||प्रसादं कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च!!३!!


वरील शनिस्तोत्र ज्यांना साडेसाती आहे ज्यांना शनि अनिष्ट आहे त्यांनी दररोज प्रातःकाळी म्हणावे

 ज्यांना साडेसाती आहे त्यांनी शनिस्तोत्र रोज म्हणावे. शनीच्या उद्देशाने जप, दान, पूजा ही आवश्य करावी. पिडा परिहारार्थ शनिवारी अभ्यंगस्नान करून नित्य शनिस्तोत्र पठण करावे. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन उडीद व मीठ शनीस अर्पण करावे. तैलाभिषेक करावा. काळी फुले वाहिल्याने पीडेचा परिहार होईल. शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे. निदान एकभुक्त रहावे. निलमान्याची अंगठी धारण करावी.


साडेसाती का येते  ?

साडेसाती ही आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते, जेणेकरून आपण त्याच किंवा त्या प्रकारच्या चुका पुन्हा करू नयेत. मुख्यत्वेकरून माणसाचा अहंकार शनिमहाराज तोडतात. खोटे बोलणे वागणे हे शनी महाराजांना बिलकुल पसंत नाही .त्याचबरोबर आपल्या जीवनाला साडेसाती एक चांगली दिशा ही देते. नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या सम्पूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते

शनी ना ही कुछ भुलते है,

और ना ही क्षमा करते है

वो तो कर्मफलदाता तथा दंडनायक है, सिर्फ सच्चा न्याय करते है।


खरे शनीची साडेसाती... धसका ? कि दिलासा ?

आपल्या संपूर्ण आयुष्यात कुणाला घाबरत असेल तर “शनी महाराजांना”. शनीची साडेसाती आली आता माझे काही खरे नाही... अश्या प्रकारची विधाने आपण ऐकत असतो. पण खरच त्यात घाबरण्यासारखे काही आहे का ? चला आज ह्या समज गैरसमजापलीकडे असलेल्या ह्या ग्रहाची खरी ओळख करून घेवूया आणि त्यांच्यापुढे नतमस्तकही होवूया . शनी म्हणजे त्रास , वेदना , मानसिक यातना ,क्लेश याची जणू शृंखलाच अशीच आपली समजूत आहे. अमुक एका माणसाचे साडेसातीत हे हे असे झाले म्हणजे माझेही तसेच होणार हा समज सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका.

प्रत्येकाच आयुष्य वेगळ आहे आणि प्रत्येकाच्या पत्रिकेतील शनीची स्थितीही वेगळीच असणार आहे. शनीचा धसका घेण्याऐवजी जर त्याला निट समजून घेतलत तर त्याबद्दल असणारे गैरसमज तर दूर होतीलच उलट तुमची साडेसाती सुखकर होण्यास मदतच होईल. मला सांगा आयुष्यात काय फक्त साडेसातीच्या काळातच वाईट घटना घडतात का ? नाही इतरही वेळी घडतात. खर तर साडेसाती हि मानूच नका. शनी हा तुमचा शत्रू नाही तर तो तुमचा मित्र आहे. शनी ज्याला कळला त्याला सगळेच सोपे होवून जाईल. अहो आपला एक संपूर्ण दिवस सुद्धा चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो मग संपूर्ण साडेसात वर्ष वाईटच जातील हे असे का समजायचे , विचार करा.

शनीची साडेसाती हि साडेसात वर्षाची असते हे आपण सर्वांनाच माहित आहे. एखाद्याची रास “सिंह “ असेल तर शनी कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा ह्या सिंह राशीला साडेसाती सुरु झाली असे समजावे आणि जेव्हा शनी तुला राशीत प्रवेश करेल तेव्हा सिंह राशीची साडेसाती संपली असे समजायचे . याचाच अर्थ कर्केत २|| वर्षे ,सिंहेत २|| वर्षे आणि कन्येत २|| वर्षे असा साडेसात वर्षाचा काळ म्हणजे सिंहराशीची साडेसाती . आपली जी कुठली रास असेल त्या राशीच्या आधीच्या राशीच शनी आला कि आपल्याला साडेसाती सुरु आणि आपल्या पुढील राशीतून शनी जेव्हा पुढे जाईल तेव्हा आपली साडेसाती संपली अस समजायचे. सध्या  मेष, मिन आणि मकर राशिना साडेसाती असेल .

