Wednesday, June 11, 2025

नोकरी व कामधंदा मिळण्यासाठी . हे करा

 

नोकरी व कामधंदा मिळण्यासाठी. हे करा


    
१) दत्त अवधुत लिखित संक्षिप्त गुरुचरित्र सर्व (७ अध्याय) रोज सलग ४० दिवस वाचणे व दत्तमहाराज यांना रोज प्रार्थना करणे

२)पिंपळाच्या एक बोट जाड व रुंद अशा मुळीवर ५ दिवस तेलाचा दिवा शनिवारी सुरुवात करुन जाळावा .

५व्या दिवशी दिवा लावून ती मुळी कापुन आणावी .
पहील्या दिवशी दिवा लावतांना संकल्प करावा की 'हे पिंपळ देवा , मी तुमची ५दिवस पुजा करुन मुळी घरी नेणार आहे.               रोज हे बोलून दिवा लावावा . मुळी आणल्यावर लाल कोऱ्या कपड्यात बांधावी व नोकरी  , कामधंद्यासाठी भेटायला जातांना बरोबर घेऊन जावी,

३)..संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा (उंबरठ्याजवळ व मंदिरात)

यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: | तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम || रोज संध्याकाळी १८ वेळा मोठ्याने म्हणावा.

४) गणपती मंदिरात  मंगळ वार पासून रोज 21 दिवस दर्शनास जाणे पहिल्या दिवशी दुर्वा  लाल फुल व गुळ खोबरे ठेवणे. व बाप्पाला नोकरी साठी विनंती करणे असे रोज करणे......तुम्हाला यश नक्की येईल.

                                                                                        ।।शुभम भवतु ।।      

Monday, June 9, 2025

देवपूजा करताय ? हे लक्षात ठेवा

 

देवपूजा  करताय ? हे लक्षात ठेवा


घरातील देवपूजा करताना या 20 नियमांचे पालन करायलाच हवे. ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते, नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते. दुःख, दारिद्र्य दूर होते. नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो.

घरातील वातावरण शुद्ध राहते. हिंदु पुराणानुसार देवपुजेचे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते. भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. महालक्ष्मी सह सर्व देवी-देवता आपल्यावर प्रसन्न राहतात.

1) तुळशीची पाने 11 दिवसा पर्यंत शिळी होत नसतात. त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात.

2) दिवा नेहमी परमेश्वराच्या मुर्तीसमोर ठेवला पाहिजे. तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी.

3) पूजेकरिता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही.

4) शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी.

5) कोणत्याही पुजेच्या वेळी आपल्या स्वेच्छेने देवाला दक्षिणा हिनक्की द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.

6) प्रत्येक पुजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे. तुकडे झालेले तांदूळ वापरू नये. हळदीचे पाणी करुन त्यात तांदूळ पिवळे करुन मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते. नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे.

7) विड्याची पाने देखिल पूजेसाठी अवश्य ठेवावी. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अतिउत्तम.
पूजेच्या मध्यभागी दिवा मधेच विझू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.

8.) कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप-दीप, अक्षता (तांदूळ), कुमकुम, चंदन, फुले (फुले), प्रसाद इत्यादींना आमंत्रित (आमंत्रित) करणे आवश्यक आहे.

9) भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये.

10) पूजेच्या ठिकाणी स्वचछता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीच वस्तू पुजा अर्चा करताना जवळ बाळगू नये. पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. म्हणतात ना “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे”

11) भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

12) कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्टदेवता, वास्तु देवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करुन त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे. पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे. पुजेच्या आधी देवांना स्नान घालावे, धूप दीप प्रज्वलित करावे, हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, अक्षदा असणे गरजेचे असते.

13) आपण पुजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकवावे.

14) आपण दररोज तूपाचे निरांजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात.

15) देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेऊ नये.
देव्हाऱ्यावर काहीही ठेऊ नये . देवाला भार होतो .
16) देवतांना पुष्पहार, ताजीतवानी फुले, पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

17) भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात, श्री विष्णूला चार, श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना आर्धी प्रदक्षिणा घालावी.

18) घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश माता, साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे.

19) या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडित कडून मिळू शकते. विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे, जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल.

20) भगवान सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गामाता, शिवजी आणि श्रीविष्णू ह्या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी. दररोज पूजा करताना

रोज घरात देवपूजा करून सकारात्मक वातावरण होते त्यामुळे पुण्यसंचय तर होतोच पण  घरात अनुकूल व मंगल गोष्टी घडतात . दत्तनामात राहा कल्याण होईल शुभम भवतु .

Saturday, June 7, 2025

राजयोगी दत्तावतारी माणिकप्रभु

 

राजयोगी दत्तावतारी माणिकप्रभु 


राजयोगी दत्तावतारी माणिकप्रभु


सकलमत  संप्रदाय  

माणिक प्रभू हे कल्याणीच्या मनोहर नाईकांचे पुत्र. आश्वलायनशाखीय देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण. त्यांचा जन्म मार्गशीर्ष शु. १४, श. १७३९ (श्रीदत्त जयंती)  या दिवशी झाला. त्यांची माता-पिता दोघेही परमार्थप्रवण आणि सत्त्वसंपन्न असल्यामुळे ‘शुद्ध बीजापोटी’ या रसाळ फळाचा उद्भव झाला. माणिक प्रभू हे दत्तात्रेयाचे चौथे अवतार समजले जातात. प्रथम श्रीदत्तात्रेय, द्वितीय श्री श्रीपादश्रीवल्लभ, तृतीय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, चतुर्थ श्री माणिकप्रभु महाराज.

माणिकप्रभूंचा हा दत्तावतार हिंदू व मुसलमान धर्मात सारखाच लोकप्रिय आहे. दोन्ही धर्माच्या लोकात त्यांचे अनेक भक्त आहेत. हा अवतार मोगलाईत निजाम (हैदराबाद) राज्यात, कल्याण गावी मनोहर नाईक व बयादेवी/बयाबाई या दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. श्रीदत्त भगवानांच्या आशीर्वादाने त्यांना तीन मुलगे झाले.

१) हणमंत (दादासाहेब)
२) माणिकप्रभु व
३) नरसिंह (तात्यासाहेब)

मनोहर नाईकांना रामनवमीच्या दिवशी दृष्टान्त झाल्याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंनी माणिकप्रभूंच्या रुपाने या दांपत्याच्या पोटी सन १८१७ मध्ये अवतार घेतला. बारशाच्या दिवशी त्या बालकाचे नाव ‘माणिक’ ठेवण्यात आले. त्याचे अनुपम तेज पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या दर्शनाला येत असत.

बयादेवींचे बंधू (प्रभूंचे मामा)  कल्याणच्या नवाबाच्या कचेरीत चाकरी करत असल्यामुळे मामांचा नवाबाशी घनिष्ट संबंध होता. नवाबांनी ज्यावेळी पहिल्यांदा प्रभूंचे दर्शन केले त्यावेळी त्याला प्रभूंच्या दैवीरूपाचे दर्शन झाले. आणि त्यामुळे नवाब साहेबांनी लाखो रुपयांचे अलंकार, दागिने व वस्त्राभूषणे प्रभूंना समर्पित केले. माणिकप्रभूंची देखभाल लहानपणापासून खूप प्रेमाने करण्यात आली  होती. त्यांच्या अंगावर हजारो रुपयांचे हिरे माणकांचे दागिने असत. त्यांच्या रक्षणासाठी पाच सहा अरब रोहिले शिपाई नबाबांनी ठेवले होते. पाचव्या वर्षानंतर श्रीप्रभूंची खेळकर वृत्ती वाढत गेली. कल्याण गावात माणिकप्रभू नावाचा दत्ताचा अवतार झाला आहे अशी बातमी गावभर पसरली. दर गुरुवारी लोक दर्शनाला येऊ लागले. सातव्या वर्षी श्रीप्रभूंची मुंज मोठ्या थाटाने झाली. सर्व ब्रह्मकर्म श्रीप्रभूंना मुखोद्गत होते. हा चमत्कार पाहून शास्त्री, पंडितही थक्क होत असत.