शनी हा वैराग्याचा , उदासीनतेचा कारक आहे. आळशी, अप्रामाणिक लोक शनीला अजिबात नाही आवडत. कष्ट करणारा समाज शनीला आवडतो. असेल हरी तर देयील खाटल्यावरी म्हणणार्यांना शनी झोडपून काढेल. शनीला सर्वात न आवडणारा गुण म्हणजे अहंकार , मिजास ज्या माणसाना अतिशय मिजास आहे तसेच जी माणसे अत्यंत माजोरीपणाने, अहंकाराने मी म्हणजे कोण ? अश्या थाटात वागत असतात त्यांना शनीची साडेसाती कशी गेली विचारा.

साडेसातीत माणसाची सगळी मिजास उतरते, मी असा आणि मी तसा म्हणणाऱ्यांची शनी झोप उडवतो. शनी साडेसातीत मनुष्याला सगळ्या मोहापासून दूर करतो, अंतर्मुख होण्यास शिकवतो. साडेसाती मध्ये लग्न होणे, घर होणे , परदेशगमन , चांगली नोकरी , प्रमोशन मिळणे अश्या चांगल्या घटनाही घडतात. साडेसाती दर ३० वर्षांनी येते कारण एका राशीत शनी २|| वर्षे वास्तव्य करतो  त्यामुळे पूर्ण आयुष्यात साडेसाती कमीतकमी २ वेळा तरी येते असे म्हणायला हरकत नाही. चांगल्या घटनांचे श्रेय शनी महाराजांना न देता फक्त विपरीत घटनांचे खापर मात्र शनी महाराजांवर फोडणे हा मनुष्य स्वभावाच आहे. परंतु हि पळवाट योग्य नाही. साडेसातीत आपली वाईट कर्मे एकामागून एक आपल्या समोर हात जोडून उभी राहतात आणि त्याबद्दल शासन ठोठावण्याचे काम शनी महाराज निरपेक्षपणे करत असतात इतकच. तुमच्या चांगल्या कार्माचही फळ ते नक्कीच देतात.

इतर कुठल्याही देवाची पूजा करत नसलात तरी शनी महाराजांचे नित्य स्मरण तुमचे जीवन आनंदी करेल यात शंकाच नाही.

साडेसातीत खोटे आरोप येणे, तुरुंगवास, अप्तेष्टांबरोबर कलह , कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणे, घरातील इस्टेट जमिनी वरून वाद , व्यवसायाची हानी होणे , अपकीर्ती , दीर्घ आजारपण, आपत्ती, धननाश होणे, अपमानास्पद घटना घडणे , मनस्ताप , आपल्याबद्दल समाजात गैरसमज पसरणे यासारख्या गोष्टी घडून येतात.

कुटुंबात एकाच वेळी एकापेक्षा जास्ती व्यक्तींना साडेसाती येणे हे चांगले नाही. ज्यांच्या पत्रिकेत चंद्र ६/८/१२ या स्थानात असतो त्यांना तसेच ज्यांना शनी किंवा राहूची महादशा, अंतरदशा चालू आहे अश्या लोकांना साडेसाती संघर्षमय जावू शकेल. चंद्र-शनी युती हि पत्रिकेत चांगली नाहीच.*


साडेसातीत काय करावे ?

सगळ्यात उत्तम उपाय हा कि गप्प बसावे. आवश्यक तेव्हडे आणि कमीतकमी बोलावे, कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा ,शनी हा वृद्ध ग्रह आहे त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये , कुणाला जामीन राहू नये, सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी , असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेवू नयेत .आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेवावे.*

बुधवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जावून दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे. मंदिरात दर्शन घेवून तसेच पुढे बाजारात किंवा तसेच पुढे  इतरत्र जावू नये. जमल्यास या काळात शनिशिंगणापूर इथे जावून शनी महाराजांचे दर्शन घेवून तैलाभिषेक करावा. एक लक्ष्यात ठेवा आपण करत असलेली कुठलीही साधना किंवा उपाय याचा उहापोह किंवा त्याची कुठेही चर्चा करू नये. कारण त्याचे फळ कमी होते, मी १००००  जप केला हे सांगणे म्हणजेही एक प्रकारचा अहंकाराच आहे. हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनिवारी शनीमहात्म् हा पवित्र ग्रंथ वाचवा. वाचण्यापूर्वी त्याची पूजा करावी. साडेसातीचा फारच त्रास होत असेल तर एका मातीच्या भांड्यात गोडेतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा निट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरातील समई मध्ये नेवून ओतावे. लक्ष्यात असुदे कि हे तेल जळले पाहिजे  हे तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवयाचे नाही आहे. हा उपाय घरातील पुरुषांनी करावा. असे ३ शनिवार करावे म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल . सर्वात महत्वाचे म्हणजे माजोरीपणा , अहंकार जर सोडला तर ५० % काम फत्ते तिथेच झाले असे समजावे कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शानि महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा.दर शनिवारी शनी महात्म्य म्हणून छोटीशी पोथी मिळते वाचण्यास फक्त 15 मिनिटे लागतात ती अवश्य वाचावी

शनी आपल्या आयुष्याचा वाटाड्या आहे हे विसरू नका.