प्रभु कधी शाळेत गेले नाहीत; परंतु लहानपणापासूनच त्यांना तेलगू, कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत आणि मराठी इतक्या भाषा लिहिता, वाचता व बोलता येत असत. चार वेद, सहा शास्त्रे व उपनिषदे यातही ते पारंगत होते.

हे साक्षात ईश्वरी अवतार आहेत, अशी त्यांच्याविषयीची श्रद्धा त्यांच्या लहानपणापासूनच पसरत चालली होती. त्यांचे दर्शन, स्पर्शन आणि भाषण अमोघ असल्याचा प्रत्यय अनेकांना येत असे. त्यांना कानडी, फारशी, उर्दू, संस्कृत व मराठी या भाषा उत्तम तर्‍हेने अवगत होत्या. शास्त्रचर्चेंत पंडितही त्यांच्यापुढे फिके पडत. ‘जणू वयसेचिया गावां न जातां’ बाळपणीच सर्वज्ञतेने त्यांना वरले होते. अभिजात सिद्धींचा प्रत्यय अगदी लहानपणापासूनच येऊ लागल्यामुळे त्यांच्या साधुत्वाचा डंका लवकरच सर्वत्र झडू लागला. भालकी गावाजवळील एका जंगलांतील गुहेत ते एक वर्षभर समाधी लावून बसले होते. हुमणाबादेजवळील अरण्यात त्यांनी एका बेलाच्या झाडाखाली निवास केला. तिथेच त्यांच्या नावाने ‘माणिकनगर’ वसले.

श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगरश्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर
माणिकप्रभूंचे कार्य
माणिक प्रभूंच्या दत्तोपासनेच्या परंपरेला ‘सकलमत संप्रदाय’ असे नाव होते. नावावरूनच हे स्पष्ट आहे की, या संप्रदायात समन्वयाचा मोठा प्रयत्न झालेला आहे. या संप्रदायाचा असा सिद्धांत आहे की, जगातील सर्व धर्म व संप्रदाय हे त्यांच्या त्यांच्या अनुयायांना परमेश्वराची प्राप्ती करून देणारे आहेत. तेव्हा प्रत्येकाने अन्य संप्रदायांना विरोधी वा त्याज्य न मानता समन्वयाच्या उदार दृष्टीने त्यांतील सत्त्वांश ग्रहण करावा. या संप्रदायाचे उपास्य श्रीचैतन्यदेव ( आत्मदे - या विश्वात भरून उरलेले चैतन्यतत्त्व) हे आहे. या संप्रदायांत श्रीदत्तात्रेयाचे स्वरूप मधुमती नामक शक्तिसहित आराधिले जाते. ‘‘हा संप्रदाय अद्वैती व सर्वव्यापी असल्यामुळे अमक्याच एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे, असा आग्रह मुळीच नाही. कारण आपले सद्गुरूच नाना वेशांनी या जगात नटलेले आहेत, सर्व स्वरूपे त्यांचीच आहेत; म्हणून बाह्यत: भेद दिसला, तथापि वस्तुत: सर्व देवता एकरूपच आहेत, असा निश्चय ठेवून मंत्र घेतल्यास बाधक होणार नाही.’’

श्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगरश्री माणिकप्रभू मंदिर माणिक नगर

श्रीप्रभूंचे आंधळ्या पांगळ्यांवर, गरिबांवर जास्त प्रेम असे. हिंदू-मुसलमान दोन्ही भक्तांवर ते सारखेच प्रेम करीत. एके दिवशी कोणालाही न सांगता प्रभू घराबाहेर पडले. हुमणाबादपासून २० कोस दूर असलेल्या ‘मंठाळ’ गावात ते पोहोचले. हे कळताच श्रीप्रभूंच्या मातोश्री, तात्यासाहेबांना बरोबर घेऊन श्रीप्रभूंना भेटले. श्रीप्रभु आईंना म्हणाले की, श्री दत्तात्रेयांच्या साक्षात्काराप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. तुमचे मनोरथ पूर्ण केले. व्रतबंध होईपर्यत तुमच्या जवळ राहिलो. आता आम्हास सर्वत्र संचार करून भक्त जनांचा उद्धार करून अवतारिक कृत्ये केली पाहिजेत. तरी आमच्याविषयी दु:ख न करता घरी जाऊन दत्तसेवा करून कालक्रमणा करावी. मंठाळच्या अरण्यात अंबील कुंडाजवळील एका गुहेत ते गुप्तरीतीने राहिले. ही गुहा अद्याप तेथे असून तिला माणिकप्रभूंची गुहा असे म्हणतात.