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || हा शनीचा जपही जमेल तितका करावा...हे सर्व करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात हे लक्ष्यात ठेवा. आता साडेसाती आली आता आपली  आयुष्यातील ७|| वर्ष वजा करा असा मुर्खा सारखा विचार अजिबात करू नये. शनी हा न्यायी ग्रह आहे हे आधीच सांगितले आहे.

आपल्या कष्टाना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खर सांगू का संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही . शनी ज्याला कळला तो त्याला शत्रू नाही मित्र मानेल आणि आयुष्यभर त्याची पूजा आराधना करेल. खरच शनी हा आपला मित्र आहे साडेसातीचा घसका न घेता त्याचे आनंदाने स्वागत करा , शनी महाराजाना अनन्य भावे शरण जावून आपल्या झालेल्या चुकांचे प्रयश्चीत्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. साडेसातीत मनुष्य घडतो हे लक्ष्यात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला साडेसातीतच समजतो.

चला तर मग आज शनी बद्दलचे सगळे समाज गैरसमज दूर झाले का ? मनातील मरगळ झटकून नवीन उत्चाहाने  कामाला लागूयात.  आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेतहीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

आता जरा चढती साडेसाती मध्यातील साडेसाती व उतरती साडेसाती प्रत्येक राशीला केव्हा ते पाहू ...

मेष रास:- दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक २९ मार्च २०२५  ते ३ जुन २०२७ तसेच २० ऑक्टोबर २०२७ ते २३ फेब्रुवारी २०२८
  • पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक ३ जुन २०२७ ते २० ऑक्टोबर २०२७ तसेच २३ 
  •  २०२८  ते ८ ऑगष्ट २०२९ तसेच ५ ऑक्टोबर २०२९ ते १७ एप्रिल २०३० पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक ८ ऑगष्ट २०२९ ते ५ अॉक्टोबर २०२९ तसेच १७ एप्रिल २०३० ते ३१ मे २०३२ पावेतो.

वृषभ रास:- ३ जुन २०२७  रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक ३ जुन २०२७ ते २० ऑक्टोबर २०२७ तसेच २३ फेब्रुवारी ते २०२८ ते ८ ऑगस्ट २०२९ तसेच ५ ऑक्टोबर २०२९ ते १७ एप्रिल २०३० पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक ८ ऑगस्ट २०२९ ते ५ ऑक्टोबर २०२९ तसेच १७ एप्रिल २०३० ते ३१ मे २०३२ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक ३१ मे २०३२ ते १३ जुलै  २०३४ पावेतो.

मिथुन रास:- ८ ऑगष्ट २०२९  रोजी सुरु होईल व दिनांक २७ ऑगष्ट २०३६ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक ८ ऑगष्ट २०२९ ते ५ ऑक्टोबर २०२९ तसेच १७ एप्रिल २०३० ते ३१ मे २०३२ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक ३१ मे २०३२ ते १३ जुलै २०३४ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक १३ जुलै २०३४ ते २७ ऑगष्ट २०३६ पावेतो.

कर्क रास:- ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक ३१ मे २०३२ ते १३ जुलै २०३४ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक १३ जुलै २०३४ ते २७ ऑगष्ट २०३६ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २७ ऑगष्ट २०३६ ते २२ ऑक्टोबर २०३८. तसेच ५ एप्रिल २०३९ ते १३ जुलै २०३९ पावेतो.

सिंह रास:- १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक १३ जुलै २०३४ ते २७ ऑगष्ट २०३६ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २७ ऑगष्ट २०३६ ते २२ अॉक्टोबर २०३८ तसेच ५ एप्रिल २०३९ ते १३ जुलै २०३९ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २२ ऑक्टोबर २०३८ ते ५ एप्रिल २०३९ पावेतो तसेच १३ जुलै २०३९ ते २८ जानेवारी २०४१ व ६ फेब्रुवारी २०४१ ते २६ सप्टेंबर २०४१ पावेतो.

कन्या रास:- २७ ऑगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० ऑगष्ट २०४४ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक २७ ऑगष्ट २०३६ ते २२ अॉक्टोबर २०३८ तसेच ५ एप्रिल २०३९ ते १३ जुलै २०३९ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २२ ऑक्टोबर २०३८ ते ५ एप्रिल २०३९ तसेच १३ जुलै २०३९ ते २८ जानेवारी २०४१ तसेच ६ फेब्रुवारी २०४१ ते २६ सप्टेंबर २०४१ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २८ जानेवारी २०४१ ते ६ फेब्रुवारी २०४१ तसेच २६ सप्टेंबर २०४१ ते ११ डिसेंबर २०४३ तसेच २३ जुन २०४४ ते ३० ऑगष्ट २०४४ पावेतो.

तुला रास:- २२ ऑक्टोबर २०३८ रोजी सुरु होईल व दिनांक ७ डिसेंबर २०४६ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- २२ ऑक्टोबर २०३८  ते ५ एप्रिल  २०३९ तसेच १३ जुलै २०३९ ते २८ जानेवारी २०४१ पावेतो तसेच ६ फेब्रुवारी २०४१ ते २६ सप्टेबर २०४१ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २८ जानेवारी २०४१ ते ६ फेब्रुवारी २०४१ तसेच २६ सप्टेबर २०४१ ते ११ डिसेंबर २०४३ पावेतो तसेच २३ जुन २०४४ ते ३० ऑगष्ट २०४४ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक ११ डिसेंबर २०४३ ते २३ जुन २०४४ तसेच ३० ऑगष्ट २०४४ ते ७ डिसेंबर २०४६ पावेतो.

वृश्चीक रास:- ५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु होईल व दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक ५ नोव्हेंबर २०११ ते १६ मे २०१२ तसेच ४ ऑगष्ट २०१२ ते २ नोव्हेंबर २०१४ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २ नोव्हेंबर २०१४ ते २६ जानेवारी २०१७ तसेच २१ जुन २०१७ ते २६ ऑक्टोबर २०१७ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २६ जानेवारी २०१७ ते २१ जुन २०१७ पावेतो तसेच २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२० पावेतो.

धनु रास:- २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु होईल व दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक २ नोव्हेंबर २०१४ ते २६ जानेवारी  २०१७ तसेच २१ जुन २०१७ ते २६ ऑक्टोबर २०१७ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २६ जानेवारी  २०१७ ते २१ जुन २०१७ तसेच २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी  २०२० पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २४ जानेवारी  २०२० ते २९ एप्रिल २०२२ तसेच १२ जुलै २०२२ ते १६ जानेवारी २०२३ पावेतो.

मकर रास:- २६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक २६ जानेवारी २०१७ ते २१ जुन २०१७ तसेच २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२० पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २४ जानेवारी २०२० ते २९ एप्रिल २०२२ तसेच १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ तसेच १७ जानेवारी २०२३ ते २९ मार्च २०२५ पावेतो.

कुंभ रास:- २४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक २४ जानेवारी २०२० ते २९ एप्रिल २०२२ तसेच १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ तसेच १७ जानेवारी २०२३ ते २९ मार्च २०२५ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २९ मार्च २०२५ ते ३ जुन २०२७ तसेच २० ऑक्टोबर २०२७ ते २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.

मिन रास: २९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० रोजी संपेल.

  • चढती साडेसाती:- दिनांक २९ एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ तसेच १७ जानेवारी २०२३ ते २९ मार्च २०२५ पावेतो.
  • मध्यातील साडेसाती:- दिनांक २९ मार्च २०२५ पावेतो ते ३ जुन २०२७ तसेच २० ऑक्टोबर २०२७ ते २३ फेब्रुवारी २०२८ पावेतो.
  • उतरती साडेसाती:- दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ ते ८ ऑगष्ट २०२९ तसेच ५ ऑक्टोबर २०२९ ते १७ एप्रिल २०३० पावेतो.


साडे साती म्हणजे काय?

जेव्हा गोचरीचा शनी चंद्रराशीवरून किंवा त्याच्या बाराव्या तसेच दुसऱ्या स्थानांवरुन भ्रमण करतो तेव्हा त्याला साडे साती असे म्हणतात. शनीची साडेसाती एकाच वेळेस तीन राशींमध्ये १) चढती साडेसाती २) मध्यातील साडेसाती ३) उतरती साडेसाती याप्रमाणे लागते ,आणि हा काळ जातकांसाठी त्रासदायक व अनिश्चितेचा ठरतो .

चढती साडेसाती:- हा शनीच्या साडेसातीचा आरंभ काळ आहे. या काळात शनी चंद्रापासुन बाराव्या स्थानात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.