नंतर श्रीप्रभु घरी आले लोकांना ही बातमी कळताच लोक दर्शनाला येऊ लागले. श्रीप्रभूंपुढे रुपयांचा ढीग पडू लागला. श्रीप्रभू ते सर्व पैसे गोरगरीबांना वाटून टाकत. मैलार गावी जाऊन प्रभूंनी त्यांच्या कुलदैवताची खंडोबाची महापूजा केली, त्याचे दर्शन घेतले व हजारो रुपयांचे वस्त्रालंकार देवास अर्पण केले. मैलारहून पुन: आपल्या गावी कल्याणला आले. त्या वेळी धाकटे बंधू तात्यासाहेब यांचे लग्न लावून दिले.

या उदार समन्वयदृष्टीने माणिक प्रभूंच्या अनुयायी वर्गात हिंदूंबरोबर मुसलमानांचाही मोठा भरणा होता. हिंदूंतील लिंगायत पंथही त्यांना मानीत असे. अतिथि-पांथस्थ, तडी-तापडी, पंगु- रोगी या सर्वांना प्रभूंचे संस्थान हे एक विश्रामस्थान झाले होते. गरिबांचे दारिद्र्य जावे, निपुत्रिकांस संततिलाभ व्हावा, रोग्यांना आरोग्य प्राप्त व्हावे, संसारक्लान्त जीव समाधान पावावे,’’ असे त्यांच्या परिसरांतील वातावरण होते. जंगमांचा संक्रांतिमहोत्सव, मुसलमानांचा मोहरम आणि ब्राह्मणांची दत्तजयंती या उत्सवांसाठी त्यावेळी माणिकनगरांत प्रतिवर्षी तीस लाखांवर रक्कम खर्च होई !

असे योगेश्वर कृष्णासारखे दिव्य जीवन व्यतीत करून माणिकप्रभूंनी मार्गशीर्ष शु. ११, श. १७८७ या दिवशी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या अवतारकार्यामुळे दत्त संप्रदायाच्या प्रसाराला आणि प्रगतीला फार मोठी गती मिळाली. समन्वयाच्या वृत्तींतून निर्माण झालेली दत्तदेवता जणू समन्वयाचे प्रात्यक्षिक आचरण्यासाठी या भूतळावर माणिक प्रभूंच्या रूपाने अवतरली .

श्रीप्रभूंनी पुष्कळ प्रवास केला व चमत्कार केले. मुधोळ गावच्या पहाडातील गुहेत ते समाधी लावून बसत असत. मुधोळ संस्थानात फिरत असता एकदा एका वडार्‍याचा सर्पदंशाने मृत्यु झाला. श्रीप्रभूंनी आपल्या कृपाशीर्वादाने त्याचे प्राण वाचवले. एक ब्राह्मण कुटुंब श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी येत होते. वाटेत चोरांनी त्यांना लुटले. ते श्रीप्रभूंची प्रार्थना करू लागले. चोरांनी ब्राह्मणाला मारण्यासाठी शस्त्र उगारले. पण त्यांचे हात वरचे वर थिजले. चोरांनी श्रीप्रभूंची प्रार्थना केली. ते श्रीप्रभूंना शरण आले. नंतर त्यांचे हात मोकळे झाले. श्रीप्रभूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाचे कोटकल्याण केले.

श्रीप्रभु तेथे एका शिवालयात राहू लागले. सरकारी अधिकार्‍यांनी तेथे येऊन शिवालय व आजूबाजूची जागा स्वच्छ केली. श्रीप्रभूंच्या राहण्याची व्यवस्था केली. पाच दिवस मोठा समारंभ झाला. सरकारने कोठी लावून दिली. आलेल्या भक्तांची व्यवस्था केली. अशा रीतीने ‘माणिकनगर’ ची रचना झाली. कल्याणहून मातोश्री व तात्यासाहेब तेथे राहण्यासाठी आले, पण प्रभूंनी त्यांना परवानगी दिली नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी किंवा गुरुवारी येण्याची आज्ञा दिली. इतर आंधळे, पांगळे, यात्रेकरु, सेवेकरिता राहिलेले रुग्ण यांची व्यवस्था भांडारखान्यातून केली. भक्तांनी श्रीप्रभूंची गादी स्थापन केली. भक्तांच्या आग्रहाखातर श्रीप्रभू त्या गादीवर बसू लागले. जवळच दत्तगादीही स्थापन केली होती. तेथेही नेहमी भजन, कीर्तन, प्रवचन होत असे.

श्री दत्तावतारी माणिकप्रभुश्री दत्तावतारी माणिकप्रभु

माणिक प्रभूंच्या संप्रदायात, 
‘श्रीभक्तकार्यकल्पद्रुम-गुरुसार्वभौम-श्रीमदराजाधिराज-योगीमहाराज - त्रिभुवनानंद - अद्वैत - अभेद - निरंजन - निर्गुण - निरालंब - परिपूर्ण - सदोदित - सकलमतस्थापित - श्रीसद्गुरूमाणिकप्रभुमहाराज की जय !”

असा जयघोष रूढ आहे. माणिक प्रभुंच्या पद-संभारात कृष्णपर पदांचा विशेश भरणा आहे. त्यांची पदे मराठी, हिंदी आणि कानडी  आशा भाषांत आढळतात. 
दत्तावतारी माणिकप्रभु यांचे पदात काय म्हणतात ...
श्रीगुरु माझा दत्त दयाघन रे । अंतरचालक त्रिभुवनपालक । 
सकळांसी जीवन रे । अखंडअगोचर व्याप्त चराचर ।  शाश्वत चिदघन रे ॥
माणिकदासासि मिळविले स्वरूपासी । देऊनि उन्मन रे ॥

या  उन्मनावस्थेत माणिक प्रभू म्हणतात :

आम्ही येथींचे तेथींचे । वेद जाणती नेतीचे ।
आम्हां नाही येणे जाणें । आम्ही पूर्णातीत पूर्ण ।
आम्हां गांव ठाव नाहीं । ठावातींत सर्वांठायीं ॥
आमचें नाम माणिक नोहे । आम्ही आम्हातीत होय ॥

श्रीप्रभूंच्या मनात कोणताही राजकीय हेतू नव्हता. त्यांच्या मनात केवळ परोपकार व दानधर्म करण्याचाच हेतू होता. वडील बंधू दादासाहेब व मातोश्री बयाबाई यांना निर्वाणाच्या वेळी ब्रह्मज्ञान दिले व त्यांना मुक्ती दिली. पुढे तात्यासाहेबांनी स्वत: गुरुचरित्राचे पारायण करून पुष्कळ दानधर्म केला. भजनपूजनादी सत्कर्मे करुन सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंच्या चरणावर मस्तक ठेवले आणि मग योगासन घालून समाधी घेतली. श्रीप्रभूंनी त्यांचे चिरंजीव अप्पासाहेबांकडून सर्व उत्तरविधी शास्त्रोक्त करविला व हजारो रुपये दानधर्म केला.

श्री समर्थ अक्कलकोट स्वामी एकदा प्रभूंच्या भेटीला आले. प्रभूंची व त्यांची एकांतात भेट झाली, चर्चा झाली. नंतर एकदा शृंगेरीचे जगद्गुरु श्रीशंकराचार्य श्रीप्रभूंच्या भेटीस आले होते. जगद्गुरूंना सिंहासनावर बसवून त्यांची तात्यासाहेबांकडून यथासांग पाद्यपूजा करवली. त्यांना वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे, पालख्या सर्व अर्पण केले. भोजनसमारंभही मोठ्या थाटाने झाला, त्यांना निरोप देताना श्रीप्रभू त्यांना पोहोचवण्यासाठी दोन कोसपर्यंत गेले होते.