आर्थिक नुकसान, गुप्तशत्रुंकडुन धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दौर्बल्य. ह्या कालावधीत तुमचे गुप्त शत्रु त्रास निर्माण करतील. सहकार्‍यांशी संबंध बिघडतील, तुमच्या कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. यामुळे ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे. परंतु अखेरीस फळ मिळेल, त्यामुळे धीर धरुन वाट पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे. सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.

मध्यातील साडेसाती:- हा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनीची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रावरुन संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे पुढीलप्रमाणे  आहेत.

आरोग्य विकार, चारित्र्यहनन, नात्यांतील लोकांकडून अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. तुमची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले स्थान आरोग्याचे स्थान असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. तुमचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून तराल.

उतरती साडेसाती :- हि शनी साडेसातीची मावळती दशा आहे. शनी चंद्रापासुन दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या महत्वाच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व तुम्हाला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.

वरील भाकिते साधारण स्वरुपाची आहेत व साडेसाती हानिकारक असते या समजुतीवर आधारित आहेत. खरे पाहता, आम्हाला असे दर वेळी काही आढळलेले नाही. फक्त साडेसातीवरच आधारित निष्कर्ष चुकू शकतो. त्यावेळची इतर ग्रहांची दशा व शनीचा स्वभाव, असे अंग देखील मोजमापात घ्यायला हवे ज्यावरून साडेसातीचा काळ अनुकूल अाहे की प्रतिकूल अाहे ते ओळखता येईल. आमचा सल्ला आहे की वरील भाकीते फार गंभीरपणे घेऊ नयेत 

 जीवन म्हणजे सुख-दुःखाचा संगम. माणसाच्या आयुष्यात दु:खामागे सुख नक्कीच येतं. विशेषत: साडेसाती असणार्‍या जातकांच्या शेवटच्या टप्प्यात शनिदेवाची कृपा निश्चितच होते. तर दुसरीकडे जेव्हा वेळ चांगली येणार असते किंवा तुम्ही श्रीमंत होणार आहात, तेव्हा काही शुभ चिन्हे आधीपासूनच याकडे संकेत करतात.

म्हणून शनिमहाराज व साडेसाती.हा..वास्तव दर्शनाचा काळ

साडेसाती ही आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते, जेणेकरून आपण त्याच किंवा त्या प्रकारच्या चुका पुन्हा करू नयेत. त्याचबरोबर आपल्या जीवनाला एक चांगली दिशा ही देते. नेहमी लक्षात ठेवावे की, आपल्या सम्पूर्ण जीवनावर शनी महाराजांचे लक्ष असते.

आपणा सर्वांवर शनिदेवांची सदैव कृपादृष्टी राहो तसेच तुम्हा सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघुदेत हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

।।शुभम भवतु ।।

                                                        🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



Tuesday, March 25, 2025

हनुमान चाळीसा जन्मकथा ......




हनुमान चाळीसा जन्मकथा ......

हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या*

 कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल?

 सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.

 

 गोष्ट .. १६०० ची आहे हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.

 एकदा तुलसीदास जी मथुरेला जात होते, रात्री होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला, लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत.

 हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.

 सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे?

 तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, त्यानी रामचरितमानसचा अनुवाद केला आहेहे रामभक्त तुलसीदास जी आहेत.मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.

 अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले.

 सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यानी तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.

 हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?

 त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.

 हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला.

 बिरबलाने अकबराला असे करण्याचा सल्ला दिला.

 पण अकबराला ते मान्य नव्हते, आणि तुलसीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली.

 तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करा.

 तुलसीदासजी म्हणाले-

 मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.

  हे ऐकून अकबर संतापला.

 आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

 दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.

 लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे ?

 तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते.पण तूम्ही सहमत झाला नाहीत

आणि हा करिश्मा झाला.  अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले  आणि साखळ्या उघडल्या गेल्या.

 तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे.  मला अंधारकोठडीत भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो.  आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.

 हे  ते 40 चतुर्भुज, चालिसा.  हनुमान जी यांच्या प्रेरणेने लिहिलेले.

 तुलसीदास जी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालिसा म्हणेल, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील.

 ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल.

 अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊनमथुरेला पाठवले.

 आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे.  आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.  म्हणूनच हनुमानजींना "संकट मोचन" असेही म्हणतात.

 ।। श्रीराम जय राम जय जय राम।।*🪷🙏🏻🪷